शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

Jitendra Awhad: मंत्रीपद जाताच आव्हाड रस्त्यावर, बायपासवरील खड्डे अन् सळया पाहून संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 15:22 IST

Jitendra Awhad: राज्यातील विविध महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचा ठेका दिला

ठाणे - पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून अपघाताच्या घटना घडत आहेत. तर, मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून रस्त्यांत खड्डेही पडत आहेत. ठाणे जिल्ह्यातील खड्ड्यांचा प्रश्नही चांगलाच समोर आला. ठाण्याचे नेते आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्याच्या रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तर, दुसरीकडे मंत्रीपद गेल्यानंतर आता जितेंद्र आव्हाडही थेट रस्त्यावर उतरले आहेत.

राज्यातील विविध महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचा ठेका दिला. मात्र, दुरुस्त केलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहन चालक व नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक घेऊन रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधत अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत. तर, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड हेही रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. सोमवारी त्यांनी मुंब्रा बायपासवरील खराब झालेल्या रस्त्याची पाहणी केली.  ''आज मी स्वत: मुंब्रा बायपासची पाहणी केली. मुंब्रा बायपासच्या रेतीबंदर पट्ट्यामध्ये जिथून बायपास उतरायला सुरुवात होते तिथे तीन मोठे खड्डे पडलेले आहेत व खालील सळ्या देखील दिसत आहेत. याप्रकरणी मी गेले दोन दिवस संबंधीत अधिकाऱ्यांशी बोलत आहे. काम सुरु करु असे त्यांनी आश्वासन दिले होते. अजूनही काम सुरु झालेले नाही. ह्या कामाला उशीर झाला तर या ठिकाणी मोठा अपघात घडू शकतो अशी मला शक्यता वाटते. तरी त्वरीत या कामाला सुरुवात करायला हवी'', असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे, आपले मंत्रीपद सोडल्यानंतर जितेंद्र आव्हाड पुन्हा रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज असल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्राroad safetyरस्ते सुरक्षा