शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

ठाणे, पालघरसह रायगडच्या १ लाख बेदखल कुळांना मिळणार न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 03:28 IST

रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या धर्तीवर नेमली समिती । कोकण आयुक्त सुचविणार शिफारशी

नारायण जाधवठाणे : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बेदखल कुळांसाठी सरकारने ज्याप्रमाणे कायदा बदलून खोतांच्या जाचापासून न्याय मिळवून दिला, त्याच धर्तीवर आता ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील शेतजमीन कसणाऱ्या बेदखल कुळांनाही न्याय देण्याचा निर्णय राज्याच्या महसूल विभागाने घेतला आहे. यासाठी सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत केली असून या समितीने उपरोक्त तिन्ही जिल्ह्यांतील बेदखल कुळांना महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम-४ नुसार विविध लाभ कसे मिळवून देता येतील, याबाबतच्या शिफारशी शासनास येत्या महिनाभरात सादर करायच्या आहेत.

सध्या या तिन्ही जिल्ह्यांत शासनाची समृद्धी मार्गासह विरार-अलिबाग कॉरिडोर, जेएनपीटी ते दिल्ली फे्रट कॉरिडोर, बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा महामार्गासह अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तर, काही प्रस्तावित आहेत. यामुळे भूसंपादनातील कुळांचा राग कमी करण्यासाठी उशिरा का होईना शासनाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यामुळे आंदोलनाची तीव्र धार कमी होईल, असा शासनाचा मागचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे.या शासनाच्या या निर्णयाचा तिन्ही जिल्ह्यांतील किमान लाखभर कुळांना लाभ होणार असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील बेदखल कुळांच्या न्यायहक्कांसाठी लढा देणाºया सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी लोकमतला सांगितले. यामुळे या शासन निर्णयाचे आम्ही स्वागत करत असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ठाणे, पालघर, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह कोकण महसूल विभागाच्या उपायुक्तांची जी समिती नेमली आहे, ती नेमक्या काय शिफारशी करणार, त्यावरच या तिन्ही जिल्ह्यांतील बेदखल कुळांना काय फायदे होतील, हे अवलंबून राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. यासाठी आमची संघटनाही बेदखल कुळांना काय फायदे मिळायला हवेत, याबाबत आपले म्हणणे समितीसमोर मांडणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

तळकोकणातील बेदखल कुळांना मिळाले हे फायदेसामाजिक संघटनांच्या आंदोलनापुढे नमते होऊन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम-४ नुसार अनेक फायदे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मिळवून दिले आहेत. पूर्वी खोत हाच जमिनीचा मालक समजला जात होता. यामुळे जमिनीचा लाभ देताना ती कसणाºया बेदखल कुळांना तो न देता खोतच त्याचे फायदे उचलत होता. परंतु, कायद्यात बदल करून परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून शासनाने बेदखल कुळांना शेतजमिनीचे लाभ मिळवून दिले आहेत. यासाठी सदर जमिनीवर कोणते कूळ कसत आहे, हे ठरवण्यासाठी त्या गावाचा पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवकांसह प्रतिष्ठितांचे दाखले ग्राह्य मानून कुळांना न्याय दिला जात आहे. हाच लाभ आता ठाणे, पालघर, रायगडच्या कुळांनाही मिळावा, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेRaigadरायगडpalgharपालघर