शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

...तर हे घडलं नसतं; कळवा रुग्णालयातील रुग्ण मृत्यूनंतर जितेंद्र आव्हाड संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 16:40 IST

बेशरमपणाची हद्द आहे. ५ मृत्यूनंतर आम्ही येऊन गेलो, बडबडलो, कुणीही दखल घेतली नाही असं आव्हाड म्हणाले.

ठाणे – कळवा रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्ण दगावल्यावरून विरोधकांनी सत्ताधारी सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आत येण्याचे सगळे दरवाजे उघडे आहेत पण जाण्यासाठी फक्त वरचा दरवाजा उघडा आहे. श्रीराम जयराम. या प्रकाराची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा २ दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज टीव्हीसमोर पुढे येऊन काहीजण त्यांची बाजू घेताना दिसत आहेत हे दुर्देव आहेत. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल; याची जराही भिती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. ह्या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली.

तसेच बेशरमपणाची हद्द आहे. ५ मृत्यूनंतर आम्ही येऊन गेलो, बडबडलो, कुणीही दखल घेतली नाही. ज्यांचे हॉस्पिटलमध्ये काम नाही त्यांना इथं बसवलंय. मृत्यूची जबाबदारी स्वीकारावीच लागेल. प्रत्येक रुग्ण गोरगरिब घरातील आहे. इथे वाडा, मोखाडा, पालघर येथून आदिवासी रुग्णही येतात. या लोकांचे जेवणही प्रशासन खाते. लोकं गंभीर झाल्यावरच हॉस्पिटलमध्ये येतात. लोकं जन्माला आली, मरणारच आहे असा हिशोब प्रशासनाची बाजू घेणाऱ्यांना वाटतं. बेशरम प्रशासन आहे. आजही हॉस्पिटलमध्ये नर्सेस कमी आहे. डॉक्टरांची कमतरता आहे. गरीब लोकं मरण्याची जन्माला येतात का? असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी विचारला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ५ मृत्यूनंतर बैठक घ्यायला हवी होती. हे शहर मुख्यमंत्र्यांचे आहे. शहरातील लोकांची अपेक्षा आहे. पण कुठलीही पूर्तता मुख्यमंत्र्यांनी केली नाही. प्रशासनाची चावी माझ्या हातात नाही. चेहऱ्यावरील भावनाही डीनच्या हालत नाही. ७ तास एका बेडवर मृतदेह पडलेला असतो. जिवंत रुग्णाच्या बाजूला मृतदेह ठेवला जातो. थोडी तरी माणुसकी बाळगा असाही घणाघात आव्हाडांनी प्रशासनाला विचारला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड