शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, व्हॉट्सॲप स्टेटसमुळे गुढ वाढले 

By रणजीत इंगळे | Updated: March 30, 2023 11:23 IST

करमुसे प्रकरणात वैभव कदम यांची गेल्या अनेक दिवसापासून चौकशी सुरू होती.

ठाणे: राष्ट्रवादीचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या तात्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. वैभव कदम हे अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी होते. त्यावेळेस त्यांना अटक होऊन त्यांची जामीनावर सुटकाही झाली. निळजे ते तळोजा या दोन रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली.

करमुसे प्रकरणात वैभव कदम यांची गेल्या अनेक दिवसापासून चौकशी सुरू होती. त्यामुळे ते मानसिक तणावात असल्याचं बोललं जात आहे. मात्र आत्महत्या पूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर ठेवलेल्या स्टेटस मुळे आता चर्चा रंगली आहे. “मला माफ करा यात माझा दोष नाही, मी डिप्रेशन मुळे हा निर्णय घेत आहे, पोलीस आणि मीडियाला एकच विनंती आहे की मी आरोपी नाही आहे," अशा आशयाचे स्टेटस ठेवून त्याने आत्महत्या केली आहे. शेवटच्या स्टेटसमध्ये मी आरोपी नाही आहे असं वैभव कदम म्हणत आहेत. मात्र त्यांना आरोपी कोण ठरवत होतं याची चर्चा रंगली आहे. याच प्रकरणांमध्ये इतर लोकांची चौकशी सुरू आहे, यामध्ये काही अंगरक्षकदेखील आहेत.

वैभव कदम यांना पोलिसांकडून त्रास दिला जात होता. वारंवार चौकशीला बोलावलं जात होतं. आणि यामुळे तो डिप्रेशनमध्ये येऊन त्यांनी हे पाऊल उचलल्याचे काही अंगरक्षकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. आता चौकशी सुरू असताना पोलिसांवर कोणता राजकीय दबाव होता का? याची देखील चर्चा आता ठाण्यात रंगली आहे. आता या प्रकरणाचा तपास ठाणे रेल्वे पोलीस करत आहेत. हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं असेल.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे