शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आजपासून कचराकोंडी, नोटिसांनंतरही वर्गीकरण न करणे ४०० आस्थापनांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 05:11 IST

वारंवार नोटिसा बजावून, जनजागृती करूनही शहरातील सोसायट्यांसह हॉटेल आणि मॉलचालकांनी कचरा विल्हेवाटीचा प्रश्न न सोडवल्याने अखेर ठाणे महापालिकेने अशा तब्बल ४०० हून अधिक आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे - वारंवार नोटिसा बजावून, जनजागृती करूनही शहरातील सोसायट्यांसह हॉटेल आणि मॉलचालकांनी कचरा विल्हेवाटीचा प्रश्न न सोडवल्याने अखेर ठाणे महापालिकेने अशा तब्बल ४०० हून अधिक आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, उद्यापासून (१५ जून) त्यांचा कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. परंतु, पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळू शकलेले नाही. केवळ ठाणे महापालिकेचीच ही गत नसून देशातील इतर महापालिकांचीदेखील हीच ओरड असल्याने यावर काहीतरी उपाय करावेत, यासाठी एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.त्यानंतर, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने यासंदर्भात मागील वर्षी एक अध्यादेश काढला आहे. त्यात ज्या सोसायट्या अथवा आस्थापना यांच्याकडून प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्तीच्या कचºयाची निर्मिती होते तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी त्यांच्या कचºयाचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे.त्यानुसार, आता ठाणे महापालिकेने मागील वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांपासून शहरातील अशा आस्थापनांचा सर्व्हे केला होता. त्यानुसार, तब्बल चारशेहून अधिक सोसायट्या, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींना नोटिसा बजावल्या होत्या. याविरोधात महासभेत लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर पालिकेने कचºयाची विल्हेवाट कशी लावावी, यासाठीचे प्रदर्शनही आयोजित केले होते. त्यानंतर, पुन्हा नोटीस देण्याचा पत्रप्रपंच केला होता. परंतु, यानंतरही या सोसायट्यांनी कोणत्याही हालचाली न केल्याने अखेर महापालिकेने या आस्थापनांचा कचरा न उचलण्याचे निश्चित केले आहे.दरम्यान, मालमत्ताकरातच कचराकरही वसूल केला जात असल्याने पालिकेनेच कचºयाची विल्हेवाट लावावी, अशी मागणी काही सोसायट्यांनी केली होती. परंतु, पालिकेने ही मागणी अमान्य करून आपले धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी प्रशासनाने १५ दिवसांपूर्वी गृहसंकुले आणि आस्थापनांना पुन्हा नोटिसा दिल्या होत्या. यामध्ये १५ जूनपासून कचरा उचलणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, उद्यापासून या आस्थापनांची कचराकोंडी होणार आहे.हॉटेल, मॉल अडचणीतमहापालिकेच्या उथळसर भागात २१, कळवा २३, नौपाडा ४७, लोकमान्यनगर-सावरकरनगर ७०, माजिवडा-मानपाडा भागातील १३४ आणि वर्तकनगर भागातील ६१ आस्थापनांना याचा फटका बसणार आहे. तसेच शहरातील मोठे मॉल, हॉटेल, रुग्णालयांचादेखील पालिकेने यात समावेश केल्याने त्यांचा कचरादेखील आता उचलणे बंद होणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न