शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

कल्याण तालुक्यात १६ कोटींचे नुकसान, अतिवृष्टी, पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 01:08 IST

कल्याण तालुक्यात २६, २७ जुलै आणि ४ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा मोठा फटका बसला होता.

- मुरलीधर भवारकल्याण : तालुक्यात २६, २७ जुलै आणि ४ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा मोठा फटका बसला होता. कल्याण तहसील कार्यालयातर्फे पूरग्रस्तांचे पंचनामे सुरू असून आतापर्यंत २३ हजार कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. तालुक्यात १६ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, भरपाईपोटी राज्य सरकारकडे कल्याण तहसील कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही मदत मागितली आहे. दरम्यान, काही पूरग्रस्तांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याची तक्रार पूरग्रस्तांकडून केली जात आहे. तर, अजूनही काही भरपाई कधी मिळणार, असा सवाल करत आहेत.अतिवृष्टीचा फटका तालुक्यातील उल्हास नदीकिनारी असलेल्या कांबा, वरप, रायता या गावांना जास्त बसला होता. तसेच शहरी भागातील कल्याण खाडी परिसर, रेतीबंदर, वालधुनी नदीकिनाºयालगतचा शिवाजीनगर, वालधुनी, अशोकनगर, तर कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, विठ्ठलवाडी स्मशानभूमी आणि डोंबिवलीतील खाडीकिनाºयालगतच्या घरांमध्ये पाणी शिरले होते.पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढण्यापूर्वीच कल्याण तहसील कार्यालयाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले होते. या परिपत्रकानुसार ज्यांच्या घरात दोन दिवस पाणी होते, अशांना पाच हजार रुपये भरपाई दिली जाणार आहे. मात्र, ही रक्कम कमी असल्याने राज्य सरकारने त्यात वाढ करून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १५ हजार दिले जातील, असे जाहीर केले. मात्र, आता पंचनाम्यांनंतर तहसील कार्यालयाने सांगितले की, ग्रामीण भागात बाधित कुटुंबाला १० हजार तर, शहरी भागात १५ हजार रुपये दिले जातील. वास्तविक, दोघांचेही तितकेच नुकसान असताना सरकारकडून हा भेदभाव का, असा आरोप पूरग्रस्तांकडून केला जात आहे.कल्याण खाडीकिनारी राहणारे अशरफ शेख यांच्या घरात पाणी शिरले होते. हा परिसर शहरी भागात असतानाही त्यांना सात हजार रुपये भरपाई दिली जाईल, असे पंचनाम्यासाठी आलेल्या महसूल विभागाच्या पथकाने सांगितले. नियमानुसार आपल्याला १५ हजार रुपये मिळायला हवेत. मग, सात हजारांचे आश्वासन का देण्यात आले, असा सवाल शेख यांनी केला आहे.२६-२७ जुलैला आलेल्या पुरामध्ये अनेकांच्या घरांत पाणी होते. त्यानंतर, पुन्हा ४ आॅगस्टलाही त्याच घरांना पुराचा फटका बसला. मात्र, तरीदेखील मदत ही एकदाच दिली जाणार असल्याचे सरकारी यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.प्रत्येककुटुंबाला १५ हजार भरपाई दिल्यास आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यांनुसार २३ हजार कुटुंबीयांना मदत दिल्यास त्याची रक्कम ३४ कोटी ५० लाख रुपये होते. परंतु, मागितलेली रक्कम ही १६ कोटीच आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम कधी मागणार. तसेच ज्यांचे पंचनामे झालेले नाहीत, ते कधी होणार व मदत कधी मिळणार, असा सवाल मदतीपासून वंचित असलेल्यांकडून केला जात आहे.मरिन व कस्टमच्या जागेवरील घरांचे सर्वेक्षण नाहीकल्याण खाडीलगतची जागा मरिन व कस्टमच्या मालकीची असून, तेथील घरांचे सर्वेक्षण तहसील कार्यालयाने केलेले नाही. तेथील पूरग्रस्तांनी आमच्या घरांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांच्याकडे नुकतीच केली आहे. शेलार कल्याणमध्ये रविवारी एका कार्यक्रमासाठी आले असताना ही मागणी करण्यात आली. त्यावेळी भाषणात शेलार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदत देण्यासाठी मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते.गहू, तांदूळवाटप सुरूप्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० किलो तांदूळ व १० किलो गहू दिला जात आहे. या वाटपासाठी शिधापत्रिका पाहिली जात आहे. मात्र, ती नसल्यास आधारकार्डाचा तपशील घेऊन धान्याचे वाटप सुरू आहे. खडवली येथील पूरग्रस्त विलास भोईर म्हणाले, धान्याचे कुपन्स मिळाले आहेत. मात्र, धान्य गावात येऊनही अद्याप ते मिळालेले नाही. तसेच आर्थिक मदतही अद्याप बँक खात्यात जमा झालेली नाही.शाळांच्या मदतीचे काय?कल्याण पश्चिमेतील मोहम्मदीया एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत ६३२ विद्यार्थी आहेत. या शाळेत सात ते आठ फूट पुराचे पाणी होते. त्यामुळे या शाळेचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारी यंत्रणेने पंचनामा करून साडेसात लाखांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे. शाळेने पंचनाम्याची प्रत मागितली असता त्यांना ती दिलेली नाही. पूरग्रस्तांमध्ये मदत फक्त बाधित घरातील एका कुटुंबाला दिली जात आहे. त्यामुळे शाळेला मदत मिळणार की नाही, याविषयी कुठलीही सुस्पष्टता सरकारच्या परिपत्रकात नाही. त्यामुळे शाळेच्या नुकसानीचा पंचनामा केवळ दाखवण्यासाठी केला की, खरोखरच आर्थिक भरपाई मिळणार आहे, या संभ्रमावस्थेत शाळा व्यवस्थापन आहे.

टॅग्स :floodपूरkalyanकल्याण