शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

गुरुजींनी शिक्षा केल्यानेच अधिकारी होऊ शकलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 02:13 IST

सर्वसामान्य गरिब कुटुंबातील पुंडलीक साळुंखे यांच्या आयुष्याला आकार देणारे ठाकू र गुरुजी

अलिबाग : घरची परिस्थीत अत्यंत बेताचीच होती. त्यामध्ये शिक्षण घेणे हे परवडणारे नव्हते, परंतु वडिलांची सक्त ताकीत होती शिक्षण हे घेतलेच पाहिजे, तर आईचे स्वप्न होते की मी मोठा झाल्यावर मोठा साहेब व्हावे. त्यामुळे जिद्दीने शिक्षण घेण्याचा दृढ निश्चय केला. प्रचंड मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण केले आणि बिडीओ (गट विकास अधिकारी) झालो. त्या दिवशी आमच्या घरात कोणाचाच आनंद गगनात मावत नव्हता. आई सर्वांना सांगत होती पुंडलीक मोठा साहेब झाला. आईच्या आनंदाला पारावार उरलेला नसल्याने माझा उर भरुन आला. उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदावर आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सर्वांना आणि माझ्या शिक्षकांना माझा अभिमान आहे.गुरुजींनी मारल्याचा राग मनात होताच. पुढे आणखीन मोठा झाल्यावर माहिती घेतली की या शिक्षकांपेक्षा मोठा कोण असतो. त्याचा पगार कोण देता. त्यात असे समजले की बीडीओ (विस्तार अधिकारी) मोठा साहेब असतो. मग काय तेवढेच लक्षात ठेवले आणि बीडीओ बनायचे आणि गुरुजींनाच धडा शिकवायचा अशीच मनाशी खूणगाठ बांधली. जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि बीडीओ झालो. ठाकूर गुरुजींनी मला मारले नसते, तर आज मी बीडीओ झालो नसतो. त्यांनी मला माझ्या चुकीची शिक्षा दिली होती. मात्र मी नकळत गुरुजींना शिक्षा देण्याच्या नादात मोठा साहेब झालो होतो हे कळलेच नाही. मला मिळालेले यश हे माझ्या गुरुजींनमुळेच मिळाले आहे.जेव्हा शिक्षक मित्र बनतात तेंव्हा...माझ्या शिक्षणातील प्रगती पाहून ठाकूर गुरुजी आनंदी होते. मी जेव्हा बीडीओ झालो तेंव्हा ठाकूर गुरुजींनी भेटण्याचे ठरवेल. माहिती घेतल्यावर कळले की ठाकूर गुरुजी हे रसायनी येथील शाळेवर आहेत. तडक त्यांना भेटण्यासाठी गेलो आणि प्रथम त्यांचे पाय धरले. त्यांनीही मला जवळ घेतले. आज मी त्यांना भेटतो तेंव्हा ते मला मित्रा प्रमाणेच वागवतात. यापेक्षा मोठे समाधान काय असेल.खालापूर तालुक्यातील वावोशी येथील जीवन शिक्षण विद्या मंदिर या शाळेत प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली. लहानपणापासूनच मस्ती करायचो. मी, माझा मित्र दीपक झेमसे, दीपक म्हात्रे, माई शेट्ये, आशा ओसवाल असे आम्ही रस्त्याने चालत होतो. मी चालतानाच माझ्या मित्रांसोबत मस्ती करायला सुरुवात केली. त्यावेळी आमच्या सोबत आमचे शिक्षक दशरथ ठाकूर होते. त्यांनी मला दोन वेळा हटकले मात्र माझी मस्ती सुरुच होती. त्यावेळी त्यांनी मला रस्त्यातच मारले. गुरुजींनी मारल्याचा राग माझ्या मनात होता. त्याच रागात परीक्षा दिली आणि चांगल्या मार्कांनी पास झालो.कसलेल्या मल्लासोबत तीन तास कुस्ती...माझ्या खोडकर आणि मस्तीखोर स्वभावामुळे सर्वच शिक्षक हैराण होते. पिंगळे गुरुजीही त्यातीलच एक आहेत. त्यांनी माझी कुस्ती वर्गातील शांताराम पाटील याच्याबरोबर लावली. शांताराम हा कुस्ती खेळणाराच होता म्हणजे कसलेल्या मल्लासोबत पिंगळे गुरुजींनी मला झुंझवले तो मला सातत्याने खाली पाडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तीन तास झाले तरी हार पत्करण्यास कोणीच तयार नव्हते. शेवटी गुरुजींनीच सामान बरोबरीत सोडवला.

टॅग्स :raigad-pcरायगडRaigadरायगडalibaugअलिबागTeachers Dayशिक्षक दिन