शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:45 IST

पृथ्वीवरील नंदनवनातील घरी जाण्याचा स्वर्गीय आनंद कसा वर्णावा

- अनिकेत घमंडी डोंबिवली: आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय. आमच्या मातापित्यांना बाहेर हुसकावण्यात आले, हे दु:ख अव्यक्तच आहे. आता मात्र आम्ही स्वाभिमानाने आमच्या घरी, नंदनवनात जाऊ शकतो, यापेक्षा स्वर्गीय आनंद काय असेल, असे भावपूर्ण उद्गार काश्मिरी पंडित असोसिएशन मुंबई या संस्थेचे सचिव सुनील रंजन कौल यांनी ‘लोकमत’कडे काढले.काश्मीरचे कलम ३७० हटवून आम्हाला केंद्र सरकारने मोठा अनमोल ठेवा दिला असल्याचे खारघर येथे कुटुंबीयांसमवेत वास्तव्याला सुनील रंजन कौल यांनी सांगितले. मुंबईसह देशभरात अन्यत्र कार्पेट, सतरंज्या विकणारे काही उपद्रवी काश्मीरमध्ये बंदुका हातात घेतात. तिथल्या गोरगरिबांवर, मूळ भूमिपुत्रांवर अन्याय करतात. त्यांना या निर्णयामुळे मोठी चपराक बसली आहे. सरकारच्या वाटचालीकडे आता काश्मिरींचे लक्ष लागल्याचे कौल म्हणाले.कौल म्हणाले की, अनेक वर्षांनी आम्हाला मोकळे वाटतेय. मनामध्ये एकीकडे खूप आनंद तर दुसरीकडे जन्मभूमीकडे जाण्याची ओढ आहे. आनंदामुळे खरेतर शब्द फुटत नाहीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरांत २० हजारांहून अधिक संख्येने राहणाऱ्या काश्मीरच्या नागरिकांची सध्या हीच अवस्था आहे. ३७० कलम हटणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर, सोमवारच्या या निर्णयामुळे तो सोनियाचा दिन आलाच. ज्या सरकारमध्ये हिम्मत असते, तेच असा निर्णय घेऊ शकतात. आता भारतातील अन्य राज्यांप्रमाणेच देशातील कोणताही बांधव काश्मीरमध्ये येऊ शकतो. त्याला कोणतेही दडपण, भीती बाळगण्याची गरज नाही. तिथे येऊन सृष्टीसौंदर्याची मजा लुटा, भारताचे नंदनवन काय असते, हे प्रत्येकाने अनुभवावे. राज्य सरकारची सक्ती, मनमानी आणि दबावतंत्र नष्ट होईल. पण, खºया अर्थाने यापुढे केंद्र सरकारची जबाबदारी मोठी आहे. यानंतर येथून तिकडे जाणाºया मूळ काश्मिरी नागरिकांची सुरक्षा, त्यांना रोजगाराची हमी केंद्राला द्यावी लागेल.आगामी काळात तेथे कंपन्या कशा पद्धतीने गुंतवणूक करतात, त्या जोरावर तेथील मूळ काश्मीरचा रहिवासी तेथे जायला तयार होईल. ज्या सुखसुविधा त्यांना महाराष्ट्रात तसेच देशातील अन्य मोठ्या शहरांमध्ये मिळतात, तशाच सुखसुविधा काश्मिरात मिळाल्या, तर निश्चितच कुटुंबासह सगळे तेथे जाणार, असे कौल म्हणाले.सुनील कौल यांचे आईवडील हे श्रीनगर येथील लालचौक, करणनगर येथे वास्तव्याला होते. गुढीपाडव्याच्या दिवशी एप्रिल १९९० मध्ये त्यांच्यावर गोळीबार केला गेला. त्या जीवघेण्या हल्ल्यातून ते सुदैवाने वाचले. तेव्हापासून त्यांनी मुंबईतच वास्तव्य केले. कौल यांचे आईवडील हयात असून त्या दोघांनाही केंद्र सरकारच्या निर्णयामुळे अत्यंत आनंद झाला आहे, असे कौल यांनी सांगितले.‘रोजगाराचा प्रश्न सुटला तर युवक जातील’ : मूळचे श्रीनगर येथील अजय धर १९८५ नंतर अगोदर मुंबईत व आता ठाण्यात वास्तव्य करतात. काश्मीरमधील सरकारी खात्यात नोकरी करताना आलेला दबाव, मनमानीला कंटाळून मुंबईत आले. महाराष्ट्रात बंधुभाव अनुभवायला मिळाला, असे आवर्जून नमूद करणारे धर म्हणतात की, आता येथील नागरिकांनीही काश्मीरला यावे, तिथली संस्कृती बघावी, तिथले वेगळेपण अनुभवावे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे.मात्र, त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्यावरच कुटुंबांतील युवकांना तेथे जायला आवडेल. आता केवळ ३७० कलम हटवण्याचा निर्णय झाला असून सगळे सुटसुटीत व्हायला, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली व्हायला काहीसा वेळ जाईल. त्यानंतर, पुन्हा काश्मीरला जायचे आणि वास्तव्य करायचे याहून वेगळा आनंद, सुख काय असेल?

टॅग्स :Article 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीर