शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भिवंडीमधील वीजग्राहकांप्रश्नी राज्यपालांना घातले साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 00:29 IST

वाढीव बिलाने ग्राहक त्रस्त : सरकारने योग्य निर्णय घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील वीजग्राहक वाढीव वीजबिलाने मेटाकुटीस आले असून सरकारने सुरुवातीला जाहीर केलेली १०० युनिटमाफीची घोषणा फसवी ठरली आहे. या समस्येवर सरकारने योग्य निर्णय घेऊन वीजग्राहकांना दिलासा द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी व आमदार महेश चौघुले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे.

राजभवन येथे गेलेल्या शिष्टमंडळात भाजप गटनेते हनुमान चौधरी, सभागृह नेते श्याम अग्रवाल, नगरसेवक यशवंत टावरे, भाजप शहर सरचिटणीस प्रेमनारायण राय, विशाल पाठारे, कोषाध्यक्ष हसमुख पटेल, दक्षिण भारतीय आघाडी कोकण विभाग संयोजक मल्लेशम कोंका आदी उपस्थित होते. शेट्टी व चौघुले यांनी भिवंडी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणा-या समस्यांबाबत तसेच कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव करून देत ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून लॉकडाऊनकाळात वाढीव वीजबिल देण्यात आले. याबाबत कोणताही दिलासा राज्य सरकारने दिला नसून १०० युनिटपर्यंत वीजबिलमाफीची घोषणा करून ती पूर्ण न करण्याने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 

लॉकडाऊनकाळात शहरातील असंख्य परप्रांतीय कामगार कुटुंबासह गावाला  गेले असतानाही वाढीव वीजबिल देऊन त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तर, टोरंट पॉवर कंपनीकडून थकीत बिलाच्या वसुलीसाठी पुरवठा खंडित केला जात आहे. शहरातील यंत्रमागधारकांसह ग्राहकांवर वीजबिलवसुलीसाठी जबरदस्ती न करता बिल भरण्यासाठी मुदत द्यावी, जेणेकरून त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होईल. राज्यपालांनी सरकारला  निर्देश देऊन भिवंडीतील ग्राहकांना भेडसावणाऱ्या या प्रश्नावर मार्ग काढावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. राज्यपालांनी यावर सकारात्मक चर्चा करून लवकरच बैठक घेण्याबाबत निर्देश दिले जातील, असे आश्वासन दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी