शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

जीव गेला तरी ‘सीएए’ लागू होऊ देणार नाही - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 02:04 IST

आंदोलनादरम्यान तुमच्या दिशेने दगड आला, तर प्रत्युत्तर न देता संविधानाला ढाल म्हणून पुढे करा. देश हेगडेवार, गोवळवलकरांच्या नाही तर, गांधीजी, आंबेडकरांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरुच्चार आव्हाड यांनी केला.

मुंब्रा : सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशाचे तुकडे होण्याची शक्यता आहे. परंतु जीव गेला तरी बेहत्तर हा कायदा महाराष्ट्रात मी लागू होऊ देणार नाही, अशी ठोस ग्वाही गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री मुंब्रा-कौसा परिसरात आयोजित नागरी सत्कार समारंभात दिली. आव्हाड म्हणाले की, स्वातंत्र्यांसाठी गांधीजींनी अहिंसेचा अवलंब केला. या कायद्याविरोधात लढतानाही अहिंसेचा अवलंब करा. आंदोलनादरम्यान तुमच्या दिशेने दगड आला, तर प्रत्युत्तर न देता संविधानाला ढाल म्हणून पुढे करा. देश हेगडेवार, गोवळवलकरांच्या नाही तर, गांधीजी, आंबेडकरांच्या विचारांवर चालत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने मुंब्र्यातील शंकर मंदिर परीसरात पहिला एसआरए प्रकल्प राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंब्र्यातील मतदारांसाठी कातडीचे जोडे केले तरी कमी पडतील, परंतु आता राज्यातील नागरीकांसाठीही काम करायचे आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनी आपल्याला बेडीत न अडकवता ती सैल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋता आव्हाड यांचाही सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव सय्यद अली अशरफ, पक्षाचे मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शिमम खान, नगरसेवक अशरफ पठाण, बाबाजी पाटील, नगरसेविका अनिता किणे, आशरीन राऊत आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक