शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जोशी रुग्णालयाला गळती

By admin | Updated: June 15, 2016 01:01 IST

पालिकेने जानेवारी २०१६ मध्ये लोकार्पण केलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला अवघ्या पाच वर्षांतच गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

भार्इंदर : पालिकेने जानेवारी २०१६ मध्ये लोकार्पण केलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला अवघ्या पाच वर्षांतच गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने बांधकामासाठी झालेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.पालिकेने १६ एप्रिल २००७ च्या महासभेतील ठरावानुसार भार्इंदर पश्चिमेस सुमारे २०० खाटांच्या चार मजली टेंभा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम २०११ मध्ये पूर्ण केले. हे रुग्णालय चालवणे आवाक्याबाहेर असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ते राज्य सरकार किंवा सेवाभावी, धर्मादाय संस्थेमार्फत चालवण्याचा प्रस्ताव १४ डिसेंबर २०१२ च्या महासभेत मंजूर केला. परंतु, उच्च न्यायालयात २००६ मध्ये दाखल जनहित याचिकेनुसार हे रुग्णालय पालिकेनेच सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे पालिकेने ६ मार्च २०१३ रोजी न्यायालयात रुग्णालय हस्तांतरणाला परवानगी मिळण्याच्या उद्देशाने केलेला दिवाणी अर्ज २८ मार्च २०१४ च्या सुनावणीवेळी फेटाळला. रुग्णालय चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने ते सरकारने चालवावे, यासाठी पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही पालिकेचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे रुग्णालय सुरू करण्यासाठीची आर्थिक समस्या मार्गी लागावी, यासाठी पालिकेने अंदाजपत्रकातील तरतुदीखेरीज अशासकीय देणग्यांतून निधी जमवण्याचा प्रस्ताव जानेवारी २०१५ मध्ये तयार केला. त्याला २ मार्च २०१५ च्या महासभेत मंजुरी देण्यात आली. अशासकीय देणग्या स्वीकारण्याचे धोरण १७ जून २०१५ च्या महासभेत ठरवण्यात आले. त्याला शहरातील अनेक उद्योजकांनी भरभरून सहकार्य केले. त्या देणग्यांच्या जोरावर १० जानेवारी २०१६ रोजी प्रशासनाने रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पाडला. त्यावेळी रुग्णालयाच्या इमारतीसाठी २३ कोटी तर इतर खर्चापोटी पाच कोटींचा खर्च केला. न्यायालयीन वादासह आर्थिक ताळमेळ बसवण्यात रुग्णालय सुरू होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागला. बांधकाम सुरू असताना त्याकडे प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाल्याने ते निकृष्ट दर्जाचे ठरल्याचा प्रत्यय या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून होणाऱ्या गळतीवरून येत आहे. (प्रतिनिधी)नागरिकांच्या पैशांचा अपव्यय याबाबत, रुग्णालयाचा पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे म्हणाले, इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, लागलेल्या गळतीमुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय झाला आहे. याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होऊन होणारे नुकसान त्यांच्याकडून भरून घ्यावे. आठ दिवसांपूर्वीच केली पाहणीआयुक्त अच्युत हांगे म्हणाले की, आठ दिवसांपूर्वीच स्वत: पाहणी करून संबंधित कंत्राटदाराला काम त्वरित पूर्ण करण्यास सांगितले आहे.