शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

फेब्रुवारीपर्यंत आणखी तीन मेगाब्लॉक घेणार; पाचव्या-सहाव्या मार्गावरून महिन्याभरात वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 07:06 IST

कल्याण-ठाणेदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते.  रविवारी या मार्गिकांच्या तपासणीचे आणि महत्त्वाचे अभियांत्रिकी काम करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या महिनाभरात पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेवरून लोकलसेवा सुरू होईल, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी दिली. रविवारच्या कामानंतर फेब्रुवारीपर्यंत आणखी तीन वेळा मेगाब्लॉक घेऊन ही सर्व कामे पूर्ण केली जातील. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा वापर सुरू होईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

कल्याण-ठाणेदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते.  रविवारी या मार्गिकांच्या तपासणीचे आणि महत्त्वाचे अभियांत्रिकी काम करण्यात आले. त्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. खासदार शिंदे यांच्याकडून या  कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांनी पाचवी आणि सहावी मार्गिका फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वापरात येईल, अशी माहिती दिली. पुढच्या आठवड्यात याच कामासाठी आणखी एकदा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. एकूण तीन मेगाब्लॉक सहा फेब्रुवारीपर्यंत घेतले जातील, असेही शिंदे यांनी सांगितले. 

क्रॉसिंगचा प्रश्न सुटेलया कामामुळे लोकल त्यातही फास्ट लोकल आणि एक्सप्रेस यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका असतील. त्यामुळे रेल्वे स्थानकात क्रॉसिंगचा प्रश्न राहणार नाही. परिणामी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास मदत होईल. या दोन मार्गामुळे शटल सेवा आणि लोकल फेऱ्या वाढण्याची आशा आहे. त्यामुळे नव्या वर्षात लोकल प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होईल असे शिंदे यांनी सांगितले.

रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्याnअमरावती-मुंबई, नागपूर-मुंबई सेवाग्राम, नांदेड-मुंबई राज्यराणी, मुंबई-पुणे- मुंबई डेक्कन, मुंबई-जालना -मुंबई जनशताब्दी, मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी, मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम, मुंबई-गदग या १ ते ३ जानेवारीदरम्यान लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या एक्सप्रेस मेगा ब्लॉकच्या कामासाठी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

९.५ किमीचीआहे रेल्वे मार्गिका nकळवा - दिवादरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेचा हा प्रकल्प ९.५ किमीचा असून, यातील खाडीवरील पूल ४.५ किमी लांबीचा आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या या खाडीवरील पुलावरील रेल्वे मार्गिकांची प्रत्यक्ष चाचणी सोमवारपासून घेण्यात येणार असल्याने जुन्या पुलावरील धिम्या गतीच्या रेल्वे गाड्या नवीन पुलावरून धावतील, असे खासदार शिंदे यांनी सांगितले. nउपनगरीय रेल्वे गाड्या साधारणपणे १०५ किमी प्रति तास वेगाने धावत असतात. परंतु आता या चाचणीदरम्यान लोकल सुरुवातीला ३० किमी प्रति तास या गतीने धावतील. नंतर ही गती वाढवत सुमारे ५० किमी प्रति तास, नंतर ७० किमी प्रति तास एवढी गती राखत अंतिम चाचणी काळात पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०५ किमी प्रति तास वेगाने धावतील, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.