शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीतही झोपडी विकासाला ठेंगा

By admin | Updated: January 8, 2016 02:01 IST

कल्याण-डोंबिवलीतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार किंवा पालिकेकडे कोणतीही योजना नाही का, असा सवाल झोपडीधारकांनी उपस्थित केला आहे

मुरलीधर भवार, कल्याण कल्याण-डोंबिवलीतील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार किंवा पालिकेकडे कोणतीही योजना नाही का, असा सवाल झोपडीधारकांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारने घोषित केलेली क्लस्टर योजना अद्याप अस्तित्वात आली नसून लागू झालेली नाही. शहरी गरिबांचा प्रकल्प अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली खऱ्या अर्थाने झोपडपट्टीमुक्त कधी होणार. झोपडीमुक्त झाल्याशिवाय स्मार्ट कल्याण-डोंबिवलीचे स्वप्न साकार होऊ शकते का, असे अनेक प्रश्न स्मार्ट धारावीनिमित्ताने समोर आले आहेत. शहरातील ७४ झोपडपट्ट्या या आरक्षित जागेवर वसलेल्या असल्याने त्यांच्या पुनर्विकासासाठी ठोस योजना राबविली जात नाही. झोपडीधारकांसाठी १९९५ पूर्वीच्या की १९९५ नंतरच्या आणि २००० पर्यंतच्या झोपड्या अशा कट आॅफ डेटविषयी सुस्पष्टता नाही. महापालिकेत ज्या काही इमारती व चाळी उभ्या राहिल्या, त्यापैकी ६७ हजार बांधकामे बेकायदा आहेत. हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. महापालिका हद्दीतील झोपडीधारकांना मोफत घरे देण्यासाठी केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेंंतर्गंत १३ हजार ६८६ घरे बांधण्याचा प्रकल्प २००९ साली हाती घेण्यात आला. जागा ताब्यात नसताना हा प्रकल्प हाती घेतला गेला. प्रकल्प मंद गतीने सुरू असल्याने केंद्राने महापालिकेस फटकारले. त्यानंतर, १३ हजार घरांचे लक्ष्य कमी करून ते सात हजार घरांवर करण्यात आले. शहरी गरिबांना घरे देण्याचा हा प्रकल्प होता. त्यात अवघ्या पाच हजार झोपडीधारकांना सामावून घेतले जाणार आहे. त्यापैकी केवळ दोन हजार घरे बांधून पूर्ण आहेत. उर्वरित पाच हजार घरे बांधण्यासाठी साधारणत: आणखी एक वर्ष लागणार असल्याचे कामाच्या गतीवरून दिसून येते. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार, झोपड्यांची संख्या १५ हजार आहे. सात हजार घरे बांधली जाणार आहेत. त्यात सात हजार झोपडीधारक सामावून घेतले जातील. उर्वरित सात हजार झोपडीधारकांचा प्रश्न शिल्लक राहतो. महापालिकेने जे काही विकास प्रकल्प हाती घेतले, त्यात प्रामुख्याने रस्ते विकासाचा प्रकल्प होता. त्यात बाधित झालेल्यांनाही महापालिका बीएसयूपीत घर देणार आहे. तसेच सफाई कामगारांना १५ टक्के आरक्षण बीएसयूपी प्रकल्पात देण्यात यावे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. १५ टक्केनुसार एक हजार ५० घरे सफाई कामगारांना द्यावी लागणार आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्याने यूपीए सरकारने जाहीर केलेली राजीव गांधी आवास योजना रद्द करण्यात आली. डोंबिवलीतील एका इमारतीच्या पुनर्विकास राजीव गांधी योजनेत करण्याचे आदेश २०१२ साली उच्च न्यायालयाने महापालिकेस दिले होते. आत्ता योजनाच रद्द झाल्याने कोणत्या योजनेतून पुनर्विकास केला जाणार आहे, याचे धोरणच महापालिकेकडे नाही. गेल्या वर्षी २८ जुलैला ठाकुर्लीतील ‘मातृकृपा’ ही धोकादायक इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यातून धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. झोपडीधारक व धोकादायक इमारतींच्या विकासासाठी राज्य सरकारने क्लस्टर योजनेची घोषणा केली. क्लस्टर किंवा वाढीव एफएसआय यापैकी एक पर्याय देऊन राज्य सरकारने निर्णय घेणे अपेक्षित होते. 686 धोकादायक इमारतींचा प्रश्न त्यामुळे लटकलेला आहे. क्लस्टर योजना लागू करण्यासाठी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी उपोषणाचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्या वेळी योजना लागू करण्याचे आश्वासन दिले गेले होते. पण, योजना अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग खोळंबला आहे.