शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अश्विनी बिद्रेंचा मृत्यू दाखला द्या, पतीचा मीरा-भाईंदर पालिका आयुक्त, अपर तहसीलदारांकडे अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:33 IST

पनवेल पालिकेत आधी केलेला अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे यांची २०१६ मध्ये निर्घृण हत्या करणाऱ्या पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली. मात्र अश्विनी यांचा मृतदेह सापडला नसल्याने तसेच घटना मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत घडल्याचे कारण देऊन पनवेल महापालिकेने मृत्यूचा दाखला दिला नाही. त्यामुळे पती राजू गोरे यांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त आणि अपर तहसीलदार यांच्याकडे मृत्यू दाखल्यासाठी अर्ज केला आहे.

भाईंदरच्या न्यू गोल्डन नेस्ट मार्गावरील मुकुंद प्लाझा इमारतीतील फ्लॅटमध्ये ११ एप्रिल २०१६ रोजी कुरुंदकर याने अश्विनी यांची निर्घृण हत्या केली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्या मदतीने वसईच्या खाडीत फेकून दिले होते. दोन वर्षांनी कळंबोली पोलिस ठाण्यात अश्विनी यांच्या हत्येचा गुन्हा दाखल होऊन २०२५ मध्ये कुरुंदकर याला जन्मठेप, तर भंडारी व फळणीकर यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली गेली. राजू गोरे यांनी सांगितले की, आमची मुलगी आता १६ वर्षांची झाली आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी परदेशी पाठवायचे असल्याने पैसे लागणार आहेत. अश्विनी यांच्या विम्यासह अन्य कारणांसाठी मृत्यू दाखला लागणार आहे. अश्विनीला न्याय मिळावा यासाठी नऊ वर्षे लढणे कठीण होते, तितकेच कठीण तिला मृत घोषित करून तिचा मृत्यू दाखला मिळवणे झाले आहे.

पनवेल पालिकेत आधी केलेला अर्ज

राजू गोरे यांनी पत्नी अश्विनी यांचा मृत्यू दाखला मिळावा म्हणून पनवेल महापालिकेत २२ मे रोजी अर्ज केला होता. महापालिकेच्या विधी विभागाच्या अभिप्रायानुसार मृत्यू भाईंदर येथे झाल्याने मृत्यूचा दाखला तेथील जन्म-मृत्यू नोंद कार्यालयात करणे आवश्यक होते. मृत्यू दाखला घेण्यास विलंब झाल्यास तेथील कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याची तरतूद पत्रात नमूद करत अश्विनी यांचा मृत्यू दाखला देता येणार नसल्याचे गोरे यांना कळवले. गोरे यांनी त्या अनुषंगाने ३० मे रोजी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त, तर २ जून रोजी अपर तहसीलदार यांच्याकडे अश्विनी यांचा मृत्यू दाखला मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. अश्विनी यांचा मृतदेह सापडला नाही; तसेच शवविच्छेदन अहवाल नसल्याने गोरे यांनी अर्जासोबत आरोपींना शिक्षा झालेल्या गुन्ह्याच्या निकालपत्राची प्रत व कळंबोली पोलिस ठाण्याचे पत्र, आदी सोबत जोडले आहे. कायद्यानुसार, बेपत्ता व्यक्ती सात वर्षांनी मृत असल्याचे गृहीत धरले जाऊ शकते.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण