शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:45 IST

पृथ्वीवरील नंदनवनातील घरी जाण्याचा स्वर्गीय आनंद कसा वर्णावा

- अनिकेत घमंडी डोंबिवली: आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय. आमच्या मातापित्यांना बाहेर हुसकावण्यात आले, हे दु:ख अव्यक्तच आहे. आता मात्र आम्ही स्वाभिमानाने आमच्या घरी, नंदनवनात जाऊ शकतो, यापेक्षा स्वर्गीय आनंद काय असेल, असे भावपूर्ण उद्गार काश्मिरी पंडित असोसिएशन मुंबई या संस्थेचे सचिव सुनील रंजन कौल यांनी ‘लोकमत’कडे काढले.काश्मीरचे कलम ३७० हटवून आम्हाला केंद्र सरकारने मोठा अनमोल ठेवा दिला असल्याचे खारघर येथे कुटुंबीयांसमवेत वास्तव्याला सुनील रंजन कौल यांनी सांगितले. मुंबईसह देशभरात अन्यत्र कार्पेट, सतरंज्या विकणारे काही उपद्रवी काश्मीरमध्ये बंदुका हातात घेतात. तिथल्या गोरगरिबांवर, मूळ भूमिपुत्रांवर अन्याय करतात. त्यांना या निर्णयामुळे मोठी चपराक बसली आहे. सरकारच्या वाटचालीकडे आता काश्मिरींचे लक्ष लागल्याचे कौल म्हणाले.कौल म्हणाले की, अनेक वर्षांनी आम्हाला मोकळे वाटतेय. मनामध्ये एकीकडे खूप आनंद तर दुसरीकडे जन्मभूमीकडे जाण्याची ओढ आहे. आनंदामुळे खरेतर शब्द फुटत नाहीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरांत २० हजारांहून अधिक संख्येने राहणाऱ्या काश्मीरच्या नागरिकांची सध्या हीच अवस्था आहे. ३७० कलम हटणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर, सोमवारच्या या निर्णयामुळे तो सोनियाचा दिन आलाच. ज्या सरकारमध्ये हिम्मत असते, तेच असा निर्णय घेऊ शकतात. आता भारतातील अन्य राज्यांप्रमाणेच देशातील कोणताही बांधव काश्मीरमध्ये येऊ शकतो. त्याला कोणतेही दडपण, भीती बाळगण्याची गरज नाही. तिथे येऊन सृष्टीसौंदर्याची मजा लुटा, भारताचे नंदनवन काय असते, हे प्रत्येकाने अनुभवावे. राज्य सरकारची सक्ती, मनमानी आणि दबावतंत्र नष्ट होईल. पण, खºया अर्थाने यापुढे केंद्र सरकारची जबाबदारी मोठी आहे. यानंतर येथून तिकडे जाणाºया मूळ काश्मिरी नागरिकांची सुरक्षा, त्यांना रोजगाराची हमी केंद्राला द्यावी लागेल.आगामी काळात तेथे कंपन्या कशा पद्धतीने गुंतवणूक करतात, त्या जोरावर तेथील मूळ काश्मीरचा रहिवासी तेथे जायला तयार होईल. ज्या सुखसुविधा त्यांना महाराष्ट्रात तसेच देशातील अन्य मोठ्या शहरांमध्ये मिळतात, तशाच सुखसुविधा काश्मिरात मिळाल्या, तर निश्चितच कुटुंबासह सगळे तेथे जाणार, असे कौल म्हणाले.सुनील कौल यांचे आईवडील हे श्रीनगर येथील लालचौक, करणनगर येथे वास्तव्याला होते. गुढीपाडव्याच्या दिवशी एप्रिल १९९० मध्ये त्यांच्यावर गोळीबार केला गेला. त्या जीवघेण्या हल्ल्यातून ते सुदैवाने वाचले. तेव्हापासून त्यांनी मुंबईतच वास्तव्य केले. कौल यांचे आईवडील हयात असून त्या दोघांनाही केंद्र सरकारच्या निर्णयामुळे अत्यंत आनंद झाला आहे, असे कौल यांनी सांगितले.‘रोजगाराचा प्रश्न सुटला तर युवक जातील’ : मूळचे श्रीनगर येथील अजय धर १९८५ नंतर अगोदर मुंबईत व आता ठाण्यात वास्तव्य करतात. काश्मीरमधील सरकारी खात्यात नोकरी करताना आलेला दबाव, मनमानीला कंटाळून मुंबईत आले. महाराष्ट्रात बंधुभाव अनुभवायला मिळाला, असे आवर्जून नमूद करणारे धर म्हणतात की, आता येथील नागरिकांनीही काश्मीरला यावे, तिथली संस्कृती बघावी, तिथले वेगळेपण अनुभवावे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे.मात्र, त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्यावरच कुटुंबांतील युवकांना तेथे जायला आवडेल. आता केवळ ३७० कलम हटवण्याचा निर्णय झाला असून सगळे सुटसुटीत व्हायला, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली व्हायला काहीसा वेळ जाईल. त्यानंतर, पुन्हा काश्मीरला जायचे आणि वास्तव्य करायचे याहून वेगळा आनंद, सुख काय असेल?

टॅग्स :Article 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीर