शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मुंब्रा बायपाससह पूल दुरुस्तीचे काम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 02:47 IST

मुंब्रा पुलाची व बायपासच्या रस्त्याची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे.

ठाणे : मुंब्रा पुलाची व बायपासच्या रस्त्याची दुरुस्ती १० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही माहिती सोमवारी दिली. यामुळे त्यांनी अभियंत्यांवर तीव्र संताप व्यक्त करून यापुढे विलंब करू नका, अशी तंबी दिली.कोणत्याही परिस्थितीत ही वेळ पाळली जावी, असे सांगून पालकमंत्र्यांनी सर्व पालिका हद्दीतील व ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे पॉलिमरसारखे तंत्रज्ञान, रेडिमिक्स वगैरेसारख्या पद्धतीने तातडीने बुजवावेत, पोलिसांना मदत करण्यासाठी १०० वाहतूक वॉर्डन एमएसआरडीसीने द्यावेत, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनीदेखील वाहतूककोंडी दूर करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीत मुंब्रा बायपासदुरु स्ती तसेच ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी परिसरात होणारी वाहतूककोंडी यावर विस्तृत चर्चा झाली.सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेलचे अभियंता आर.एस. पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, १० सप्टेंबरपर्यंत पूल व बायपासची दुरु स्ती पूर्ण होईल. मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंब्रा रस्त्यावरील काही भाग खचला, त्यामुळे नवी समस्या निर्माण झाली. या रस्त्यालगत राहणाºया काही कुटुंबांना ठाणे पालिकेने तात्पुरती निवासव्यवस्था केली, पण ती कुटुंबे तिथून न गेल्याने दुरु स्तीला उशीर होत असल्याचे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबे हलवण्याची व्यवस्था करू, असे सांगितले. गॅमन चौक येथील दुरु स्तीदेखील तितकीच महत्त्वाची असल्यामुळे त्यावर यावेळी चर्चा झाली. यानुसार, २५ आॅगस्टपर्यंत ही दुरुस्ती पूर्ण झाली पाहिजे, असा दम पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना भरला.>एफएम वाहिनीचीमदत घेणारवाहतूककोंडीबाबत तक्रारींवर त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच वाहनधारक आणि नागरिकांना वाहतूककोंडी किंवा रस्तेदुरुस्तीची अद्ययावत माहिती मिळाली पाहिजे, अशी सूचना प्रवासी महासंघाचे मिलिंद बल्लाळ यांनी केली. यावर पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी एफएम रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून ठाणे आयुक्तालयातील वाहतूक नियंत्रण कक्ष हा सातत्याने अशी माहिती पुरवत राहील, अशी व्यवस्था करण्याचे मान्य केले.>वाहतुकीवर नियंत्रणभिवंडी येथील गोदामांच्या वाहतुकीस नियंत्रणात आणले व त्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली, तर बराच प्रश्न सुटेल, असे यावेळी जिल्हाधिकाºयांनी सांगितले. भिवंडीतील वाहनचालकांच्या संघटनांशी बोलून त्या भागातील वाहतूक नियंत्रित करावी तसेच अवजड व जड वाहनांचे वेळापत्रक निश्चित करावे, असे प्रांताधिकारी मोहन नळदकर यांनी स्पष्ट केले. उरण-जेएनपीटी तसेच पालघरकडून येणारी वाहनेदेखील नियंत्रित करण्याच्या सूचना होत्या. पत्रीपुलाच्या उंचीचे अडथळे थोडे अधिक उंच करण्यात यावेत, जेणेकरून टेम्पो वगैरेंसारखी वाहने जाऊ शकतील, अशी सूचना वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी केली.>नोडल अधिकाºयांची नियुक्तीजिल्ह्यातील वाहतूककोंडीबाबत सर्व संबंधित यंत्रणांसमवेत समन्वय साधण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील समन्वय अधिकारी राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्रश्न सोडवताना अडचणी आल्यास या दोघांशी यंत्रणांनी संपर्क साधावा, असे ते म्हणाले. प्रवासी संघटना, टॅक्सी संघटना, ओला-उबेर यांचा सहभाग असलेली वाहतूक सल्लागार समिती नेमण्याचे ठरवण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांचे स्पष्ट केले.>१०० वाहतूक वॉर्डनवाहतूककोंडी दूर करण्यासाठी खड्डे बुजवणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्व ठिकाणी किमान मध्यरात्रीच्या वेळी पालिकांनी ते बुजवण्याची प्रक्रिया प्राधान्याने करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सध्या पोलिसांना मदतीसाठी दिलेले वाहतूक वॉर्डन अपुरे असून १०० वॉर्डन एमएसआरडीसीने द्यावेत, असेही ते म्हणाले. वाहतूककोंडीमुळे जिल्ह्यातील नागरिकांना, वाहनधारकांना मोठा फटका बसत असून सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून या प्रश्नाकडे पाहावे व लोकांची गैरसोय होणार नाही, असे पाहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.