शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ठाण्यात आजपासून कचराकोंडी, नोटिसांनंतरही वर्गीकरण न करणे ४०० आस्थापनांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 05:11 IST

वारंवार नोटिसा बजावून, जनजागृती करूनही शहरातील सोसायट्यांसह हॉटेल आणि मॉलचालकांनी कचरा विल्हेवाटीचा प्रश्न न सोडवल्याने अखेर ठाणे महापालिकेने अशा तब्बल ४०० हून अधिक आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे - वारंवार नोटिसा बजावून, जनजागृती करूनही शहरातील सोसायट्यांसह हॉटेल आणि मॉलचालकांनी कचरा विल्हेवाटीचा प्रश्न न सोडवल्याने अखेर ठाणे महापालिकेने अशा तब्बल ४०० हून अधिक आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, उद्यापासून (१५ जून) त्यांचा कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. परंतु, पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळू शकलेले नाही. केवळ ठाणे महापालिकेचीच ही गत नसून देशातील इतर महापालिकांचीदेखील हीच ओरड असल्याने यावर काहीतरी उपाय करावेत, यासाठी एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.त्यानंतर, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने यासंदर्भात मागील वर्षी एक अध्यादेश काढला आहे. त्यात ज्या सोसायट्या अथवा आस्थापना यांच्याकडून प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्तीच्या कचºयाची निर्मिती होते तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी त्यांच्या कचºयाचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे.त्यानुसार, आता ठाणे महापालिकेने मागील वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांपासून शहरातील अशा आस्थापनांचा सर्व्हे केला होता. त्यानुसार, तब्बल चारशेहून अधिक सोसायट्या, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींना नोटिसा बजावल्या होत्या. याविरोधात महासभेत लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर पालिकेने कचºयाची विल्हेवाट कशी लावावी, यासाठीचे प्रदर्शनही आयोजित केले होते. त्यानंतर, पुन्हा नोटीस देण्याचा पत्रप्रपंच केला होता. परंतु, यानंतरही या सोसायट्यांनी कोणत्याही हालचाली न केल्याने अखेर महापालिकेने या आस्थापनांचा कचरा न उचलण्याचे निश्चित केले आहे.दरम्यान, मालमत्ताकरातच कचराकरही वसूल केला जात असल्याने पालिकेनेच कचºयाची विल्हेवाट लावावी, अशी मागणी काही सोसायट्यांनी केली होती. परंतु, पालिकेने ही मागणी अमान्य करून आपले धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी प्रशासनाने १५ दिवसांपूर्वी गृहसंकुले आणि आस्थापनांना पुन्हा नोटिसा दिल्या होत्या. यामध्ये १५ जूनपासून कचरा उचलणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, उद्यापासून या आस्थापनांची कचराकोंडी होणार आहे.हॉटेल, मॉल अडचणीतमहापालिकेच्या उथळसर भागात २१, कळवा २३, नौपाडा ४७, लोकमान्यनगर-सावरकरनगर ७०, माजिवडा-मानपाडा भागातील १३४ आणि वर्तकनगर भागातील ६१ आस्थापनांना याचा फटका बसणार आहे. तसेच शहरातील मोठे मॉल, हॉटेल, रुग्णालयांचादेखील पालिकेने यात समावेश केल्याने त्यांचा कचरादेखील आता उचलणे बंद होणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्न