शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कल्याण- बाबासाहेब आंबेडकरांची 75 फुटी रांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 13:08 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त कल्याणात तब्बल 75 फुटी भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

कल्याण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त कल्याणात तब्बल 75 फुटी भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे 12 युवा कलाकारांनी न थांबता सलग 16 तास अथक मेहनत घेऊन या रांगोळीत प्राण फुंकले आहेत.बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांची रेलचेल असताना रोहीत बाळाराम जाधव यांच्या बी.जे. ग्रुपने या सांस्कृतिक उपक्रमाद्वारे त्यांना मानवंदना दिली आहे. कल्याण पश्चिमेच्या फडके मैदानात रेखाटण्यात आलेल्या या रांगोळीने आतापर्यंतच्या सर्वात भव्य रांगोळीचा मान मिळवला आहे. रांगोळीच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य चित्र रेखाटण्यात आले आहे. तब्बल 400 किलो रांगोळीचा त्यासाठी वापर करण्यात आल्याची माहिती रांगोळी रेखाटणाऱ्या कलाविश्व संस्थेच्या शाम आडकर यांनी दिली.शाम यांच्यासह विशाल सावंत, शैलेश कुलकर्णी, नरेंद्र आंबेडकर, रोहित नारकर, निखिल पवार, श्रद्धा साखळकर, वेदांती शिंदे, अक्षता खेडकर,अक्षता तावडे आणि सविता आवटे या 12 कलाकारांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता या कलाकारांनी ही रांगोळी काढण्यास सुरुवात केली. जी पूर्ण होण्यास सकाळचे 11 वाजले. कल्याणात पहिल्यांदाच साकारण्यात आलेली ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.