शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

जितेंद्र आव्हाड राज्याचा चेहरा बदलतील, शरद पवार यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 00:07 IST

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ज्यांना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेले आणि स्वत:चे कर्तृत्व असलेले लोक मंत्री झाले.

ठाणे : कर्तृत्ववान लोकांना साथ दिली तर समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास वेळ लागत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी हे दाखवून दिले आहे. आज कळव्यात दिसणारे विस्तीर्ण रस्ते, येथील विकासकामे ही त्याची पावती आहे. आव्हाने स्वीकारली तर लोक कधीच विसरत नाहीत. त्यांनी आव्हाने स्वीकारल्यामुळेच ज्या भागात प्रतिकूल परिस्थिती होती, तिथेच त्यांना अधिक मताधिक्य मिळाले. लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकते. अशीच साथ त्यांना द्या; तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल, महाराष्ट्राला देशामध्ये प्रथमक्र मांकावर नेण्यासाठी मोठे योगदान देईल, अशी मला खात्री आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कौतुक केले.उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ज्यांना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेले आणि स्वत:चे कर्तृत्व असलेले लोक मंत्री झाले. येथे प्रकर्षाने सांगावेसे वाटते की, ठाणेकर भाग्यवान आहेत की, त्यांना असे दोन मंत्री मिळाले आहेत; ज्यांच्या कामांतून महाराष्ट्र बदलेल. आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण आणि एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास या खात्यांमुळे सबंध महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला परवडणारी घरे मिळतील, याची आपणाला खात्री असल्याचे पवार म्हणाले.जिथे कर्तृत्व असते, त्या कर्तृत्वाला प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली, तर समाजातील प्रश्नांची सोडवणूक करणारे नेतृत्व उभे राहू शकते. आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिले आहे. मागील अनेक वर्षे ठाण्यातच नव्हे, तर ठाण्याच्या बाहेर सबंध महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात जे योग्य असेल, त्याचा यांनी नेहमीच पुरस्कार करून स्वत:चे एक स्थानही प्रस्थापित केले आहे. एक लोकप्रतिनिधी जागृत असला आणि त्याला जनतेने साथ दिली तर काय होऊ शकते, हे तुम्ही कळवा-मुंब्य्रामध्ये जाऊन पाहा, असे आम्ही नव्या कार्यकर्त्यांना सांगत असतो. म्हणून, तुम्हा सर्वांची साथ त्यांच्यासोबत अशीच ठेवा.मी तुम्हाला खात्री देतो की, हा तुमचा प्रतिनिधी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील लोकांच्या जीवनात बदल करण्यातही यशस्वी होईल. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. त्याचा तुम्हा सर्वांना सार्थ अभिमान असेल, याचीही मला खात्री आहे, असे ते यावेळी पुढे म्हणाले.नव्या पिढीला घडवाशरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत सांगितले की, मुंबईत आल्यानंतर आपण तरु णांच्या चळवळीत काम करीत होतो. त्यावेळी एका मंचावर माझे भाषण संपल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी मला बोलावून घेतले आणि विचारपूस केली. त्यांनीच मला मोठे केले. तेव्हापासून मी मोठा होत गेलो.मला आव्हाड आणि शिंदे यांना या ठिकाणी सांगावेसे वाटते की, नव्या पिढीतील लोकांना घडविण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यांना संधी द्या; त्यांच्यातील कर्तृत्व ओळखून महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांना सोबत घ्या. तुम्ही नक्कीच महाराष्ट्राला प्रथमस्थानी नेऊन ठेवाल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड