शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, व्हॉट्सॲप स्टेटसमुळे गुढ वाढले 

By रणजीत इंगळे | Updated: March 30, 2023 11:23 IST

करमुसे प्रकरणात वैभव कदम यांची गेल्या अनेक दिवसापासून चौकशी सुरू होती.

ठाणे: राष्ट्रवादीचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या तात्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. वैभव कदम हे अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी होते. त्यावेळेस त्यांना अटक होऊन त्यांची जामीनावर सुटकाही झाली. निळजे ते तळोजा या दोन रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली.

करमुसे प्रकरणात वैभव कदम यांची गेल्या अनेक दिवसापासून चौकशी सुरू होती. त्यामुळे ते मानसिक तणावात असल्याचं बोललं जात आहे. मात्र आत्महत्या पूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर ठेवलेल्या स्टेटस मुळे आता चर्चा रंगली आहे. “मला माफ करा यात माझा दोष नाही, मी डिप्रेशन मुळे हा निर्णय घेत आहे, पोलीस आणि मीडियाला एकच विनंती आहे की मी आरोपी नाही आहे," अशा आशयाचे स्टेटस ठेवून त्याने आत्महत्या केली आहे. शेवटच्या स्टेटसमध्ये मी आरोपी नाही आहे असं वैभव कदम म्हणत आहेत. मात्र त्यांना आरोपी कोण ठरवत होतं याची चर्चा रंगली आहे. याच प्रकरणांमध्ये इतर लोकांची चौकशी सुरू आहे, यामध्ये काही अंगरक्षकदेखील आहेत.

वैभव कदम यांना पोलिसांकडून त्रास दिला जात होता. वारंवार चौकशीला बोलावलं जात होतं. आणि यामुळे तो डिप्रेशनमध्ये येऊन त्यांनी हे पाऊल उचलल्याचे काही अंगरक्षकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. आता चौकशी सुरू असताना पोलिसांवर कोणता राजकीय दबाव होता का? याची देखील चर्चा आता ठाण्यात रंगली आहे. आता या प्रकरणाचा तपास ठाणे रेल्वे पोलीस करत आहेत. हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं असेल.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे