शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

कोकणात जाणाऱ्या एसटीत जेमतेम प्रवासी, कोकणवासीयांत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 01:00 IST

गणेशोत्सव म्हटला की कशीही मजलदरमजल करत चाकरमानी कोकणात पोहोचतो. मात्र, यंदा कोरोनामुळे तो साजरा करण्यावरही प्रचंड निर्बंध आलेले आहेत.

स्नेहा पावसकर ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन मंडळाने १२ आॅगस्टपर्यंत आणि त्यानंतरही एसटीची सोय केली आहे. यात ठाण्यातून १२ आॅगस्टपर्यंत कोकणात गेलेल्या प्रत्येक बस या भरून गेली. मात्र, १३ तारखेपासून जाणाºया एसटीला ठाणेकर कोकणवासीयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे नियम पाळून जाणाºया एसटीमध्ये २२ सीट बुक होतात. परंतु, गेल्या चार दिवसांत ठाण्यातून कोकणात गेलेल्या एसटी या जेमतेम ५० टक्के भरल्या होत्या. मूळात आता एसटीने जाणाऱ्यांना कोरोना टेस्ट सक्तीची असल्याने चाकरमान्यांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवली आहे.गणेशोत्सव म्हटला की कशीही मजलदरमजल करत चाकरमानी कोकणात पोहोचतो. मात्र, यंदा कोरोनामुळे तो साजरा करण्यावरही प्रचंड निर्बंध आलेले आहेत. ५ ते १२ आॅगस्टदरम्यान कोकणात जाणाºयांसाठी कोरोना टेस्ट सक्तीची नव्हती. तर एसटीने जाणाºयांना ई-पासचीही गरज नव्हती. याच पार्श्वभूमीवर राज्य महामंडळाने ठाणे जिल्ह्यातील विभागीय कार्यालयांतर्गत ठाणे,कल्याण, विठ्ठलवाडी, बोरिवली आणि भार्इंदर या पाच डेपोतून ५ ते १२ आॅगस्टदरम्यान ३९७ जादा बस सोडण्यचा निर्णय घेतला होता. त्याला ठाणेकर कोकणवासीयांचा बºयापैकी प्रतिसाद मिळाला. ३९७ पैकी अर्ध्याहून जास्त म्हणजे २१६ बस कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, दापोलीसाठी सोडल्या गेल्या. बसची संख्या कमी करावी लागली असली तरी त्या पूर्ण २२ प्रवाशांनी भरून गेल्या. मात्र, १३ तारखेपासून कोकणात जाणाºया प्रवाशांना कोरोना स्वॅब टेस्ट अनिवार्य केली आहे. ती निगेटिव्ह आली तरच प्रवास करता येणार आहे. त्याचा परिणाम एसटीच्या बुकिंगवर झालेला दिसला. कोरोना टेस्ट करून एसटीने कोकणात जाण्याची ठाणेकरांची मानसिकता दिसत नाही. त्यातच ती करून गेले तरी अनेक ग्रामपंचायतीने गावात प्रवेशासाठीचे नियम वेगवेगळे केले आहे. परिणामी १३ आॅगस्टपासून ठाण्यातून जाणाºया एसटीमध्ये जेमतेम १२-१३ प्रवासी होते. जेमतेम अर्धे प्रवासी असल्याने आम्ही गाडी सोडली. पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रवासी असतील तर मात्र आम्हाला तेवढ्याचप्रवाशांसाठी एसटी सोडायची की नाहीविचार करावा लागेल, असेएसटीच्या विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.>गणपतीला कोकणात जायची ओढ आहे, पण कोरोना टेस्टचा खर्च, त्रास नकोसा वाटतो. एवढं करूनही टेस्ट निगेटिव्ह आली तरी पुन्हा गावात तीन दिवस क्वारंटाइन सक्तीचे केले आहे, त्यामुळे अर्धा गणेशोत्सव क्वारंटाइनमध्येच संपेल. त्यामुळे यंदा बाप्पाला इथूनच हात जोडायचे.- ज्ञानेश परब, ठाणे>कोकणात गणेशोत्सवाची मजा असते. दरवर्षी कुटुंबासह जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे इतके वेगवेगळे नियम आहेत, त्यामुळे जायची इच्छा नाही. प्रवासात आणि गावी पोहोचल्यावरही नियम. एसटीमध्ये सोशल डिस्टन्स चांगले आहे. मात्र, कोरोना टेस्ट आवश्यक आहे. ती निगेटिव्ह आली तर प्रवास, पण पॉझिटिव्ह आली तर प्रवास करताच येणार नाही आणि पैसेही मिळणार नाही, त्यामुळे डबल नुकसानही होणार आहे.- दर्शन सरमळकर, ठाणे