शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डॉक्टरलाच झाली डेंग्यूची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 18:46 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. सीमा जाधव यांना डेंग्यूची लागण झाली आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. सीमा जाधव यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने अद्याप परतीची वाट न धरल्याने साथीच्या रोगांनी पुन्हा डोके वर काढले आहे. नागरी आरोग्य केंद्रातील साथ रोग नियंत्रणासाठी काम करीत असताना त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. महापालिकेच्या डॉक्टरलाच डेंग्यू झाला असताना महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य विभाग गाढ झोपेत आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. 

महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते व माजी महापौर रमेश जाधव यांची सीमा ही मुलगी आहे. सीमा यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याची बाब गटनेते जाधव यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत व वैद्यकीय अधिकारी स्मिता रोडे यांना कळवून देखील त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. साधी त्यांची चौकशी देखील केली नसल्याचा आरोप गटनेते जाधव यांनी केला आहे. 

डॉ. सीमा या चिकणघर परिसरात साथ रोग नियंत्रणात तपासणीकरीता येणाऱ्या रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्याचे काम करीत होत्या. तीन दिवसापासून ताप असल्याने त्या आजारी पडल्या. हा ताप डेंग्यूचा असल्याने त्यांना तातडीने कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वीच महापालिकेच्या रुग्णालयातून  योग्य उपचार मिळत नाही. डॉक्टर व स्टाफकडून हलगर्जीपणा केला जातो याविषयी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करुन रोडे यांच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या पश्चातही वैद्यकीय आरोग्य विभाग गाढ झोपेत असे दिसून येत आहे. 

काही दिवसापूर्वी महापालिकेच्या लेखा विभागातील कार्यरत अधिकारी श्वेता सिंगासने यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. हा मृत्यू महापालिका हद्दीत झाला नाही असे सांगून महापालिकेच्या आरोग्य विभागाने हात वर केले. मात्र ज्या दिवशी सिंगासने यांचा मृत्यू झाला. त्याच संध्याकाळी महापालिका मुख्यालयात धूर फवारणी करण्यात आली होती. महापालिकेच्या पूर्व भागात दूषित पाणी पुरवठा केला जातो. परतीचा पाऊस आणि दूषित पाणी पुरवठा यामुळे नागरीकांना साथीच्या रोगांची लागण होत असल्याचा दावा गटनेते जाधव यांनी केला आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रार करुन देखील त्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचे जाधव यांनी सांगितले.