शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जिल्हा परिषदेच्या बदल्यांमधील सेवा जेष्ठ शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे न्यायायलीन आदेश; १० मेला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 19:45 IST

  कागदपत्र तपासणी टाळली जात असलेल्या संवर्ग तीन व चार प्रमाणेच अवघड नसलेली शाळा अवघड क्षेत्रात असल्याची खोटी माहिती देऊन काही शिक्षकांना सोयीच्या शाळांवर प्राधान्याने बदली मिळाली आहे. त्या विरोधातही शिक्षकांमध्ये तीव्र संताप आहे. एवढेच नव्हे तर पतीपत्नी एकत्रीकरणाच्या बदलीसाठी देखील काही शिक्षकांनी खोटी माहिती देऊन या निकषाचा लाभ घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधीत शिक्षकांवर अन्याय झाल्यामुळे त्यांच्यातही तीव्र संताप आहे. याकडे देखील सीईओ यांच्यासह शिक्षणाधिकाऱ्यानी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आॅनलाइन बदल्यांचा हा घोळ पुन्हा वाढत जाण्याची शक्यता काही जाणकार शिक्षकांकडून सांगितली जात आहे.

ठळक मुद्दे१० मे रोजी पहिली सुनावणी विभागीय आयुक्तालयांच्या दालनात पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन घोळ या आधीच लोकमतने उघड केलेला आहे

ठाणे : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिकशिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या सुमारे दोन महिन्यापूर्वी झाल्या. सेवा जेष्ठता असूनही बदल्यांमध्ये अन्याय झाल्यामुळे बहुतांशी शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यास अनुसरून विभागीय आयुक्तांनी या शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यावर १० मे रोजी पहिली सुनावणी विभागीय आयुक्तालयांच्या दालनात होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हिरालाल सोनावणे यांनी लोकमतला सांगितले.कोकणातील ठाणेसह, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये सेवा जेष्ठता असलेल्या शिक्षकांना प्राधान्याने जवळच्या शाळेवर बदली होणे अपेक्षित होते. मात्र ही सेवा जेष्ठता डावलल्याने संबंधीत शिक्षकाना प्राधान्यक्रमाची शाळा मिळाली नाही. यामुळे या पाच ही जिल्हह्यातील शिक्षकांनी एकत्र येऊन न्यायालयात धाव घेतली असता त्यावर सुनावणी होऊन विभागीय आयुक्ताना या शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे आदेश न्यायालयाने जारी केले आहेत. त्यास अनुसरून विभागीय आयुक्तांकडे पहिल्या टप्यातील सुनावणीचे नियोजन १० मे रोजी करण्यात आले आहेत.या ऑनलाइन बदल्यांमधील झालेला घोळ या आधीच लोकमतने उघड केलेला आहे. त्याची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी संबंधीत सीईओंना शिक्षकांच्या तक्रारींची सखोपणे चौकशी करून अभिप्राय देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यावर अजून काम सुरूच आहे. त्यातील घोळ मिटण्या आधीच सेवा जेष्ठतेचा विचार न करता शिक्षकांच्या नको असलेल्या ठिकाणच्या शाळांवर बदली करण्याचा पराक्रम करण्यात आला. या प्रमाणेच शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी ठाणे सीईओंनी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देऊन चौकशी करण्यास भाग पाडले आहेत. पण त्यातही शिक्षणाधिकाऱ्यांनी केवळ संवर्ग १ व २ नुसार बदली झालेल्या शिक्षकांचे कागदपत्रे तपासणीसाठी मागीतले. या तपासणीतून सर्वाधिक व प्रशासनाची फसवणूक झालेले संवर्ग तीन व चारच्या बदलीसाठी वापरलेले कागदपत्रे तपासणी शिक्षणविभागाने सोयीस्कररित्या टाळले जात असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.      कागदपत्र तपासणी टाळली जात असलेल्या संवर्ग तीन व चार प्रमाणेच अवघड नसलेली शाळा अवघड क्षेत्रात असल्याची खोटी माहिती देऊन काही शिक्षकांना सोयीच्या शाळांवर प्राधान्याने बदली मिळाली आहे. त्या विरोधातही शिक्षकांमध्ये तीव्र संताप आहे. एवढेच नव्हे तर पतीपत्नी एकत्रीकरणाच्या बदलीसाठी देखील काही शिक्षकांनी खोटी माहिती देऊन या निकषाचा लाभ घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधीत शिक्षकांवर अन्याय झाल्यामुळे त्यांच्यातही तीव्र संताप आहे. याकडे देखील सीईओ यांच्यासह शिक्षणाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ऑनलाइन बदल्यांचा हा घोळ पुन्हा वाढत जाण्याची शक्यता काही जाणकार शिक्षकांकडून सांगितली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेTeacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा