शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

कोकणात जाणाऱ्या एसटीत जेमतेम प्रवासी, कोकणवासीयांत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 01:00 IST

गणेशोत्सव म्हटला की कशीही मजलदरमजल करत चाकरमानी कोकणात पोहोचतो. मात्र, यंदा कोरोनामुळे तो साजरा करण्यावरही प्रचंड निर्बंध आलेले आहेत.

स्नेहा पावसकर ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांसाठी राज्य परिवहन मंडळाने १२ आॅगस्टपर्यंत आणि त्यानंतरही एसटीची सोय केली आहे. यात ठाण्यातून १२ आॅगस्टपर्यंत कोकणात गेलेल्या प्रत्येक बस या भरून गेली. मात्र, १३ तारखेपासून जाणाºया एसटीला ठाणेकर कोकणवासीयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे नियम पाळून जाणाºया एसटीमध्ये २२ सीट बुक होतात. परंतु, गेल्या चार दिवसांत ठाण्यातून कोकणात गेलेल्या एसटी या जेमतेम ५० टक्के भरल्या होत्या. मूळात आता एसटीने जाणाऱ्यांना कोरोना टेस्ट सक्तीची असल्याने चाकरमान्यांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवली आहे.गणेशोत्सव म्हटला की कशीही मजलदरमजल करत चाकरमानी कोकणात पोहोचतो. मात्र, यंदा कोरोनामुळे तो साजरा करण्यावरही प्रचंड निर्बंध आलेले आहेत. ५ ते १२ आॅगस्टदरम्यान कोकणात जाणाºयांसाठी कोरोना टेस्ट सक्तीची नव्हती. तर एसटीने जाणाºयांना ई-पासचीही गरज नव्हती. याच पार्श्वभूमीवर राज्य महामंडळाने ठाणे जिल्ह्यातील विभागीय कार्यालयांतर्गत ठाणे,कल्याण, विठ्ठलवाडी, बोरिवली आणि भार्इंदर या पाच डेपोतून ५ ते १२ आॅगस्टदरम्यान ३९७ जादा बस सोडण्यचा निर्णय घेतला होता. त्याला ठाणेकर कोकणवासीयांचा बºयापैकी प्रतिसाद मिळाला. ३९७ पैकी अर्ध्याहून जास्त म्हणजे २१६ बस कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, दापोलीसाठी सोडल्या गेल्या. बसची संख्या कमी करावी लागली असली तरी त्या पूर्ण २२ प्रवाशांनी भरून गेल्या. मात्र, १३ तारखेपासून कोकणात जाणाºया प्रवाशांना कोरोना स्वॅब टेस्ट अनिवार्य केली आहे. ती निगेटिव्ह आली तरच प्रवास करता येणार आहे. त्याचा परिणाम एसटीच्या बुकिंगवर झालेला दिसला. कोरोना टेस्ट करून एसटीने कोकणात जाण्याची ठाणेकरांची मानसिकता दिसत नाही. त्यातच ती करून गेले तरी अनेक ग्रामपंचायतीने गावात प्रवेशासाठीचे नियम वेगवेगळे केले आहे. परिणामी १३ आॅगस्टपासून ठाण्यातून जाणाºया एसटीमध्ये जेमतेम १२-१३ प्रवासी होते. जेमतेम अर्धे प्रवासी असल्याने आम्ही गाडी सोडली. पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके प्रवासी असतील तर मात्र आम्हाला तेवढ्याचप्रवाशांसाठी एसटी सोडायची की नाहीविचार करावा लागेल, असेएसटीच्या विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.>गणपतीला कोकणात जायची ओढ आहे, पण कोरोना टेस्टचा खर्च, त्रास नकोसा वाटतो. एवढं करूनही टेस्ट निगेटिव्ह आली तरी पुन्हा गावात तीन दिवस क्वारंटाइन सक्तीचे केले आहे, त्यामुळे अर्धा गणेशोत्सव क्वारंटाइनमध्येच संपेल. त्यामुळे यंदा बाप्पाला इथूनच हात जोडायचे.- ज्ञानेश परब, ठाणे>कोकणात गणेशोत्सवाची मजा असते. दरवर्षी कुटुंबासह जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे इतके वेगवेगळे नियम आहेत, त्यामुळे जायची इच्छा नाही. प्रवासात आणि गावी पोहोचल्यावरही नियम. एसटीमध्ये सोशल डिस्टन्स चांगले आहे. मात्र, कोरोना टेस्ट आवश्यक आहे. ती निगेटिव्ह आली तर प्रवास, पण पॉझिटिव्ह आली तर प्रवास करताच येणार नाही आणि पैसेही मिळणार नाही, त्यामुळे डबल नुकसानही होणार आहे.- दर्शन सरमळकर, ठाणे