शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण एपीएमसीत फुलले कमळ; राष्ट्रवादी निर्णायक भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:56 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी सहा जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, मनसेला एक जागा मिळाली आहे. तर, एक अपक्ष शिवसेनेच्या बाजूने आहे.

कल्याण / म्हारळ : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी सहा जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, मनसेला एक जागा मिळाली आहे. तर, एक अपक्ष शिवसेनेच्या बाजूने आहे. या निवडणुकीकरिता शिवसेना-भाजपाची युती जागेच्या वादातून फिसकटली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपाला साथ दिली. तर, शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवताना अपक्ष आणि बिनविरोध आलेल्या उमेदवारासह आठ जागा मिळवल्या. भाजपा, राष्ट्रवादी आणि मनसे मिळून भाजपाकडे १० जागांचे संख्याबळ असून, ते सत्ता स्थापनेसाठी पुरेसे आहे. त्यामुळे बाजार समितीवर भाजपाचा झेंडा फडकणार आहे, हे सोमवारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट होत आहे.बाजार समितीच्या नव्या नियमानुसार, १८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. दोन जागा बिनविरोध निवडून आल्याने १७ मार्चला १६ जागांसाठी मतदान झाले. परंतु, बाराव्या गणातील मतपत्रिका जळाल्याने या गणासाठी रविवार, २४ मार्चला फेरमतदान झाले. त्यानंतर, सोमवारी बाजार समितीच्या आवारात मतमोजणी झाली. त्यात भाजपातर्फे दत्ता गायकवाड (कल्याण), मधुकर मोहपे (रायते), रवींद्र घोडविंदे (कुंदे), विद्या पाटील (खडवली), किसन धुमाळ (मांडा), श्रीपत भोईर (गोवेली) निवडून आले. राष्ट्रवादीतर्फे अर्जुन चौधरी (निळजे), शंकरराव आव्हाड (राष्ट्रवादी), अरुण जाधव (वावेघर), मनसेतर्फे गजानन पाटील (नांदिवली-पंचानंद), तर शिवसेनेतर्फे मयूर पाटील (बल्याणी), कपिल थळे (बारावे), शाहीद मुल्ला (वाहोली), भूषण जाधव (फळेगाव), जयश्री तरे (टिटवाळा), मंगल म्हस्के (अहिरे), मोहन नाईक (व्यापारी अडते), धोंडीभाऊ पोखरकर (व्यापारी अडते) हे विजयी झाले. १८ जागांपैकी १६ व्यापारी, अडतेची एक जागा व हमाल मापाडीच्या दोन जागा सोडल्या, तर उर्वरित १५ जागा या शेतकरीवर्गाच्या होत्या. निवडून आलेल्या १८ जागांपैकी राष्ट्रवादीचे अरुण जाधव व शिवसेनेचे मंगल म्हस्के हे बिनविरोध निवडून आले आहेत.मतपत्रिका जळाल्याने फेरनिवडणूक झालेल्या बाराव्या गणातही भाजपाच- बाजार समितीचे मतदान १७ मार्चला झाले. सायंकाळी मतपेट्या बाजार समिती मुख्यालयाच्या आवारात आल्या असताना बाराव्या गणातील मतपेटीतून धूर निघाला. तेव्हा मतपेटी कामगारांनी उघडली. त्यात मतपत्रिका जळत असल्याचे दिसून आले.त्यामुळे १८ मार्चची मतमोजणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केली. या गणात २४ मार्चला फेरनिवडणूक झाली. तेथे भाजपाचे दत्तात्रेय गायकवाड हे विजयी झाले. राष्ट्रवादीचे भीमराव पाटील यांचा त्यांनी दारुण पराभव केला.फेरमतदानाची मागणी करणाऱ्या पाटील यांनी त्यांचा विजय रोखण्यासाठी मतपत्रिका जाळण्याचा आरोप केला होता. मात्र, त्यांच्या पराभवानंतर त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण