शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डॉक्टरलाच झाली डेंग्यूची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 18:46 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. सीमा जाधव यांना डेंग्यूची लागण झाली आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. सीमा जाधव यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने अद्याप परतीची वाट न धरल्याने साथीच्या रोगांनी पुन्हा डोके वर काढले आहे. नागरी आरोग्य केंद्रातील साथ रोग नियंत्रणासाठी काम करीत असताना त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. महापालिकेच्या डॉक्टरलाच डेंग्यू झाला असताना महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य विभाग गाढ झोपेत आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. 

महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते व माजी महापौर रमेश जाधव यांची सीमा ही मुलगी आहे. सीमा यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्याची बाब गटनेते जाधव यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत व वैद्यकीय अधिकारी स्मिता रोडे यांना कळवून देखील त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. साधी त्यांची चौकशी देखील केली नसल्याचा आरोप गटनेते जाधव यांनी केला आहे. 

डॉ. सीमा या चिकणघर परिसरात साथ रोग नियंत्रणात तपासणीकरीता येणाऱ्या रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्याचे काम करीत होत्या. तीन दिवसापासून ताप असल्याने त्या आजारी पडल्या. हा ताप डेंग्यूचा असल्याने त्यांना तातडीने कल्याणच्या श्रीदेवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वीच महापालिकेच्या रुग्णालयातून  योग्य उपचार मिळत नाही. डॉक्टर व स्टाफकडून हलगर्जीपणा केला जातो याविषयी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करुन रोडे यांच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या पश्चातही वैद्यकीय आरोग्य विभाग गाढ झोपेत असे दिसून येत आहे. 

काही दिवसापूर्वी महापालिकेच्या लेखा विभागातील कार्यरत अधिकारी श्वेता सिंगासने यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. हा मृत्यू महापालिका हद्दीत झाला नाही असे सांगून महापालिकेच्या आरोग्य विभागाने हात वर केले. मात्र ज्या दिवशी सिंगासने यांचा मृत्यू झाला. त्याच संध्याकाळी महापालिका मुख्यालयात धूर फवारणी करण्यात आली होती. महापालिकेच्या पूर्व भागात दूषित पाणी पुरवठा केला जातो. परतीचा पाऊस आणि दूषित पाणी पुरवठा यामुळे नागरीकांना साथीच्या रोगांची लागण होत असल्याचा दावा गटनेते जाधव यांनी केला आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रार करुन देखील त्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचे जाधव यांनी सांगितले.