शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

जितेंद्र आव्हाडांच्या रिपोर्टवरून पक्षात मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 02:15 IST

ठाणेकरांची चिंता वाढली : मिलिंद पाटील, आनंद परांजपेंची परस्परविरोधी मते

ठाणे : आपला कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: दिली. मात्र, आव्हाड यांचा पहिला रिपोर्ट हा पॉझिटिव्ह होता, असा धक्कादायक खुलासा त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला. तर दुसरीकडे राष्टÑवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी मात्र आव्हाड यांचा पहिला रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याचा दावा केला. त्यामुळे यातील नेमके खरे कोण बोलतोय असा प्रश्न ठाणेकरांना पडला असून नेत्यांमधील या मतभेदांमुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

ठाण्यात सोमवारी एकाच दिवशी ३० कोरोनाचे रुग्ण आढळले. यामध्ये आव्हाड यांचे ५ सुरक्षारक्षक, आचारी २ कार्यकर्ते, काही अधिकारी अशा तब्बल १४ जणांचा समावेश होता. मात्र, आपला रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत समाजसेवेच्या माध्यमातून कळवा, मुंब्य्रात अनेक नागरिकांना मदत केली असून त्यांच्या पोटाची खळगी भरण्याचे काम केले असल्याने दक्षता म्हणून घरातच क्वॉरंटाइन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण स्वखर्चातून ८० हून अधिक जणांची कोरोना चाचणी करून घेतली आहे. त्यातील काहींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दक्षता म्हणून मी स्वत:च घरात क्वॉरंटाइन केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्याच पक्षातील माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक मिलिंद पाटील यांनी आव्हाड यांचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक खुलासा करून चार दिवसांनी केलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचेही मंगळवारी सांगितले. मात्र, आव्हाड यांनी आधीपासूनच कोरोनावर मात करण्यासाठी औषधे सुरूकेली होती. तसेच ते पथ्यदेखील पाळत होते. त्यामुळेच ते यातून लवकर बाहेर पडल्याचा दावाही त्यांनी केला.

दुसरीकडे पाटील यांनी केलेला खुलासा चुकीचा असल्याचा दावा शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. आव्हाड यांची एकदाच टेस्ट झाली असून ती निगेटिव्ह आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाटील यांच्याकडून चुकीची माहिती दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. एकाच पक्षातील दोघा नेत्यांनी असे दोन तर्क लावल्याने आता आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती किंवा नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या असून नमके खरे कोण बोलत आहे, असाही संशय आता निर्माण झाला असून ठाणेकरांची चिंता मात्र वाढली आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या