शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

...तर पाणी पुनर्वापराची वेळ येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:01 PM

पांडुरंग अमृतकर : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’वर व्याख्यान

अंबरनाथ : कोकणात प्रचंड पाऊस पडतो. या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवल्यास भरपूर पाणी मिळून पाणीटंचाई भासणार नाही. तसेच इस्रायलप्रमाणे पाण्याचा पुनर्वापर करण्याची वेळही येणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता पांडुरंग अमृतकर यांनी व्यक्त केला.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’साठी मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि नगरसेविका अपर्णा भोईर यांनी रविवारी सायंकाळी कार्यक्र म आयोजित केला होता. यामध्ये अमृतकर यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या आधी खुशी खैरनार, पूर्वा पाटील, कृपा डोंगरे, सिद्धी सावंत आणि आभा गोखले या युवतींनी ‘निसर्गाची लूट केल्याने टंचाई झाली, आता पाणी अडवा’ हे पथनाट्य सादर करून भविष्यातील धोक्याकडे लक्ष वेधले.अमृतकर म्हणाले की, आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे तीन ऋतू आहेत. जगात असे ऋतुचक्र क्वचितच आढळेल. कोकणात जास्त पाऊस पडतो. सध्या निसर्गाचे चक्र उलटे फिरू लागले आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष होत असल्याने पाऊस हळूहळू कमी होत आहे. जलचक्र ही नैसर्गिक शक्ती आहे. त्यात ढवळाढवळ केल्याने दिवसेंदिवस पाण्याची टंचाई अधिक तीव्र होत आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी वर्षा जलसंचयन करणे आवश्यक आहे, असे पांडुरंग अमृतकर यांनी सांगितले.स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांनी हे जलसंकट आधीच ओळखले होते. त्यांनी ४० वर्षांपूर्वी राजस्थानसारख्या वाळूच्या प्रदेशात विहिरी व कूपनलिका पुनर्भरणाचे काम सुरू केले आहे. त्याचा परिणाम म्हणून आता त्या वाळवंटाच्या प्रदेशात मुबलक पाणी उपलब्ध असल्याचे अमृतकर म्हणाले.विहीर पुनर्भरण करण्याची चळवळ भक्तीच्या मार्गाने सुरू केली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेला अध्यात्म आणि धार्मिक जोड दिल्यास ही चळवळ अधिक जोमाने फैलावेल, असा विश्वास अमृतकर यांनी व्यक्त केला.अपुरा पाऊ स आणि जमिनीत पाणी मुरत नसल्याने दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. आपण आतापासूनच हालचाल केली नाही तर भविष्यात ही परिस्थिती आणखी भीषण होऊ न बसेल आणि तेव्हा आपल्या हाती काहीच नसेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.एकही थेंब वाया जाऊ देऊ नका!पाणी अडवण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. काँक्रि टीकरण वाढल्याने पाणी जिरत नाही. सरकारी योजना राबवण्यात येतात. मात्र, त्यातही अनेक तांत्रिक बाबी अडथळा ठरतात. निवासी सोसायटीच्या आवारातून एकही थेंब बाहेर जाऊ देणार नाही, असा निश्चयच प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे, असे अमृतकर यांनी सांगितले. छतावरून येणारे सर्व पाणी जमिनीत मुरवून धरतीमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, ही खरी ईश्वरसेवा असल्याचे अमृतकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे