शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

निवडणुकीच्या काळात शासकीय यंत्रणाचा वापर होणे चुकीचे, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केले मत

By अजित मांडके | Updated: April 5, 2024 16:59 IST

भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोडावून झालेली कारवाई ही दुर्देवी बाब असून एमएमआरडीएने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

ठाणे : लोकशाहीत निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण निवडणुकींच्या कामाला लागतो. शासकीय यंत्रणांचा या काळात वापर कमी केला जातो. मात्र भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोडावून झालेली कारवाई ही दुर्देवी बाब असून एमएमआरडीएने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. म्हात्रे यांची उमेदवारी झाल्यानंतर अवघ्या दोन तासात एमएमआरडीए कामाला लागते ही आर्श्चयाची बाब असल्याचेही ते म्हणाले. वास्तविक पाहता एमएमआरडीएला देखील माहिती आहे, या गोडावूनच्या बाबतीत म्हात्रे यांनी उच्च न्यायालयातून स्टे मिळविला आहे. परंतु तरी देखील अशा पध्दतीने घाबरविण्याचा प्रयत्न केला जात असून आम्ही घाबरणारे नसून आम्ही लढणारे आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्वातंत्र्य काळातील जमिनींचे फेरफार कोणी कसे बदलले हे संपूर्ण भिवंडीकरांना माहिती असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर टीका केली.

तुम्ही फक्त घाबरून, दम देऊन निवडणुका लढवू शकता हे आता स्पष्ट झाले असून आता तुम्हाला पराभव दिसत असल्यानेच अशी कृत्ये केली जात असल्याचेही ते म्हणाले.  त्यामुळे अशी माणसे लोकसभेत निवडून जाणार असतील तर हे देशाचे दुर्देव असल्याचेही ते म्हणाले. ठाणे लोकसभेच्या मुद्यावरुन त्यांना छेडले असता, प्रत्येकाला आपल्याला उमेदवारी मिळावी असे वाटत असेल तर त्यात गैर काय? प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडElectionनिवडणूक