शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

कल्याण-अंबरनाथ रस्ता मार्गी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:29 PM

बाधित व्यापा-यांची बैठक घेत पर्यायी जागा देण्याचे मान्य केल्याने रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार आहे.

उल्हासनगर : अखेर तीन वर्षांपासून अर्धवट पडलेल्या कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम मार्गी लागण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. बाधित व्यापा-यांची बैठक घेत पर्यायी जागा देण्याचे मान्य केल्याने रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार आहे. रस्ता पुनर्बांधणीसाठी २२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.उल्हासनगरमधील कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणात एक हजारापेक्षा अधिक दुकानदार बाधित झाले. अशंत: बाधित व्यापाºयांना दुरूस्ती व दुमजली बांधण्याची तोंडी परवानगी महापालिकेने दिली. तर पूर्णत: बाधित व्यापाºयांना कॅम्प नं-३ येथील इंदिरा गांधी मार्केटमध्ये २०० चौरस मीटरचे गाळे देण्याचा ठराव मंजूर केला. मात्र १५ पेक्षा अधिक दुकानदारांनी महापालिकेवर अविश्वास दाखवत न्यायालयात धाव घेतली. त्यांनी कारवाई होण्यापूर्वी पर्यायी जागेची मागणी करून कारवाईला स्थगिती मिळवली. १७ दुकानदारांच्या भूमिकेमुळे संपूर्ण रस्त्याचे काम रखडले.एमएमआरडीएने रस्ता विकसित करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. रस्ता पुनर्बांधणी करत नसाल तर मंजूर निधी परत करा असे पत्र एमएमआरडीएने पालिकेला पाठवले. या प्रकाराने प्रशासन खडबडून जागे झाले.१७ दुकानदारांची बैठक पाटील यांनी घेतली. त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे आयुक्तांनी जाणून घेतले. व्यापाºयांनी समस्यांचा पाढाच आयुक्तांसमोर वाचला. बैठकीला उपायुक्त संतोष देहरकर, नगररचनाकार मिलिंद सोनावणे, सहायक आयुक्त गणेश शिंपी उपस्थित होते. पालिकेने तातडीने कार्यवाही सुरू करावी अशी व्यापाºयांची अपेक्षा आहे.बंद गाळे देणार?महापालिकेने आरक्षित भूखंड विकसित करण्याची परवानगी दिली. मात्र विकसित जागेपैकी २० टक्के मालमत्ता पालिकेला हस्तांतरीत करायची अट होती. त्यापैकी दोन ते चार बिल्डरांनी २० टक्के मालमत्ता पालिकेला हस्तांतरीत केली. त्यातील व्यापारी गाळे न्यायालयात गेलेल्या व्यापाºयांना देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkalyanकल्याणambernathअंबरनाथ