शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता लढले पाहिजे’ – जमीलाबहन यांचे ईद दीपावली संमेलनात प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:09 PM

प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता लढले पाहिजे’ असे जमीलाबहन यांनी ईद दीपावली संमेलनात प्रतिपादन केले. 

ठळक मुद्देप्रतिकूल परिस्थितीत हार न मानता लढले पाहिजे’ – जमीलाबहनईद दीपावली संमेलन‘आम्हाला पण नाटक करायचंय’ ही नाटिका सादर

ठाणे : ‘परिस्थिति कितीही कठीण आणि कठोर असली तरी न डगमगता, सत्याची कास धरत तिच्याशी दोन हात करत आपली स्वप्ने पूर्ण करणं, हे सर्वांचे ध्येय असले पाहिजे. तुम्हा मुलांनी आपल्या परिस्थितीसमोर गुडघे न टेकता, समविचारी मित्रांच्या, संस्थेच्या साथीने स्वतःची ताकद ओळखून स्वतःचे आयुष्य साकारले पाहिजे!’ असे प्रतिपादन ‘घर बचाओ घर बनाओ’ आंदोलनात मेधा पाटकरांबरोबर सक्रीय असणार्‍या आणि विविध जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या सह संयोजक जमीला बेगम इताकुला यांनी केले.

समता विचार प्रसारक संस्थेच्या ईद दीपावली संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. संस्थेच्या उपाध्यक्ष मनीषा जोशी अध्यक्षस्थानी होत्या. घरगुती अत्याचार आणि सामाजिक अन्याय यांना न डगमगता समर्थपणे तोंड देत जमीला बहन यांनी स्वतःचे यशस्वी विश्व उभे केले. स्वतःसाठी आवाज उठवताना त्या आजूबाजूच्या शोषित वंचितांचाही आवाज झाल्या. त्यांचा हा विलक्षण प्रवास एकलव्य मुलांसाठी खूपच प्रेरणादायी होता. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही समता विचार प्रसारक संस्थेचे वार्षिक ईद दीपावली स्नेह संमेलन जोशात साजरे झाले. ईद आणि दिवाळी या सणांचे औचित्य साधून संस्थेच्या एकलव्य विद्यार्थ्यांना गायन, नृत्य, नाट्य आदि कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी या हेतूने हे स्नेह संमेलन आयोजित करण्यात येते. त्याच प्रमाणे संस्थेतर्फे दर वर्षी साथी हिरजी गोहिल एकलव्य क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ, कॅरम या स्पर्धांमध्ये ठाण्यातील विविध वस्तीतील एकलव्य विद्यार्थी उत्साहाने भाग घेतात. तसेच चित्रकला, रांगोळी आणि नृत्याच्या स्पर्धाही घेण्यात येतात. या वर्षी सुद्धा १०० च्या आसपास एकलव्यांनी विविध खेळात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेवून संमेलनात रंगत आणली. या स्पर्धांचे बक्षीस वितरण लक्ष्मी हिरजी गोहिल यांच्या हस्ते संपन्न झाले. कळव्याच्या महापालिका माध्यमिक शाळेतील १० वीच्या वर्गाच्या ‘आम्ही बंजारा’ संघाने क्रिकेटमध्ये बाजी मारली तर त्याच शाळेतील १० वीच्या मुलांचा दूसरा ‘ओम साई’ संघ उपविजेता ठरला. कब्बडीमद्धे कळव्याच्या महापालिका माध्यमिक शाळेतील १० वीच्या वर्गाच ‘जय साई’ गत विजेता तर मानपाड्याच्या माध्यमिक शाळेच्या १० वीच्या विद्यार्थ्यांचा ‘साई रत्न’ गट उपविजेता ठरला. बुद्धिबळमद्धे दुर्वेश भोईर सर्व प्रथम आला. मुलींच्या कॅरम स्पर्धेत किर्ती निकाळजे पहिली आली तर मुलांमध्ये इनोक कोलियार प्रथम आला. चित्रकलेमद्धे एंजेल खैरालिया हिने पहिला नंबर पटकावला, तर रांगोळी स्पर्धेत मनीषा सांबारे व संगीता पवार प्रथम आल्या. श्रुति केदारे, कुमकुम राठोड, आरती पवार आदि मुलींनी नृत्य सादर केली. वंचितांच्या रंगमंचामधील रमाबाई आंबेडकर नगरातील मुलांनी ‘आम्हाला पण नाटक करायचंय’ ही नाटिका सादर केली. अक्षता दंडवते या एकलव्य मुलीने सूत्र संचालन केले. या उपक्रमाचे संयोजन संस्थेचा एकलव्य कार्यकर्ता अजय भोसले याने समर्थपणे सांभाळले.  संस्थेचे अन्य कार्यकर्ते लतिका सू.मो., मीनल उत्तुरकर, जगदीश खैरालिया, अनुजा लोहार, सुनील दिवेकर, राहुल सोनार, प्रवीण खैरालिया, इनोक कोलियार आदींनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यास खूप मेहनत घेतली असे संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी आवर्जून संगितले. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक