शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीतील कामांना ‘ब्रेक’;  कार्यादेश न दिल्याने कामे सरकारकडून स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 01:52 IST

राज्य सरकारच्या निधीतून महापालिका हद्दीत काही विकासकामे केली जाणार होती.

कल्याण : राज्य सरकारच्या निधीतून केडीएमसी हद्दीत करण्यात येणारी विकासकामे थांबविण्याचे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार ही कामे थांबवल्याचे महापालिकेने सरकारला कळविले आहे. दरम्यान, या आदेशामुळे आठ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे.

राज्य सरकारच्या निधीतून महापालिका हद्दीत काही विकासकामे केली जाणार होती. या कामांसाठी तरतूद असली तरी त्यांना अद्याप कार्यादेश दिला गेलेला नव्हता. त्यामुळे ही कामे स्थगित करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही केली असून, या कामांची यादी सरकारकडे पाठवली आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड व कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या निधीतून ही कामे केली जाणार होती. या कामांना ब्रेक लागल्याने तेथील विकासकामे स्थगित करण्यात आली आहे. या विकासकामांमध्ये गटारे व पायवाटा या स्वरूपाची कामे होती. निधी मंजूर झाल्यावर ही कामे करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. त्याच वेळी या कामांना ब्रेक लागला आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेच्या निधीतून विकासकामे करता येत नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून आयुक्त गोविंद बोडके यांनी गटारे व पायवाटांची कामे रोखून धरली आहेत. त्यामुळे ही कामे केली जात नसल्याची ओरड नगरसेवकांकडून केली जात आहे.

एखाद्या नगरसेवकाने गटारे आणि पायवाटांचे काम प्रभागात सुचविल्यास त्याचा प्रस्ताव तयार करण्यापूर्वी आयुक्त स्वत: अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाची पाहणी करून तेथे खरोखरच या कामाची निकड किती आहे, याची शहानिशा केल्याशिवाय प्रस्ताव मंजूर करीत नाहीत. त्यामुळे नगरसेवक रडकुंडीला आले होेते. अशा परिस्थितीत आमदार निधीतून केल्या जाणाºया कामांनाही राज्य सरकारकडून ब्रेक लागणार असेल, तर राज्य सरकारने विकासकामांसाठी निधी द्यावा, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवकांकडून केली जात आहे.

रस्त्यांसाठी ३२७ कोटी रुपये कधी मिळणार?

च्आॅगस्ट व सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीण भागातील २७ गावांतील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. केवळ त्यावरील खड्डे बुजवून चालणार नाही, तर नव्याने डांबरी रस्ते करावे लागणार आहेत.च् राज्य सरकारकडे त्यासाठी ३२७ कोटी रुपयांची मागणी आयुक्तांनी आॅक्टोबरमध्ये केली आहे. मात्र, त्याला अद्याप सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही

च्अतिवृष्टीनंतर पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुका, त्यानंतर सरकार स्थापनेसाठी लागलेला एक महिन्याचा कालावधी हे पाहता नव्या सरकारकडून निधी मंजूर केला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे