शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

मोखाड्यात आजारी महिलेला डोलीतून नेण्याची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 08:02 IST

पायवाट तुडवत गाठले आरोग्य केंद्र; ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे वेळीच उपचार

रवींद्र साळवे मोखाडा : दिवसागणिक रस्तेविकासाचे जाळे विस्तारत ‘समृद्धी’सह विविध महामार्ग प्रगतिपथावर नेणाऱ्या, आधुनिकतेकडे वाटचाल करीत मोनो-मेट्रो, बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रात आजही आदिवासींना रस्त्याअभावी डोंगरमाथ्याची बिकट वाट तुडवावी लागत आहे, ही शोकांतिका आहे. त्यातूनच रस्त्याअभावी मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी येथील अंगणवाडी सेविका सुंदर किरकिरे (वय ३५) यांना उपचारासाठी डोलीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. ग्रामस्थांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले. मात्र, अशीच वेळ भविष्यात कुणावर आली तर काय? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. 

पालघरमधील मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी येथील अंगणवाडी सेविका सुंदर किरकिरे (वय ३५) यांना मंगळवारी उलट्यांचा त्रास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारीही त्यांना त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात नेण्यासाठी एकच धावपळ उडाली. मात्र, रुग्णालयात नेण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील काही ग्रामस्थांनी बुधवारी (दि. ६) प्लास्टिकसह कापडाची डोली करून चार किलोमीटरची डोंगरवाट तुडवत मोठ्या जिकिरीने त्यांना बेलपाडा येथील मुख्य रस्त्यापर्यंत आणले. पुढे ग्रामीण फर्स्ट डेव्हलपमेंट फाउंडेशनचे गंगाराम फसाळे यांनी संस्थेच्या वतीने स्वखर्चातून त्यांना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गोविंद वाघ, जयराम किरकिरे, हनुमंत वाघ, विलास वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे किरकिरे यांना वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे. रस्ता नसल्याने  ग्रामस्थांचे खूपच हाल होत आहेत. सरकारने तातडीने रस्ता बनवावा अशी मागणी परिसरातून सतत केली जात आहे.

मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया कोसो दूरच !डिजिटल भारताचे स्वप्न आपण सारेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करीत आहे, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगतिपथावर असल्याचे सांगत आहे; परंतु पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा रस्ता मात्र ‘विकास’ या संकल्पनेत अद्याप आलेला दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतीक्षाच आहे.

देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुंबईपासून १०० किलोमीटरवर, तर मोखाडा तालुक्यापासून ३० ते ३५ किलोमीटरवर दरी-डोंगरांत वसलेल्या बोटोशी ग्रामपंचायतीतील ४६ घरे असलेल्या २२६ लोकवस्तीच्या मरकटवाट येथील आदिवासींना सोयीसुविधांविना, रस्त्यांअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. मरकटवाडीला जायला रस्ता नसल्याने चार किलोमीटरची डोंगरमाथ्याची पायवाट तुडवत ये-जा करावी लागत आहे; त्यामुळेच केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया या योजना त्यांच्यापासून कोसो दूर आहेत.