शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात; सर्वत्र सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:39 IST

दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला, रूग्णांना होत आहे त्रास

मीरा रोड / भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या व सध्या सरकारकडे तीन महिन्यांसाठी नियोजन दिलेल्या भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाचेच आरोग्य बिघडले आहे. विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या या रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या पाइपातून सांडपाणी वाहत असून ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ साचले आहे. ही टाकीही उघडी असून सांडपाणी व दुर्गंधीमुळे रुग्णांसह कर्मचारी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली वैद्यकीय सेवा मिळावी आणि खाजगी रुग्णालयाच्या मनमानी लूटमारीतून सुटका मिळावी म्हणून तत्कालीन जनता दलाचे नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाच्या आदेशाने महापालिका आणि सत्ताधाऱ्यांना रुग्णालय बांधून ते सुरू करणे भाग पाडले. २०० खाटांचे हे रुग्णालय असले, तरी पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे आजही शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभाग, आवश्यक डॉक्टर व यंत्रणाच उपलब्ध झाली नाही. यातूनच रुग्ण दगावण्याचे तसेच रेल्वेत बाळंत होण्याचे प्रकार घडले. याशिवाय, विविध प्रकरणांनी रुग्णालय नेहमीच वादग्रस्त राहिले.रुग्णालय सक्षमपणे चालवण्याऐवजी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ते सरकारच्या माथी मारण्याचा खटाटोप सतत केला. तर, सरकारकडूनही पालिकेने आवश्यक बाबींची पूर्तता केली नाही म्हणून रुग्णालय घेतले नाही. अखेर, तीन महिन्यांत पालिका सर्व प्रलंबित कामे करून देईल, या अटींवर केवळ व्यवस्थापन सरकाच्या आरोग्य विभागाने घेतले आहे. तर, बाकी सर्व सुविधा, कर्मचारी पुरवणे, देखभाल आदी जबाबदारी पालिकेचीच आहे. परंतु, पालिकेच्या ढिसाळ आणि उदासीन कारभारामुळे जोशी रुग्णालयाच्या व्यथा काही संपता संपत नाहीत.रुग्णालयाच्या स्वच्छतागृहाचे पाइप गळत असल्याने रुग्णालय परिसरात सांडपाणी साचले आहे. सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच, रुग्णालयाच्या पिण्याच्या पाण्याची टाकी येथे आहे. या टाकीचे झाकण तर नेहमीच अर्धवट उघडे असते. त्याभोवती सांडपाण्याचे तळे साचलेले आहे.प्रशासनाची डोळेझाकसांडपाण्यामुळे दुर्गंधी व डासांच्या त्रासाने रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचारी, येणारे नागरिक व परिसरातील रहिवाशीही ग्रासले आहेत. त्यातच, पाण्याची टाकीही सांडपाण्याच्या विळख्यात आल्याने रुग्ण आदींना होणारा पाणीपुरवठाही सुरक्षित राहिलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून सांडपाण्याची गळती, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असतानाही महापालिका प्रशासनाने याकडे डोळेझाक चालवली आहे.