शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मोखाड्यात आजारी महिलेला डोलीतून नेण्याची आली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 08:02 IST

पायवाट तुडवत गाठले आरोग्य केंद्र; ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे वेळीच उपचार

रवींद्र साळवे मोखाडा : दिवसागणिक रस्तेविकासाचे जाळे विस्तारत ‘समृद्धी’सह विविध महामार्ग प्रगतिपथावर नेणाऱ्या, आधुनिकतेकडे वाटचाल करीत मोनो-मेट्रो, बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रात आजही आदिवासींना रस्त्याअभावी डोंगरमाथ्याची बिकट वाट तुडवावी लागत आहे, ही शोकांतिका आहे. त्यातूनच रस्त्याअभावी मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी येथील अंगणवाडी सेविका सुंदर किरकिरे (वय ३५) यांना उपचारासाठी डोलीतून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. ग्रामस्थांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले. मात्र, अशीच वेळ भविष्यात कुणावर आली तर काय? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. 

पालघरमधील मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी येथील अंगणवाडी सेविका सुंदर किरकिरे (वय ३५) यांना मंगळवारी उलट्यांचा त्रास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारीही त्यांना त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात नेण्यासाठी एकच धावपळ उडाली. मात्र, रुग्णालयात नेण्यासाठी रस्ताच नसल्याने गावातील काही ग्रामस्थांनी बुधवारी (दि. ६) प्लास्टिकसह कापडाची डोली करून चार किलोमीटरची डोंगरवाट तुडवत मोठ्या जिकिरीने त्यांना बेलपाडा येथील मुख्य रस्त्यापर्यंत आणले. पुढे ग्रामीण फर्स्ट डेव्हलपमेंट फाउंडेशनचे गंगाराम फसाळे यांनी संस्थेच्या वतीने स्वखर्चातून त्यांना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गोविंद वाघ, जयराम किरकिरे, हनुमंत वाघ, विलास वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे किरकिरे यांना वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे. रस्ता नसल्याने  ग्रामस्थांचे खूपच हाल होत आहेत. सरकारने तातडीने रस्ता बनवावा अशी मागणी परिसरातून सतत केली जात आहे.

मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया कोसो दूरच !डिजिटल भारताचे स्वप्न आपण सारेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करीत आहे, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगतिपथावर असल्याचे सांगत आहे; परंतु पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा रस्ता मात्र ‘विकास’ या संकल्पनेत अद्याप आलेला दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतीक्षाच आहे.

देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुंबईपासून १०० किलोमीटरवर, तर मोखाडा तालुक्यापासून ३० ते ३५ किलोमीटरवर दरी-डोंगरांत वसलेल्या बोटोशी ग्रामपंचायतीतील ४६ घरे असलेल्या २२६ लोकवस्तीच्या मरकटवाट येथील आदिवासींना सोयीसुविधांविना, रस्त्यांअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. मरकटवाडीला जायला रस्ता नसल्याने चार किलोमीटरची डोंगरमाथ्याची पायवाट तुडवत ये-जा करावी लागत आहे; त्यामुळेच केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया या योजना त्यांच्यापासून कोसो दूर आहेत.