शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कल्याण डोंबिवली कोरोनाचे हॉटस्पॉट; राजू पाटील यांनी मुख्यमंत्री,आरोग्यमंत्र्यांना केले ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 14:20 IST

महापालिकेने शास्त्रीनगर रुग्णालय आयसोलेशन रुग्णालय म्हणून घोषित केले आहे.

कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे नवे रुग्ण दररोज आढळून येत आहे. नवे रुग्ण कमी होत नाहीत. त्यामुळे कोरोना बाधितांचा महापालिका हद्दीतील कालर्पयतचा आकडा 43 होता. ही बाब चिंताजनक आहे. कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट होत आहे. कोरोनाची लागण रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लक्ष्य द्यावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पाटील यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना ट्विट केले आहे.

महापालिका हद्दीत सुरुवातील केवळ कोरोनाचे संशयीत रुग्ण होते. लॉकडाऊन व संचारबंदीनंतरही कोरोनाच्या रुग्णात वाढ होत गेली आहे. 43 रुग्णांचा आकडा हा धक्कादायक आहे. कोरोना बाधितांच्या रुग्णात वाढ होत असताना आठवडाभरापूर्वीच महापालिका हद्दीत कोरोनाची टेस्टींग लॅबची सुविधा खाजगी लॅबमार्फत उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे आमदार पाटील यांनी केली होती. मात्र त्याची पूर्तता अद्याप सरकारकडून झालेली नाही. तसेच रॅपिड टेस्ट सुरु करण्याचे सरकारने जाहिर केले होते. त्याची सुरुवात कल्याण डोंबिवलीत दिसून येत नाही.

महापालिकेने शास्त्रीनगर रुग्णालय आयसोलेशन रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. त्याठिकाणी आरोग्याच्या सुविधा नाही. पुरेसा स्टाफ नाही. पुरेशा खाटा नाहीत. त्याठिकाणी होम क्वॉरंटाइन केले जात आहे. सुविधा नसल्याने रुग्ण बरा होण्याऐवजी आजारी पडण्याची जास्त शक्यता आहे असे पाटील यांचे म्हणणो आहे. एखाद्या रुग्णाला कोरोनाचा आजार झाला आहे. हे लक्ष्यात येताच त्या परिसरातील संशयति, त्याच्या संपर्कात आलेले लोक त्याचबरोब त्याच्या घरातील मंडळी यांचा ट्रॅकिंग रेकार्ड ठेवला गेला पाहिजे. मात्र महापालिकेकडे पुरेसा स्टाफ नाही. महापालिकेने सगळी यंत्रणा आरोग्य विभागाच्या कामासाठी लावली आहे.

विविध आदेश काढले आहेत. तरी देखील त्यांचे काम पुरेसे नाही. आमदार निधीतून 50 लाखाचा निधी जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांना यापूर्वीच वर्ग केला आहे. निधी देऊन देखील कोरोनाची उपाययोजना करण्यासाठी त्याचा उपयोग होतानाचे चित्र प्रत्यक्षात दिसून येत नाही याविषयी पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे. मुंबईतील वरळी व धारावीत कोरोनाचा शिरकाव होताच त्याठिकाणी ज्या पद्धतीने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या प्रकारे उपाययोजना केली आहे. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष भेट धेऊन पाहणी करावी. आरोग्याच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन तातडीने आणखीन काय उपाययोजना कराव्यालागतील याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. ही बाब त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे व आरोग्यमंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून देण्याकरीता ट्विट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaju Patilराजू पाटीलkalyanकल्याणdombivaliडोंबिवली