शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

मुंब्रा बायपाससह पूल दुरुस्तीचे काम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 02:47 IST

मुंब्रा पुलाची व बायपासच्या रस्त्याची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे.

ठाणे : मुंब्रा पुलाची व बायपासच्या रस्त्याची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही माहिती सोमवारी दिली. यामुळे त्यांनी अभियंत्यांवर तीव्र संताप व्यक्त करून यापुढे विलंब करू नका, अशी तंबी दिली.कोणत्याही परिस्थितीत ही वेळ पाळली जावी, असे सांगून पालकमंत्र्यांनी सर्व पालिका हद्दीतील व ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे पॉलिमरसारखे तंत्रज्ञान, रेडिमिक्स वगैरेसारख्या पद्धतीने तातडीने बुजवावेत, पोलिसांना मदत करण्यासाठी १०० वाहतूक वॉर्डन एमएसआरडीसीने द्यावेत, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनीदेखील वाहतूककोंडी दूर करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीत मुंब्रा बायपासदुरु स्ती तसेच ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी परिसरात होणारी वाहतूककोंडी यावर विस्तृत चर्चा झाली.सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेलचे अभियंता आर.एस. पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, १० सप्टेंबरपर्यंत पूल व बायपासची दुरु स्ती पूर्ण होईल. मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंब्रा रस्त्यावरील काही भाग खचला, त्यामुळे नवी समस्या निर्माण झाली. या रस्त्यालगत राहणाºया काही कुटुंबांना ठाणे पालिकेने तात्पुरती निवासव्यवस्था केली, पण ती कुटुंबे तिथून न गेल्याने दुरु स्तीला उशीर होत असल्याचे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबे हलवण्याची व्यवस्था करू, असे सांगितले. गॅमन चौक येथील दुरु स्तीदेखील तितकीच महत्त्वाची असल्यामुळे त्यावर यावेळी चर्चा झाली. यानुसार, २५ आॅगस्टपर्यंत ही दुरुस्ती पूर्ण झाली पाहिजे, असा दम पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना भरला.>एफएम वाहिनीचीमदत घेणारवाहतूककोंडीबाबत तक्रारींवर त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच वाहनधारक आणि नागरिकांना वाहतूककोंडी किंवा रस्तेदुरुस्तीची अद्ययावत माहिती मिळाली पाहिजे, अशी सूचना प्रवासी महासंघाचे मिलिंद बल्लाळ यांनी केली. यावर पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी एफएम रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून ठाणे आयुक्तालयातील वाहतूक नियंत्रण कक्ष हा सातत्याने अशी माहिती पुरवत राहील, अशी व्यवस्था करण्याचे मान्य केले.>वाहतुकीवर नियंत्रणभिवंडी येथील गोदामांच्या वाहतुकीस नियंत्रणात आणले व त्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली, तर बराच प्रश्न सुटेल, असे यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले. भिवंडीतील वाहनचालकांच्या संघटनांशी बोलून त्या भागातील वाहतूक नियंत्रित करावी तसेच अवजड व जड वाहनांचे वेळापत्रक निश्चित करावे, असे प्रांताधिकारी मोहन नळदकर यांनी स्पष्ट केले. उरण-जेएनपीटी तसेच पालघरकडून येणारी वाहनेदेखील नियंत्रित करण्याच्या सूचना होत्या. पत्रीपुलाच्या उंचीचे अडथळे थोडे अधिक उंच करण्यात यावेत, जेणेकरून टेम्पो वगैरेंसारखी वाहने जाऊ शकतील, अशी सूचना वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी केली.>नोडल अधिकाºयांची नियुक्तीजिल्ह्यातील वाहतूककोंडीबाबत सर्व संबंधित यंत्रणांसमवेत समन्वय साधण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील समन्वय अधिकारी राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रश्न सोडवताना अडचणी आल्यास या दोघांशी यंत्रणांनी संपर्क साधावा, असे ते म्हणाले. प्रवासी संघटना, टॅक्सी संघटना, ओला-उबेर यांचा सहभाग असलेली वाहतूक सल्लागार समिती नेमण्याचे ठरवण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांचे स्पष्ट केले.>१०० वाहतूक वॉर्डनवाहतूककोंडी दूर करण्यासाठी खड्डे बुजवणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्व ठिकाणी किमान मध्यरात्रीच्या वेळी पालिकांनी ते बुजवण्याची प्रक्रिया प्राधान्याने करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सध्या पोलिसांना मदतीसाठी दिलेले वाहतूक वॉर्डन अपुरे असून १०० वॉर्डन एमएसआरडीसीने द्यावेत, असेही ते म्हणाले. वाहतूककोंडीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना, वाहनधारकांना मोठा फटका बसत असून सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून या प्रश्नाकडे पाहावे व लोकांची गैरसोय होणार नाही, असे पाहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.