शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

कल्याणचा ८७.७३ टक्के निकाल, बारावीचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:54 IST

बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये कल्याण तालुक्याचा ८७.७३ टक्के निकाल लागला आहे.

डोंबिवली : बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये कल्याण तालुक्याचा ८७.७३ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातून एकूण सहा हजार ८५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सहा हजार १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४६२ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. डोंबिवलीतील साउथ इंडियन महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचा, होली एंजल्स स्कूलचा विज्ञान यांचा विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा, तर जन-गण-मन महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.मंगळवारी सकाळपासूनच निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. दुपारी १ वाजता आॅनलाइन निकाल जाहीर झाला. होली एजंल्स स्कूलचा सलग १३ व्या वर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. डोंबिवलीतील टिळकनगर विद्यालयाचा कला विभागाचा निकाल ७०.८३ टक्के, के.व्ही पेंढरकर महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ७३.३३ टक्के, विज्ञान विभागाचा ७८.२१ टक्के, वाणिज्य विभागाचा ९६.८८ टक्के लागला आहे. मॉडेल महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा ९३.४८ टक्के, कला विभागाचा ९७.५०, वाणिज्य विभागाचा ९८.६३ टक्के लागला आहे. प्रगती महाविद्यालयाचा कला ७२.८९, वाणिज्य ९४.४४, विज्ञान ८४.६१ टक्के लागला आहे. होली एंजल्स स्कूलच्या वाणिज्य शाखेच्या गीतिका नायर हिने ९२.३१ टक्के गुण मिळवून प्रथम, तर नेहा साळी ९२ टक्के, आणि नितू पाल हिने ९१.२० टक्के यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. विज्ञान विभागातून अस्मिता पाटील हिने ८५.६९ टक्के गुण मिळवून प्रथम, संघमित्रा रंगनाथन हिने ८२.१५ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि रोहित पाटील याने ८१.३८ टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकाविला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. उम्मन डेव्हिड यांनी दिली आहे.कल्याणमधील के. एम. अग्रवाल यांचा विज्ञान विभागाचा ९२.५८ टक्के, कला विभागाचा ६५.१५ , वाणिज्य विभागाचा ९७.१४ टक्के निकाल लागला आहे. बिर्ला महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ९५.२७ टक्के, कला शाखेचा ८२.४४ टक्के, वाणिज्य शाखेचा ९९.४३ टक्के इतका लागला आहे.साकेत महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ७६.३१, कला७१.२९, वाणिज्य ८७.७८ टक्के लागला आहे.>मोफत शिकवणीतील विद्यार्थ्यांचे यशरा.स्व. संघ जनकल्याण समिती कल्याण जिल्हा यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या मोफत शिकवणी वर्गातील बारावीतील विद्यार्थ्यांनी नेहा पवार (विज्ञान शाखा) हिने ६६ टक्के गुण मिळविले आहेत. शिवानी सकपाळ (वाणिज्य शाखा) हिने ६३ टक्के गुण मिळविले आहेत. पुष्पलता कदम (वाणिज्य शाखा) ५७ टक्के गुण तर नम्रता बैकर (वाणिज्य शाखा) हिने ७० टक्के गुण मिळविले आहेत. वासुदेव जांभळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.