शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

आनंद दिघे यांच्या जयंत्तीच्या दिवशी मराठा समाजाला न्याय दिला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

By अजित मांडके | Updated: January 27, 2024 16:06 IST

मराठा समाजाच्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आल्याचेही ते म्हणाले. परंतु यावेळी इतर कोणत्याही समाजाचा आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला न्याय दिला असल्याचेही ते म्हणाले.

ठाणे : काही दिवसांपूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जंयत्ती झाली, त्यानंतर आज स्वर्गीय आनंद दिघे यांची जंयत्ती आहे, आज त्यांच्या जंयत्तीच्या निमित्ताने मराठा समाजाला सरकाराने न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मराठा समाजाच्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आल्याचेही ते म्हणाले. परंतु यावेळी इतर कोणत्याही समाजाचा आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला न्याय दिला असल्याचेही ते म्हणाले.  

दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची शनिवारी सर्वत्र जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने ठाणे येथील खारकर आळी भागातील आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेऊन उपस्थितांची संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी आनंद आश्रम येथे जाऊन दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन आर्शिवाद घेतले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार मिलिंद देवरा, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के हे उपस्थित होते. आनंद दिघे यांची जयंती आपण विविध उपक्रमांनी साजरा करतो. समाजास उपयुक्त असे लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित करतो. दिघे यांनी आपल्याला जी काही शिकवण दिली आहे, त्या आदर्श मागार्ने आपण ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात काम करीत आहोत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आपल्या पाठीशी आशीर्वाद आहेत. त्यामुळेच आनंद दिघे यांच्या जयंती दिवशी आपण मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

गेले अनेक वर्षे सोयीसुविधांपासून वंचीत असलेल्या मराठा समाजाला दिघे यांच्या जयंती दिवशी आपण न्याय दिला आहे. ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय दिला आहे. मराठा समाज सवलती पासून आजपर्यंत वंचित होता. परंतु त्यांना न्याय देण्याचा निर्णय घेण्याचे काम आपल्या सरकारने केले, याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

आनंद दिघे यांच्या नावाने योजनामहाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या सर्व प्रस्तावित योजनांमध्ये सबसिडी योजना आहे. त्याला धर्मवीर श्री आनंद दिघे लाभ समर्पण योजना असे नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. दिघे यांनी समाजाची सेवा करताना त्यागी वृत्तीने काम केले. सर्व समाजाला आपले कुटुंब मानून त्यांनी काम केले आहे. त्यांच्याचे मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. गोरगरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना दिघे यांची होती. त्यांच्या दरबारात समस्या घेऊन येणारा हसतमुखाने परत जात होता. म्हणूनच त्यांच्या नावाची योजना सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  जे आर्थिक दृष्ट्या खूप श्रीमंत आहे आणि गोरगरिबांना ज्याची आवश्यकता अशा प्रकारच्या लाभाची योजना समर्पित करण्यासाठी ही योजना आहे. दिघे यांनी आपले जीवन संपुर्णपणे लोकसेवा आणि दिघे यांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले. त्यामुळेच राज्य सरकारने त्यांच्या नावाने ही योजना सुरू केली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षण