शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, व्हॉट्सॲप स्टेटसमुळे गुढ वाढले 

By रणजीत इंगळे | Updated: March 30, 2023 11:23 IST

करमुसे प्रकरणात वैभव कदम यांची गेल्या अनेक दिवसापासून चौकशी सुरू होती.

ठाणे: राष्ट्रवादीचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या तात्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. वैभव कदम हे अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी होते. त्यावेळेस त्यांना अटक होऊन त्यांची जामीनावर सुटकाही झाली. निळजे ते तळोजा या दोन रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली.

करमुसे प्रकरणात वैभव कदम यांची गेल्या अनेक दिवसापासून चौकशी सुरू होती. त्यामुळे ते मानसिक तणावात असल्याचं बोललं जात आहे. मात्र आत्महत्या पूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर ठेवलेल्या स्टेटस मुळे आता चर्चा रंगली आहे. “मला माफ करा यात माझा दोष नाही, मी डिप्रेशन मुळे हा निर्णय घेत आहे, पोलीस आणि मीडियाला एकच विनंती आहे की मी आरोपी नाही आहे," अशा आशयाचे स्टेटस ठेवून त्याने आत्महत्या केली आहे. शेवटच्या स्टेटसमध्ये मी आरोपी नाही आहे असं वैभव कदम म्हणत आहेत. मात्र त्यांना आरोपी कोण ठरवत होतं याची चर्चा रंगली आहे. याच प्रकरणांमध्ये इतर लोकांची चौकशी सुरू आहे, यामध्ये काही अंगरक्षकदेखील आहेत.

वैभव कदम यांना पोलिसांकडून त्रास दिला जात होता. वारंवार चौकशीला बोलावलं जात होतं. आणि यामुळे तो डिप्रेशनमध्ये येऊन त्यांनी हे पाऊल उचलल्याचे काही अंगरक्षकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. आता चौकशी सुरू असताना पोलिसांवर कोणता राजकीय दबाव होता का? याची देखील चर्चा आता ठाण्यात रंगली आहे. आता या प्रकरणाचा तपास ठाणे रेल्वे पोलीस करत आहेत. हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं असेल.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे