शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

कल्याण एपीएमसीत फुलले कमळ; राष्ट्रवादी निर्णायक भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:56 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी सहा जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, मनसेला एक जागा मिळाली आहे. तर, एक अपक्ष शिवसेनेच्या बाजूने आहे.

कल्याण / म्हारळ : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी सहा जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, मनसेला एक जागा मिळाली आहे. तर, एक अपक्ष शिवसेनेच्या बाजूने आहे. या निवडणुकीकरिता शिवसेना-भाजपाची युती जागेच्या वादातून फिसकटली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपाला साथ दिली. तर, शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवताना अपक्ष आणि बिनविरोध आलेल्या उमेदवारासह आठ जागा मिळवल्या. भाजपा, राष्ट्रवादी आणि मनसे मिळून भाजपाकडे १० जागांचे संख्याबळ असून, ते सत्ता स्थापनेसाठी पुरेसे आहे. त्यामुळे बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकणार आहे, हे सोमवारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट होत आहे.बाजार समितीच्या नव्या नियमानुसार, १८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. दोन जागा बिनविरोध निवडून आल्याने १७ मार्चला १६ जागांसाठी मतदान झाले. परंतु, बाराव्या गणातील मतपत्रिका जळाल्याने या गणासाठी रविवार, २४ मार्चला फेरमतदान झाले. त्यानंतर, सोमवारी बाजार समितीच्या आवारात मतमोजणी झाली. त्यात भाजपातर्फे दत्ता गायकवाड (कल्याण), मधुकर मोहपे (रायते), रवींद्र घोडविंदे (कुंदे), विद्या पाटील (खडवली), किसन धुमाळ (मांडा), श्रीपत भोईर (गोवेली) निवडून आले. राष्ट्रवादीतर्फे अर्जुन चौधरी (निळजे), शंकरराव आव्हाड (राष्ट्रवादी), अरुण जाधव (वावेघर), मनसेतर्फे गजानन पाटील (नांदिवली-पंचानंद), तर शिवसेनेतर्फे मयूर पाटील (बल्याणी), कपिल थळे (बारावे), शाहीद मुल्ला (वाहोली), भूषण जाधव (फळेगाव), जयश्री तरे (टिटवाळा), मंगल म्हस्के (अहिरे), मोहन नाईक (व्यापारी अडते), धोंडीभाऊ पोखरकर (व्यापारी अडते) हे विजयी झाले. १८ जागांपैकी १६ व्यापारी, अडतेची एक जागा व हमाल मापाडीच्या दोन जागा सोडल्या, तर उर्वरित १५ जागा या शेतकरीवर्गाच्या होत्या. निवडून आलेल्या १८ जागांपैकी राष्ट्रवादीचे अरुण जाधव व शिवसेनेचे मंगल म्हस्के हे बिनविरोध निवडून आले आहेत.मतपत्रिका जळाल्याने फेरनिवडणूक झालेल्या बाराव्या गणातही भाजपाच- बाजार समितीचे मतदान १७ मार्चला झाले. सायंकाळी मतपेट्या बाजार समिती मुख्यालयाच्या आवारात आल्या असताना बाराव्या गणातील मतपेटीतून धूर निघाला. तेव्हा मतपेटी कामगारांनी उघडली. त्यात मतपत्रिका जळत असल्याचे दिसून आले.त्यामुळे १८ मार्चची मतमोजणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केली. या गणात २४ मार्चला फेरनिवडणूक झाली. तेथे भाजपाचे दत्तात्रेय गायकवाड हे विजयी झाले. राष्ट्रवादीचे भीमराव पाटील यांचा त्यांनी दारुण पराभव केला.फेरमतदानाची मागणी करणाऱ्या पाटील यांनी त्यांचा विजय रोखण्यासाठी मतपत्रिका जाळण्याचा आरोप केला होता. मात्र, त्यांच्या पराभवानंतर त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण