शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

जोशी रुग्णालयाला गळती

By admin | Updated: June 15, 2016 01:01 IST

पालिकेने जानेवारी २०१६ मध्ये लोकार्पण केलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला अवघ्या पाच वर्षांतच गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

भार्इंदर : पालिकेने जानेवारी २०१६ मध्ये लोकार्पण केलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला अवघ्या पाच वर्षांतच गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने बांधकामासाठी झालेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.पालिकेने १६ एप्रिल २००७ च्या महासभेतील ठरावानुसार भार्इंदर पश्चिमेस सुमारे २०० खाटांच्या चार मजली टेंभा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम २०११ मध्ये पूर्ण केले. हे रुग्णालय चालवणे आवाक्याबाहेर असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ते राज्य सरकार किंवा सेवाभावी, धर्मादाय संस्थेमार्फत चालवण्याचा प्रस्ताव १४ डिसेंबर २०१२ च्या महासभेत मंजूर केला. परंतु, उच्च न्यायालयात २००६ मध्ये दाखल जनहित याचिकेनुसार हे रुग्णालय पालिकेनेच सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे पालिकेने ६ मार्च २०१३ रोजी न्यायालयात रुग्णालय हस्तांतरणाला परवानगी मिळण्याच्या उद्देशाने केलेला दिवाणी अर्ज २८ मार्च २०१४ च्या सुनावणीवेळी फेटाळला. रुग्णालय चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने ते सरकारने चालवावे, यासाठी पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही पालिकेचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे रुग्णालय सुरू करण्यासाठीची आर्थिक समस्या मार्गी लागावी, यासाठी पालिकेने अंदाजपत्रकातील तरतुदीखेरीज अशासकीय देणग्यांतून निधी जमवण्याचा प्रस्ताव जानेवारी २०१५ मध्ये तयार केला. त्याला २ मार्च २०१५ च्या महासभेत मंजुरी देण्यात आली. अशासकीय देणग्या स्वीकारण्याचे धोरण १७ जून २०१५ च्या महासभेत ठरवण्यात आले. त्याला शहरातील अनेक उद्योजकांनी भरभरून सहकार्य केले. त्या देणग्यांच्या जोरावर १० जानेवारी २०१६ रोजी प्रशासनाने रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पाडला. त्यावेळी रुग्णालयाच्या इमारतीसाठी २३ कोटी तर इतर खर्चापोटी पाच कोटींचा खर्च केला. न्यायालयीन वादासह आर्थिक ताळमेळ बसवण्यात रुग्णालय सुरू होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागला. बांधकाम सुरू असताना त्याकडे प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाल्याने ते निकृष्ट दर्जाचे ठरल्याचा प्रत्यय या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून होणाऱ्या गळतीवरून येत आहे. (प्रतिनिधी)नागरिकांच्या पैशांचा अपव्यय याबाबत, रुग्णालयाचा पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे म्हणाले, इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, लागलेल्या गळतीमुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय झाला आहे. याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होऊन होणारे नुकसान त्यांच्याकडून भरून घ्यावे. आठ दिवसांपूर्वीच केली पाहणीआयुक्त अच्युत हांगे म्हणाले की, आठ दिवसांपूर्वीच स्वत: पाहणी करून संबंधित कंत्राटदाराला काम त्वरित पूर्ण करण्यास सांगितले आहे.