शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

ठाण्याच्या निवडणुकीत तरुणाईची मते ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:00 AM

उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदार संघात आता शिवसेनेने विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांचा सामना राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्याशी होणार आहे.

- अजित मांडकेठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघात २३ लाख ७ हजार १८९ मतदार एवढे असून यामध्ये पुरुष १२ लाख ६० हजार ८१ स्त्री मतदारांची संख्या १० लाख ४७ हजार १०८ एवढी आहे. मागील वेळेच्या तुलनेत स्त्री मतदारांच्या संख्येत सुमारे ९ टक्के वाढ झाली असली तरी १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या १३ हजार ४७ एवढी असून २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या ही ३ लाख १५ हजार ९९२ एवढी आहे. ही वाढलेली तरुणांची मतेच या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्टÑवादीच्या उमेदवारांनी त्यांना आकर्षित करण्यासाठी आपला मोर्चा सोशल मिडियावरील प्रचाराकडे वळविला आहे.उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदार संघात आता शिवसेनेने विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांचा सामना राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांच्याशी होणार आहे. त्यामुळे पूर्वीचा शिवसैनिक विरुद्ध विद्यमान शिवसैनिक अशीच ही लढत होणार असून तिला शिक्षित विरुद्ध अल्पशिक्षित असा रंग दिला जात आहे. मनसेने अपेक्षेप्रमाणे आपल्या इंजिनाला राष्टÑवादीचे घड्याळ बांधल्याने त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. आपचे ठाणे मतदार संघातील कार्य फारसे उल्लेखनिय नसले तरी त्यांची निर्णायक मते कोणाच्या पारड्यात जाणार हे गुलदस्त्यात आहे. एकूणच ठाणे लोकसभा मतदार संघात कांटे की टक्कर होणार हे मात्र नक्की.ठाणे लोकसभा मतदार संघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संजीव नाईक यांनी राष्टÑवादीच्या तिकीटावर या मतदार संघावर कब्जा केला. मात्र, त्यांना येथे फार काळ सत्ता टिकविता आली नाही. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत शिवसेनेने राजन विचारे यांना संधी दिली आणि त्यांनी संजीव नाईक यांचा २ लाख ८५ हजार मतांना पराभव केला. मधल्या काळात मोदी लाट ओसरल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे त्याचा फायदा राष्टÑवादी घेईल असे वाटत होते. त्यानुसार नाईक फॅमिलीमधील कोणीतरी ही निवडणूक लढवेल अशी शक्यता होती. परंतु, त्यांनी माघार घेतल्याने राष्टÑवादीने ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गणात उतरले आहेत. बहुजन वंचित आघाडीकडून नवी मुंबईस्थित मल्लीकाअर्जुन पुजारी यांचे नाव निश्चित झाले आहे. तर महाराष्टÑ क्रांती सेनेने रवींद्र साळुंखे यांचे नाव घोषीत केले आहे.परंतु खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राष्टÑवादी अशीच होणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचाा २ लाख ८५ हजार मतांनी विजय झाला होता. त्यानंतर विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्येसुद्धा युतीचे पारडे जड राहिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पुन्हा तोच करिष्मा होईल असा दावा शिवसेना करीत आहे. परंतु राष्टÑवादीने परांजपे यांना उमेदवारी दिली आहे. शहरात काही दिवसांपूर्वी एक बॅनर लागला होता. त्यावर बॅनरवर आपला खासदार कसा असावा उच्च शिक्षित की अल्पशिक्षित असा उल्लेख सवाल केला होता. त्यानंतर भाजपाचे माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी याच मुद्याला धरून सोशल मिडियावर उच्च शिक्षिताच्या बाजूने भूमिका मांडली होती. त्यामुळे येत्या काळात प्रचाराचा हाच मुद्दा घेऊन राष्टÑवादी मैदानात उतरेल, अशी शक्यता आहे. परांजपे यांचे बी.ई. मॅकेनिकल आणि एमबीए (मार्केटिंग) असे शिक्षण झाले आहे. परंतु विचारे हे १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर सुद्धा हाच प्रचार सुरू असून त्याचा परिणाम ठाणे लोकसभा मतदार संघात वाढलेल्या तरुण मतदारांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे. शिवाय परांजपे हे पूर्वीचे शिवसैनिकच असल्याने आणि त्यांचे वडील प्रकाश परांजपे यांनी लोकसभेची कारकिर्द गाजविली असल्याने त्यांच्या नावाचा किती फायदा आनंद यांना होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.मनसेच्या इंजिनाला राष्टÑवादीचे घड्याळमनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेची लढाई ही मोदी विरोधी असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर धूळवडीच्या दिवशी ठाण्यात मनसेच्या इंजिनाला राष्टÑवादीचे घड्याळ जोडले जाऊन आमचा रंग एकच असे दाखविण्यात आले. त्यामुळे मनसेची मते आता या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत. मागील निवडणुकीत मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकीत मनसेचे पानीपत झाल्याने आता किती मतांचा टक्का राष्टÑवादीला मिळणार हे निकालाच्या दिवशी समजणार आहे.आपची भूमिका गुलदस्त्यातमागील निवडणुकीत आप ने सुद्धा आपला उमेदवार उभा केला होता. संजीव साने यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ४१ हजार ५३५ मते मिळाली होती. परंतु त्यानंतर विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत आप कुठेही दिसून आला नाही. ठाण्यात आंदोलनाच्या माध्यमातून आपचे काही पदाधिकारी मात्र चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत किती मते त्यांच्याकडे आहेत, आणि ती कोणाच्या पारड्यात जाणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :thaneठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक