शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

केडीएमसीकडून होतेय पाणीबिलाची सरसकट वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 02:32 IST

केडीएमसीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा गाजावाजा केला असला तरी महापालिका हद्दीतील एक लाख २० हजार नळजोडणीधारकांपैकी केवळ २६ हजार नळजोडणीधारकांना मीटरप्रमाणे पाणी बिले दिली जात आहेत.

कल्याण - केडीएमसीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा गाजावाजा केला असला तरी महापालिका हद्दीतील एक लाख २० हजार नळजोडणीधारकांपैकी केवळ २६ हजार नळजोडणीधारकांना मीटरप्रमाणे पाणी बिले दिली जात आहेत. तर, उर्वरित ७५ टक्के नळजोडणीधारकांकडून केवळ सरसरी पद्धतीने बिले आकारली जात आहेत. त्यामुळे पाणी वापराची योग्य मोजमाप तसेच पाणीबिलाची योग्य वसुली होत नसल्याचे उघडकीस आले आहे.महापालिकेने नळजोडण्यांवर पाणीमीटर बसविण्याचे काम हाती घेतले होते. त्यापैकी ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. एक लाख २० हजार नळजोडण्यांपैकी जवळपास ८० हजार नळ जोडणीधारकांना मीटर बसविले आहे. त्यापैकी केवळ २६ हजार नळजोडणीधारकांना मीटरप्रमाणे पाणीबिल दिले जाते.उर्वरित नळजोडणीधारकांना मीटर लावूनही त्याप्रमाणे पाणीबिले का पाठविली जात नाहीत, याविषयी पाणीपुरवठा विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे पाणीबिलाच्या वसुलीचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. तो मागील वर्षी मांडण्यात आला. दरम्यान आयुक्त बदलेले गेले. त्यामुळे हा प्रस्तावही बारगळला. आमच्या विभागाला मनुष्यबळ हवे असून, ते पुरवले जात नाही. या खात्यातील रिक्त पदे भरा, अशी मागणी करूनही त्याकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. खाजगी कंपनीने महापालिकेस पाणीबिलाची ६० कोटी रुपयांची वसुली करून द्यावी, असा हा प्रस्ताव होता. तर, ६० कोटी रुपयांपेक्षा त्यात वाढ करावी, अशी नगरसेवकांची सूचना होती.स्मार्ट सिटी प्रकल्पात स्मार्ट सेवा , सुविधा पुरविणे हा भाग अंतर्भूत आहे. त्याचबरोबर महापालिकेचा ई-गव्हर्नन्स प्रकल्प हा राज्यात आदर्श ठरला आहे. महापालिकेने ७५ टक्के नळजोडणीधारकांकडून मीटरप्रमाणे बिले घेण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्यास काय हरकत आहे. त्यात अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दाच उद्भवत नाही. महापालिका कोट्यवधी रुपये संगणक विभागावर खर्च करते. त्याचा महापालिकेस काय उपयोग होतो, हा सवाल यातून उपस्थित केला जात आहे.२० हजार बेकायदा नळजोडण्या?बेकायदा नळजोडण्यांचाही मुद्दा महापालिका हद्दीत गाजत आहे. अशा नळजोडण्यांची संख्या जवळपास २० हजार असण्याची शक्यता आहे.महापालिकेने मालमत्ता सर्वेक्षणाचे काम कोलब्रो कंपनीला दिले होते. या कंपनीने केवळ ६५६ बेकायदा नळजोडण्यांचा शोध घेतला होता. या सर्वेक्षणाविषयी सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.त्याचबरोबर डोंबिवली शहरातील अनेक सोसाट्यांमधील पाणीमीटर चोरीला गेली होती. त्यामुळे अशा सोसायट्यांनाही सरसकट पाणीबिल पाठवले जात आहे. तेथील पाणीवापराची नोंदच होत नाही.

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या