शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Jitendra Awhad: एसीमुळे प्रवासी गुदमरुन मरण्याची भीती, आव्हाडांचा रेल्वे प्रशासनाला इशारा

By जितेंद्र कालेकर | Updated: August 28, 2022 21:04 IST

कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रवाशांशी संवाद साधला

ठाणे : साध्या उपनगरी रेल्वेमध्ये (लोकल) सुमारे ६ हजार प्रवासी एकाचवेळी प्रवास करतात. तर, एसी (वातानुकूलित) लोकलमध्ये इतके प्रवासी बसूच शकत नाहीत. ते गुदमरण्याची भीती आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये एसी लोकल चालवू नका. त्याचबरोबर मध्य रेल्वेचा पारसिक बोगद्यातील आवाज हा १७५ डेसीबलपेक्षा अधिक आहे. हा आवाज थांबला नाहीतर येथून जाणारी मेल एक्सप्रेस अडविली जाईल, असा इशाराच राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे आणि राज्याच्या गृहखात्याला प्रवाशांच्या बैठकीमध्ये रविवारी दिला.

कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रवाशांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गर्दीच्या वेळी एसी लोकल नकाेच. साध्या लोकलसह एसी लोकल चालविणार असाल तर तेही एकवेळेस मान्य होईल. पण साध्या लोकल काढून त्याजागी एसी लोकल चालविणार असाल तर ते मान्य होणार नाही. एसी लोकल फलाटावर उभी राहिल्यावर पाच हजारापैकी चार हजार प्रवासी स्थानकात तसेच उभे राहतात. अंबरनाथ फास्ट लोकलही अशीच अचानक बंद केली. मग त्याऐवजी साध्या जादा लोकल सुरु करा. संतप्त प्रवासी फक्त एक दिवस चालत रेल्वे ट्रॅकवरुन जातील. तेंव्हा काय कराल? असा सवालही त्यांनी केला.

रेल्वेचा १७५ डेसिबलचा आवाज बंद व्हावा

पारसिकचा बोगदा येथून पूर्वी मेल एक्सप्रेस जात होत्या. त्या अचानक धीम्या नविन मार्गावर आणल्या आहेत. त्यांचा आवाज १७५ डेसिबलपेक्षा अधिक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे रात्री १० वाजता ४५ डेसीबलपेक्षा आवाज नको. मग सर्वोच्च न्यायालयाने यातून रेल्वेला सवलत दिली आहे का? असा सवाल त्यांनी राज्य शासनासह रेल्वे पोलिसांना केला. कळव्यात अनेक इमारतींना तडे गेले आहेत. रात्री १० ते पहाटे २.३० च्या सुमारासही गाडया जातात. एखादी इमारत जर गाडयांच्या धावण्याने कमकुवत झाली तर याला जबाबदार कोण? असा सवाल करीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्याकडे तक्रर करीत रेल्वेला याची नोटीस बजावण्याचा आग्रह त्यांनी रेल्वे प्रवांशांसमोर धरला. यावेळी उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनीही या प्रवाशांवर लादलेल्या एसी लोकल बंद करण्याची मागणी केली. मुंब्रा प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी ए. आर. पठाण यांनी मुंब्रा आणि कळव्यामध्ये सेमी फास्ट गाडयांना थांबा देण्याची मागणी केली. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांच्यासह सिद्धेश देसाई, प्रतिभा बांगर, प्रणाली मोहिते प्रवाशांनीही अशाच तीव्र भावना व्यक्त केल्या.

तिकीट दर कसे परवडेल

दोनशे रुपये एका दिवसाचे तिकीट आणि दोनशे रुपयांचा एक महिन्यांचा पास कसे परवडेल? एसीच्या एका लोकलमधून केवळ ६०० तर साध्या ट्रेनमधून सहा हजार प्रवासी प्रवास करतात. साध्या लोकलचा दोनशे तर एसीचा महिन्याचा पास १८०० रुपये हे कसे परवडणार असा सवालही यावेळी आव्हाड यांच्यासह प्रवाशांनी केला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडlocalलोकलMumbaiमुंबई