शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

अवघ्या तीन महिन्यांतच विजय सिंघल यांची उचलबांगडी, राजकीय षडयंत्राचे बळी?

By अजित मांडके | Updated: June 25, 2020 00:26 IST

राजकीय मंडळींचे न ऐकल्याने आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आणि महापालिकेतील प्रस्थापित अधिकारी यांच्यात असलेल्या वादामुळेच त्यांची उचलबांगडी झाल्याची माहिती समोर आली आहे.

- अजित मांडकेठाणे : एकीकडे संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेत तब्बल ५ वर्षे आयुक्तपदाची धुरा सांभाळली असताना दुसरीकडे त्यांच्यानंतर आलेले विजय सिंघल यांची अवघ्या तीन महिने, तीन दिवसांत उचलबांगडी करण्यात आली. कोरोना रोखण्यात अपयश आल्याने त्यांची उचलबांगडी झाल्याच्या चर्चा आता शहरात जोर धरूलागल्या आहेत. परंतु, दुसरीकडे राजकीय मंडळींचे न ऐकल्याने आणि प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी आणि महापालिकेतील प्रस्थापित अधिकारी यांच्यात असलेल्या वादामुळेच त्यांची उचलबांगडी झाल्याची माहिती समोर आली आहे.ठाणे शहरात कोरोनाची सुरुवात झाली आणि विजय सिंघल यांची ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. आल्या आल्या त्यांना पालिकेची आर्थिक घडी सावरण्याचे काम करावे लागणार होते. तर कोरोनाच्या मुकाबल्यासाठी त्यांना सिंघम व्हावे लागणार होते. त्यानुसार त्यांनी काही कठोर निर्णय घेण्याचा प्रयत्नही केला. आरोग्य विभागात महागड्या दरात सुरू असलेल्या साहित्य खरेदीला चपराक लावून महागडे प्रस्ताव आणण्यासही नकार दिला. तसेच आरोग्य विभागातील साहित्यांची खरेदी नव्याने करावी असेही सांगितले. यातूनच प्रस्थापित अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवरील आयुक्तांमध्ये वादाची ठिणगी पडली. तर शहरातील काही बड्या राजकीय पुढाऱ्यांकडून आलेल्या वादग्रस्त प्रस्तावही त्यांनी रोखले होते. परंतु, दबाव आल्याने अखेर ते वादग्रस्त प्रस्ताव मंजूर करण्याची नामुष्कीही त्यांच्यावर ओढावली होती. आयुक्त विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात, ते काही कामाचे नाहीत, असे अनेक ठपके त्यांच्यावर जाता जात ठेवले आहेत.असे प्रकार सुरूअसतांनाही त्यांनी आपली साखळी तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. यासाठी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना हाताशी घेतले. तसेच आपल्या मर्जीतील एका अधिकाºयालादेखील वरिष्ठ पातळीवर दबाव टाकून ठाण्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आणले होते, अशीही चर्चा होती. तसेच इतर बड्या अधिकाºयांनादेखील आणून त्यांनी ठाण्यात बैठक घेऊन येथील प्रस्थापित अधिकाºयांना धक्का देण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात होते. यातूनच प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकारी आणि महापालिकेतील प्रस्थापित अधिकारी यांच्यात रोजच्या रोज काही ना काही तू तू मैं मैं सुरूहोती. त्यामुळे काही प्रस्थापित अधिकाºयांनी सिंघल यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. आधीच राजकीय मंडळींचे ऐकत नसल्याने ते अडचणीत होते, त्यात प्रतिनियुक्तवर आलेल्या अधिकाºयांना हाताशी घेऊन त्यांनी आपली साखळी तयार केली होती. त्यामुळेदेखील ते नावडते झाले होते. यामुळे राजकीय मंडळी आणि काही प्रस्थापित अधिकाºयांनी एकत्र येऊन त्यांची विकेट काढल्याचे बोलले जात आहे.>ठाणे समजून घेण्याआधीच विकेटनवनियुक्त आयुक्ताला महापालिकेची गणिते आणि आर्थिक परिस्थिती समजून घेण्यास दोन तीन महिन्यांचा कालावधी हा लागतोच. सिंघल यांची नियुक्ती झाली त्या वेळेस कोरोना वाढत होता, तसेच महापालिकेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठीदेखील त्यांना प्रयत्न करायचे होते. शिवाय येथील राजकीय मंडळी कशी आहेत, त्यांच्याशी कसे मिळवून घ्यायचे यासाठीही कालावधी जाणार होता. परंतु, हे समजून घेण्याआधीच त्यांची विकेट पडली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे