शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

ठाणे, पालघरसह रायगडच्या १ लाख बेदखल कुळांना मिळणार न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 3:27 AM

रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या धर्तीवर नेमली समिती । कोकण आयुक्त सुचविणार शिफारशी

नारायण जाधवठाणे : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बेदखल कुळांसाठी सरकारने ज्याप्रमाणे कायदा बदलून खोतांच्या जाचापासून न्याय मिळवून दिला, त्याच धर्तीवर आता ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील शेतजमीन कसणाऱ्या बेदखल कुळांनाही न्याय देण्याचा निर्णय राज्याच्या महसूल विभागाने घेतला आहे. यासाठी सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत केली असून या समितीने उपरोक्त तिन्ही जिल्ह्यांतील बेदखल कुळांना महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम-४ नुसार विविध लाभ कसे मिळवून देता येतील, याबाबतच्या शिफारशी शासनास येत्या महिनाभरात सादर करायच्या आहेत.

सध्या या तिन्ही जिल्ह्यांत शासनाची समृद्धी मार्गासह विरार-अलिबाग कॉरिडोर, जेएनपीटी ते दिल्ली फे्रट कॉरिडोर, बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा महामार्गासह अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तर, काही प्रस्तावित आहेत. यामुळे भूसंपादनातील कुळांचा राग कमी करण्यासाठी उशिरा का होईना शासनाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यामुळे आंदोलनाची तीव्र धार कमी होईल, असा शासनाचा मागचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे.या शासनाच्या या निर्णयाचा तिन्ही जिल्ह्यांतील किमान लाखभर कुळांना लाभ होणार असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील बेदखल कुळांच्या न्यायहक्कांसाठी लढा देणाºया सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी लोकमतला सांगितले. यामुळे या शासन निर्णयाचे आम्ही स्वागत करत असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ठाणे, पालघर, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह कोकण महसूल विभागाच्या उपायुक्तांची जी समिती नेमली आहे, ती नेमक्या काय शिफारशी करणार, त्यावरच या तिन्ही जिल्ह्यांतील बेदखल कुळांना काय फायदे होतील, हे अवलंबून राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. यासाठी आमची संघटनाही बेदखल कुळांना काय फायदे मिळायला हवेत, याबाबत आपले म्हणणे समितीसमोर मांडणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

तळकोकणातील बेदखल कुळांना मिळाले हे फायदेसामाजिक संघटनांच्या आंदोलनापुढे नमते होऊन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम-४ नुसार अनेक फायदे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मिळवून दिले आहेत. पूर्वी खोत हाच जमिनीचा मालक समजला जात होता. यामुळे जमिनीचा लाभ देताना ती कसणाºया बेदखल कुळांना तो न देता खोतच त्याचे फायदे उचलत होता. परंतु, कायद्यात बदल करून परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून शासनाने बेदखल कुळांना शेतजमिनीचे लाभ मिळवून दिले आहेत. यासाठी सदर जमिनीवर कोणते कूळ कसत आहे, हे ठरवण्यासाठी त्या गावाचा पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवकांसह प्रतिष्ठितांचे दाखले ग्राह्य मानून कुळांना न्याय दिला जात आहे. हाच लाभ आता ठाणे, पालघर, रायगडच्या कुळांनाही मिळावा, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेRaigadरायगडpalgharपालघर