शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जीव गेला तरी ‘सीएए’ लागू होऊ देणार नाही - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 02:04 IST

आंदोलनादरम्यान तुमच्या दिशेने दगड आला, तर प्रत्युत्तर न देता संविधानाला ढाल म्हणून पुढे करा. देश हेगडेवार, गोवळवलकरांच्या नाही तर, गांधीजी, आंबेडकरांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरुच्चार आव्हाड यांनी केला.

मुंब्रा : सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशाचे तुकडे होण्याची शक्यता आहे. परंतु जीव गेला तरी बेहत्तर हा कायदा महाराष्ट्रात मी लागू होऊ देणार नाही, अशी ठोस ग्वाही गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री मुंब्रा-कौसा परिसरात आयोजित नागरी सत्कार समारंभात दिली. आव्हाड म्हणाले की, स्वातंत्र्यांसाठी गांधीजींनी अहिंसेचा अवलंब केला. या कायद्याविरोधात लढतानाही अहिंसेचा अवलंब करा. आंदोलनादरम्यान तुमच्या दिशेने दगड आला, तर प्रत्युत्तर न देता संविधानाला ढाल म्हणून पुढे करा. देश हेगडेवार, गोवळवलकरांच्या नाही तर, गांधीजी, आंबेडकरांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने मुंब्र्यातील शंकर मंदिर परीसरात पहिला एसआरए प्रकल्प राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंब्र्यातील मतदारांसाठी कातडीचे जोडे केले तरी कमी पडतील, परंतु आता राज्यातील नागरीकांसाठीही काम करायचे आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनी आपल्याला बेडीत न अडकवता ती सैल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋता आव्हाड यांचाही सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव सय्यद अली अशरफ, पक्षाचे मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शिमम खान, नगरसेवक अशरफ पठाण, बाबाजी पाटील, नगरसेविका अनिता किणे, आशरीन राऊत आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक