शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा बायपाससह पूल दुरुस्तीचे काम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 02:47 IST

मुंब्रा पुलाची व बायपासच्या रस्त्याची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे.

ठाणे : मुंब्रा पुलाची व बायपासच्या रस्त्याची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही माहिती सोमवारी दिली. यामुळे त्यांनी अभियंत्यांवर तीव्र संताप व्यक्त करून यापुढे विलंब करू नका, अशी तंबी दिली.कोणत्याही परिस्थितीत ही वेळ पाळली जावी, असे सांगून पालकमंत्र्यांनी सर्व पालिका हद्दीतील व ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे पॉलिमरसारखे तंत्रज्ञान, रेडिमिक्स वगैरेसारख्या पद्धतीने तातडीने बुजवावेत, पोलिसांना मदत करण्यासाठी १०० वाहतूक वॉर्डन एमएसआरडीसीने द्यावेत, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनीदेखील वाहतूककोंडी दूर करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीत मुंब्रा बायपासदुरु स्ती तसेच ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी परिसरात होणारी वाहतूककोंडी यावर विस्तृत चर्चा झाली.सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेलचे अभियंता आर.एस. पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, १० सप्टेंबरपर्यंत पूल व बायपासची दुरु स्ती पूर्ण होईल. मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंब्रा रस्त्यावरील काही भाग खचला, त्यामुळे नवी समस्या निर्माण झाली. या रस्त्यालगत राहणाºया काही कुटुंबांना ठाणे पालिकेने तात्पुरती निवासव्यवस्था केली, पण ती कुटुंबे तिथून न गेल्याने दुरु स्तीला उशीर होत असल्याचे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबे हलवण्याची व्यवस्था करू, असे सांगितले. गॅमन चौक येथील दुरु स्तीदेखील तितकीच महत्त्वाची असल्यामुळे त्यावर यावेळी चर्चा झाली. यानुसार, २५ आॅगस्टपर्यंत ही दुरुस्ती पूर्ण झाली पाहिजे, असा दम पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना भरला.>एफएम वाहिनीचीमदत घेणारवाहतूककोंडीबाबत तक्रारींवर त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच वाहनधारक आणि नागरिकांना वाहतूककोंडी किंवा रस्तेदुरुस्तीची अद्ययावत माहिती मिळाली पाहिजे, अशी सूचना प्रवासी महासंघाचे मिलिंद बल्लाळ यांनी केली. यावर पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी एफएम रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून ठाणे आयुक्तालयातील वाहतूक नियंत्रण कक्ष हा सातत्याने अशी माहिती पुरवत राहील, अशी व्यवस्था करण्याचे मान्य केले.>वाहतुकीवर नियंत्रणभिवंडी येथील गोदामांच्या वाहतुकीस नियंत्रणात आणले व त्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली, तर बराच प्रश्न सुटेल, असे यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले. भिवंडीतील वाहनचालकांच्या संघटनांशी बोलून त्या भागातील वाहतूक नियंत्रित करावी तसेच अवजड व जड वाहनांचे वेळापत्रक निश्चित करावे, असे प्रांताधिकारी मोहन नळदकर यांनी स्पष्ट केले. उरण-जेएनपीटी तसेच पालघरकडून येणारी वाहनेदेखील नियंत्रित करण्याच्या सूचना होत्या. पत्रीपुलाच्या उंचीचे अडथळे थोडे अधिक उंच करण्यात यावेत, जेणेकरून टेम्पो वगैरेंसारखी वाहने जाऊ शकतील, अशी सूचना वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी केली.>नोडल अधिकाºयांची नियुक्तीजिल्ह्यातील वाहतूककोंडीबाबत सर्व संबंधित यंत्रणांसमवेत समन्वय साधण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील समन्वय अधिकारी राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रश्न सोडवताना अडचणी आल्यास या दोघांशी यंत्रणांनी संपर्क साधावा, असे ते म्हणाले. प्रवासी संघटना, टॅक्सी संघटना, ओला-उबेर यांचा सहभाग असलेली वाहतूक सल्लागार समिती नेमण्याचे ठरवण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांचे स्पष्ट केले.>१०० वाहतूक वॉर्डनवाहतूककोंडी दूर करण्यासाठी खड्डे बुजवणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्व ठिकाणी किमान मध्यरात्रीच्या वेळी पालिकांनी ते बुजवण्याची प्रक्रिया प्राधान्याने करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सध्या पोलिसांना मदतीसाठी दिलेले वाहतूक वॉर्डन अपुरे असून १०० वॉर्डन एमएसआरडीसीने द्यावेत, असेही ते म्हणाले. वाहतूककोंडीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना, वाहनधारकांना मोठा फटका बसत असून सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून या प्रश्नाकडे पाहावे व लोकांची गैरसोय होणार नाही, असे पाहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.