शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

‘अर्थव्यवस्थेत जैन समाजाचे मोठे योगदान’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 03:02 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेत जैन समाजाचे मोठे योगदान आहे. जैन समाजाने कल्याणाची एक व्यवस्था उभी केली आहे. देशाच्या प्रगतीत त्यांचे योगदान अद्भुत आहे.

मीरा रोड - देशाच्या अर्थव्यवस्थेत जैन समाजाचे मोठे योगदान आहे. जैन समाजाने कल्याणाची एक व्यवस्था उभी केली आहे. देशाच्या प्रगतीत त्यांचे योगदान अद्भुत आहे. जैन समाज जेवढे घेतो, त्यापेक्षा जास्त समाजाला देतो, म्हणून जैन समाज मोठा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.जैनधर्मीयांचे आचार्य विजय पद्मसागर सुरीश्वरजी यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त भार्इंदर पश्चिमेच्या कस्तुरी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मध्य प्रदेश व छत्तीसगढच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, आ. मंगलप्रभात लोढा व नरेंद्र मेहता, महापौर डिम्पल मेहता, नयपद्मसागर महाराज आदी उपस्थित होते.जैन महाराज उपहार घेत नाहीत, ते उपहार म्हणून आशीर्वाद देतात, तो मोलाचा आहे. मीरा-भार्इंदरच्या जनतेने आम्हाला खूप आशीर्वाद दिले. महापालिका निवडणुकीत आ. मेहता यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश दिले. आचार्य नयपद्मसागर महाराज यांनीसुद्धा खूप आशीर्वाद दिले. डिम्पल मेहता महापौर झाल्या. मीरा-भार्इंदरसाठी आम्ही मेट्रो मंजूर केली आहे. आज ज्या ठिकाणी हा जन्मोत्सव कार्यक्र म होत आहे, त्याच्या मागेच मेट्रोचे स्टेशन होणार आहे. त्या मेट्रो स्टेशनला स्वामी महावीर यांचे नाव देणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.आचार्य पद्मसागर महाराज यांनी राष्ट्र, समाज व जीवदया यासाठी मोठे कार्य केले आहे. ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे आशीर्वाद असतील तर मेट्रोसारखी आणखी अनेक कामे आपण करू शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.केरळमधील नैसर्गिक आपत्तीत आचार्यदेव नयपद्मसागरजी महाराजांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारच्या जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी आचार्यदेव अभयसुरीश्वरजी महाराज, आचार्यदेव अरविंदसागरजी महाराज, आचार्यदेव मनोभूषणविजयजी महाराज, आचार्यदेव प्रशांतसागरजी महाराज, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, माजी आ. मुझफ्फर हुसेन, माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा आदींनी महाराजांचे आशीर्वाद घेतले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnewsबातम्या