शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात; सर्वत्र सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:39 IST

दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला, रूग्णांना होत आहे त्रास

मीरा रोड / भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या व सध्या सरकारकडे तीन महिन्यांसाठी नियोजन दिलेल्या भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाचेच आरोग्य बिघडले आहे. विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या या रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या पाइपातून सांडपाणी वाहत असून ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ साचले आहे. ही टाकीही उघडी असून सांडपाणी व दुर्गंधीमुळे रुग्णांसह कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली वैद्यकीय सेवा मिळावी आणि खाजगी रुग्णालयाच्या मनमानी लूटमारीतून सुटका मिळावी म्हणून तत्कालीन जनता दलाचे नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाच्या आदेशाने महापालिका आणि सत्ताधाऱ्यांना रुग्णालय बांधून ते सुरू करणे भाग पाडले. २०० खाटांचे हे रुग्णालय असले, तरी पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे आजही शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग, आवश्यक डॉक्टर व यंत्रणाच उपलब्ध झाली नाही. यातूनच रुग्ण दगावण्याचे तसेच रेल्वेत बाळंत होण्याचे प्रकार घडले. याशिवाय, विविध प्रकरणांनी रुग्णालय नेहमीच वादग्रस्त राहिले.रुग्णालय सक्षमपणे चालवण्याऐवजी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ते सरकारच्या माथी मारण्याचा खटाटोप सतत केला. तर, सरकारकडूनही पालिकेने आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही म्हणून रुग्णालय घेतले नाही. अखेर, तीन महिन्यांत पालिका सर्व प्रलंबित कामे करून देईल, या अटींवर केवळ व्यवस्थापन सरकाच्या आरोग्य विभागाने घेतले आहे. तर, बाकी सर्व सुविधा, कर्मचारी पुरवणे, देखभाल आदी जबाबदारी पालिकेचीच आहे. परंतु, पालिकेच्या ढिसाळ आणि उदासीन कारभारामुळे जोशी रुग्णालयाच्या व्यथा काही संपता संपत नाहीत.रुग्णालयाच्या स्वच्छतागृहाचे पाइप गळत असल्याने रुग्णालय परिसरात सांडपाणी साचले आहे. सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच, रुग्णालयाच्या पिण्याच्या पाण्याची टाकी येथे आहे. या टाकीचे झाकण तर नेहमीच अर्धवट उघडे असते. त्याभोवती सांडपाण्याचे तळे साचलेले आहे.प्रशासनाची डोळेझाकसांडपाण्यामुळे दुर्गंधी व डासांच्या त्रासाने रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचारी, येणारे नागरिक व परिसरातील रहिवाशीही ग्रासले आहेत. त्यातच, पाण्याची टाकीही सांडपाण्याच्या विळख्यात आल्याने रुग्ण आदींना होणारा पाणीपुरवठाही सुरक्षित राहिलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून सांडपाण्याची गळती, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असतानाही महापालिका प्रशासनाने याकडे डोळेझाक चालवली आहे.