शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad: एसीमुळे प्रवासी गुदमरुन मरण्याची भीती, आव्हाडांचा रेल्वे प्रशासनाला इशारा

By जितेंद्र कालेकर | Updated: August 28, 2022 21:04 IST

कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रवाशांशी संवाद साधला

ठाणे : साध्या उपनगरी रेल्वेमध्ये (लोकल) सुमारे ६ हजार प्रवासी एकाचवेळी प्रवास करतात. तर, एसी (वातानुकूलित) लोकलमध्ये इतके प्रवासी बसूच शकत नाहीत. ते गुदमरण्याची भीती आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये एसी लोकल चालवू नका. त्याचबरोबर मध्य रेल्वेचा पारसिक बोगद्यातील आवाज हा १७५ डेसीबलपेक्षा अधिक आहे. हा आवाज थांबला नाहीतर येथून जाणारी मेल एक्सप्रेस अडविली जाईल, असा इशाराच राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे आणि राज्याच्या गृहखात्याला प्रवाशांच्या बैठकीमध्ये रविवारी दिला.

कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रवाशांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गर्दीच्या वेळी एसी लोकल नकाेच. साध्या लोकलसह एसी लोकल चालविणार असाल तर तेही एकवेळेस मान्य होईल. पण साध्या लोकल काढून त्याजागी एसी लोकल चालविणार असाल तर ते मान्य होणार नाही. एसी लोकल फलाटावर उभी राहिल्यावर पाच हजारापैकी चार हजार प्रवासी स्थानकात तसेच उभे राहतात. अंबरनाथ फास्ट लोकलही अशीच अचानक बंद केली. मग त्याऐवजी साध्या जादा लोकल सुरु करा. संतप्त प्रवासी फक्त एक दिवस चालत रेल्वे ट्रॅकवरुन जातील. तेंव्हा काय कराल? असा सवालही त्यांनी केला.

रेल्वेचा १७५ डेसिबलचा आवाज बंद व्हावा

पारसिकचा बोगदा येथून पूर्वी मेल एक्सप्रेस जात होत्या. त्या अचानक धीम्या नविन मार्गावर आणल्या आहेत. त्यांचा आवाज १७५ डेसिबलपेक्षा अधिक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे रात्री १० वाजता ४५ डेसीबलपेक्षा आवाज नको. मग सर्वोच्च न्यायालयाने यातून रेल्वेला सवलत दिली आहे का? असा सवाल त्यांनी राज्य शासनासह रेल्वे पोलिसांना केला. कळव्यात अनेक इमारतींना तडे गेले आहेत. रात्री १० ते पहाटे २.३० च्या सुमारासही गाडया जातात. एखादी इमारत जर गाडयांच्या धावण्याने कमकुवत झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल करीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्याकडे तक्रर करीत रेल्वेला याची नोटीस बजावण्याचा आग्रह त्यांनी रेल्वे प्रवांशांसमोर धरला. यावेळी उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनीही या प्रवाशांवर लादलेल्या एसी लोकल बंद करण्याची मागणी केली. मुंब्रा प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी ए. आर. पठाण यांनी मुंब्रा आणि कळव्यामध्ये सेमी फास्ट गाडयांना थांबा देण्याची मागणी केली. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांच्यासह सिद्धेश देसाई, प्रतिभा बांगर, प्रणाली मोहिते प्रवाशांनीही अशाच तीव्र भावना व्यक्त केल्या.

तिकीट दर कसे परवडेल

दोनशे रुपये एका दिवसाचे तिकीट आणि दोनशे रुपयांचा एक महिन्यांचा पास कसे परवडेल? एसीच्या एका लोकलमधून केवळ ६०० तर साध्या ट्रेनमधून सहा हजार प्रवासी प्रवास करतात. साध्या लोकलचा दोनशे तर एसीचा महिन्याचा पास १८०० रुपये हे कसे परवडणार असा सवालही यावेळी आव्हाड यांच्यासह प्रवाशांनी केला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडlocalलोकलMumbaiमुंबई