शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

निवडणुकीच्या काळात शासकीय यंत्रणाचा वापर होणे चुकीचे, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केले मत

By अजित मांडके | Updated: April 5, 2024 16:59 IST

भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोडावून झालेली कारवाई ही दुर्देवी बाब असून एमएमआरडीएने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

ठाणे : लोकशाहीत निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण निवडणुकींच्या कामाला लागतो. शासकीय यंत्रणांचा या काळात वापर कमी केला जातो. मात्र भिवंडीतील उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या गोडावून झालेली कारवाई ही दुर्देवी बाब असून एमएमआरडीएने राजकीय हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. म्हात्रे यांची उमेदवारी झाल्यानंतर अवघ्या दोन तासात एमएमआरडीए कामाला लागते ही आर्श्चयाची बाब असल्याचेही ते म्हणाले. वास्तविक पाहता एमएमआरडीएला देखील माहिती आहे, या गोडावूनच्या बाबतीत म्हात्रे यांनी उच्च न्यायालयातून स्टे मिळविला आहे. परंतु तरी देखील अशा पध्दतीने घाबरविण्याचा प्रयत्न केला जात असून आम्ही घाबरणारे नसून आम्ही लढणारे आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्वातंत्र्य काळातील जमिनींचे फेरफार कोणी कसे बदलले हे संपूर्ण भिवंडीकरांना माहिती असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर टीका केली.

तुम्ही फक्त घाबरून, दम देऊन निवडणुका लढवू शकता हे आता स्पष्ट झाले असून आता तुम्हाला पराभव दिसत असल्यानेच अशी कृत्ये केली जात असल्याचेही ते म्हणाले.  त्यामुळे अशी माणसे लोकसभेत निवडून जाणार असतील तर हे देशाचे दुर्देव असल्याचेही ते म्हणाले. ठाणे लोकसभेच्या मुद्यावरुन त्यांना छेडले असता, प्रत्येकाला आपल्याला उमेदवारी मिळावी असे वाटत असेल तर त्यात गैर काय? प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळावी अशी माझी मनापासून इच्छा असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडElectionनिवडणूक