शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कल्याण, डोंबिवली ‘गॅसवर’

By admin | Updated: January 4, 2016 02:00 IST

येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. या आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कल्याण : येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. या आगीमुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शनिवारी हा प्रत्यय पुन्हा एकदा आला. काही दिवसांपूर्वी दिवा येथे डम्पिंगवर रसायने जाळल्याने लोकांना त्रास झाला होता. त्यामुळे हा संपूर्ण परिसर गॅस चेंबर झाले आहे. कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंगवर प्रतिदिन ५५० टन कचरा टाकला जातो. या डम्पिंगची क्षमता संपुष्टात आल्यानंतरही या ठिकाणी बेकायदाकचरा टाकणे सुरूच आहे. याबाबत, सुरू असलेली बेपर्वाई पाहता मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला चांगलेच फटकारले असून एका याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान महापालिका क्षेत्रात नवीन बांधकाम करण्यास मनाई केली आहे. या निर्णयाला महापालिकेने आता सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले असून यावरील निर्णय प्रलंबित आहे. एकीकडे ओव्हरफ्लो होत असलेल्या या डम्पिंगच्या दुर्गंधीने परिसरातील रहिवासी हैराण झाले असताना त्यातच कचरा पेटण्याचे सत्रही सुरूच राहिल्याने त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. शनिवारी पुन्हा एकदा या डम्पिंगच्या कचऱ्याला आग लागण्याची घटना घडली. ही आग बराच वेळ धुमसत होती. त्यामुळे रहिवाशांना प्रचंड त्रास सहन क रावा लागला. बराच वेळ धुमसत असलेल्या या आगीमुळे निर्माण झालेला धूर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात गेल्याने रहिवाशांचे हाल झाले. हा धूर आधारवाडीसह वाडेघर, लालचौकी, पारनाकापर्यंत पसरला होता. यात रहिवाशांसह पादचाऱ्यांना श्वास गुदमरणे, खोकला येणे, मळमळणे आदी त्रासाला सामोरे लागले. या सतत होणाऱ्या प्रकाराने रहिवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. काहींनी तर या परिसरातून अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याची तयारी केली आहे. महापालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी एकदा येऊन परिस्थिती पाहावी, जेणेकरून नागरिकांना होण्याऱ्या त्रासाची जाणीव त्यांना होईल, असा संतापही त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. याबाबत, वाडेघर परिसरातील रहिवासी असलेले अजय पाटील म्हणाले धुरकट परिस्थिती ही कायमची असून माझ्या दोन्ही लहान मुलांना याचा प्रचंड त्रास होत आहे. धुरामुळे घराबाहेर पडणेही मुश्कील झाले असून येथील जागा सोडून दुसरीकडे जाण्याच्या आम्ही विचारात आहोत.