शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चित्रपट चालण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांचीच चाणक्यनीती, शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा पलटवार

By जितेंद्र कालेकर | Updated: November 13, 2022 15:32 IST

आव्हाड यांचे राष्ट्रवादी मध्ये महत्व कमी झाले असून त्यामुळेच आव्हाड अशाप्रकरची स्टंटबाजी करीत असल्याचाही शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा आरोप

ठाणे : "मला जर चाणक्य म्हणत असतील तर चित्रपट चालावा, यासाठी जितेंद्र आव्हाडच चाणक्यनीती करीत असून हे सर्वांना दिसतंय," असा पलटवार शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. आव्हाड यांचे राष्ट्रवादी मध्ये महत्व कमी झाले असून त्यामुळेच आव्हाड अशाप्रकरची स्टंटबाजी करीत असल्याचा गंभीर आरोपही म्हस्के यांनी केला आहे.

हर हर महादेव चित्रपटावरून सुरू झालेला वादंग आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. या मुद्द्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे. मी त्यांचे आभार मानेन की, त्यांनी मला चाणक्याची उपमा दिली. मी आव्हांडाना मित्र आणि नेता समजायचो पण त्यांनीच मला मोठी उपमा दिली असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांचे राष्ट्रवादी मध्ये महत्व कमी झालय यामुळे ते लक्ष वेधण्याकरता हे सर्व करत असल्याचे म्हस्के म्हणाले.

"मविआचे सरकार असताना आव्हाडांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला पण अटक झाली नाही. त्यामुळे दबाव कुठल्या शासनाच्या वेळेस होता हे आता सर्वांच्या लक्षात आले असेल," असे त्यांनी नमूद केले. म्हस्के यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांवरही टीका केली. तुमचे गृहमंत्री खंडणी गोळा करत होते. "१०० कोटीच्या वसूलीच्या आरोपा खाली तुमचा नेता अटक आहे. एखाद्यावर आरोप करताना विचार करुन करायला पाहिजे. माजी मंत्र्यांच्या सर्व खात्यांच्या चौकशी केली जाणार आहे आणि त्याचे निर्णय लवकरच येणार आहेत. तेव्हा कोणाला जामिन मिळतोय का बघा," असा इशाराही त्यांनी दिला. उड्डाणपुलाचे श्रेय खा.श्रीकांत शिंदे यांचेच... कामं झाले नाही तर दोष सरकारला दिला जातो मग काम झाले तर श्रेय घेऊ द्या असा टोला म्हस्के यांनी आव्हाड यांना लगावला आहे. मी महापौर ,सभागृह नेता असताना पुलाचे कामाचा पाठपुरावा केला होता. वाईटाचे श्रेय आम्हाला देत असाल तर चांगल्याचे श्रेय पण द्या. त्यामुळे हे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस