शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये ‘ती’ कुटुंबे आजही जगताहेत भीतीच्या सावटाखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 00:52 IST

नेतिवली, कचोरे टेकडीचा धोका कायम; जाळ्या लावण्याचे काम रखडले

कल्याण : मुंबईतील पश्चिम उपनगरांत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कांदिवलीजवळ दरड कोसळल्याची तर, मुंब्रा बायपास मार्गावर भूस्खलन होऊन दगडमातीचा ढीग रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे धोकादायक दरडींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पत्रीपुलानजीकच्या नेतिवली आणि कचोरे-हनुमाननगर टेकडीवरही माती खचून दरडी कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे पावसात तेथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांमध्ये भीतीचे सावट असते. धोकादायक दरडींबाबत केडीएमसीने संरक्षक भिंत तसेच जाळ्या लावण्याचे काम हाती घेतले होते. परंतु, ते अर्धवट राहिल्याने टेकडीवरील दरड कोसळण्याचा धोका कायम आहे.कल्याणच्या दक्षिणेला पत्रीपुलाजवळ प्रशस्त पसरलेल्या हिरव्यागार नेतिवली आणि कचोरे टेकडीवर झोपड्या, चाळींचे अतिक्रमण झाले आहे. यापूर्वी रेल्वेने मुंबईकडून कल्याणमध्ये प्रवेश करताना शहराच्या प्रवेशद्वारावर ही निसर्गरम्य टेकडी नागरिकांचे स्वागत करीत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत टेकडीच्या पायथ्यापासून सर्व जागा भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. दुसरीकडे दरडी कोसळण्याच्या भीतीने रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते.टेकडीवर आणि पायथ्याशी सुमारे साडेचारशे ते पाचशे कुटुंबे येथे वास्तव्याला आहेत. २००९ मध्ये दरड कोसळून येथे एका मुलाचा मृत्यू झाला होता. २४ जून २०१० ला दोन घरांवर दरड कोसळून तिघे गंभीर जखमी झाले होते. तर, २०११ च्या पावसाळ्यात तिघांचा मृत्यू तर, सहा जण जखमी झाले होते. २०११ च्या मार्चमध्ये घडलेल्या घटनेत येथील जयभवानीनगरमध्ये दरड कोसळून सात जण जखमी झाले होते.२०१४ मध्ये महात्मा फुलेनगरमध्ये दरड कोसळली होती. परंतु, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर, १९ सप्टेंबर २०१६ ला कचोरे येथील हनुमाननगरमध्ये दरड कोसळली होती. यावेळीही कोणतीही हानी झाली नव्हती. या घटनेनंतर नगरसेविका रेखा चौधरी यांनी संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. परंतु, हे काम अर्धवट राहिले आहे. पावसाळ्यात अथवा एखादी दुर्घटना घडल्यानंतर तेथील रहिवाशांना सतर्कतेच्या आणि स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या जातात. मात्र ठोस कारवाईअभावी त्या कागदोपत्रीच राहतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल केला जात आहे.‘ते’ काम खर्चिक : टेकडीच्या परिसरात राहणाºया रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. कचोरे येथील हनुमाननगरमध्ये टेकडीवर संरक्षक खांब लावले आहेत. परंतु, नेतिवली येथे संरक्षक जाळी आणि भिंत बांधण्याचे काम केले जाणार होते. परंतु, ते काम खर्चिक असल्याने होऊ शकलेले नाही. संबंधित जागा वनविभागाची असल्याने त्यांचीही परवानगी घ्यावी लागणार आहे.- भरत पाटील,‘जे’ प्रभागक्षेत्र अधिकारी, केडीएमसी