शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

भिवंडीमधील वीजग्राहकांप्रश्नी राज्यपालांना घातले साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 00:29 IST

वाढीव बिलाने ग्राहक त्रस्त : सरकारने योग्य निर्णय घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील वीजग्राहक वाढीव वीजबिलाने मेटाकुटीस आले असून सरकारने सुरुवातीला जाहीर केलेली १०० युनिटमाफीची घोषणा फसवी ठरली आहे. या समस्येवर सरकारने योग्य निर्णय घेऊन वीजग्राहकांना दिलासा द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी व आमदार महेश चौघुले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे.

राजभवन येथे गेलेल्या शिष्टमंडळात भाजप गटनेते हनुमान चौधरी, सभागृह नेते श्याम अग्रवाल, नगरसेवक यशवंत टावरे, भाजप शहर सरचिटणीस प्रेमनारायण राय, विशाल पाठारे, कोषाध्यक्ष हसमुख पटेल, दक्षिण भारतीय आघाडी कोकण विभाग संयोजक मल्लेशम कोंका आदी उपस्थित होते. शेट्टी व चौघुले यांनी भिवंडी महापालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणा-या समस्यांबाबत तसेच कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव करून देत ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून लॉकडाऊनकाळात वाढीव वीजबिल देण्यात आले. याबाबत कोणताही दिलासा राज्य सरकारने दिला नसून १०० युनिटपर्यंत वीजबिलमाफीची घोषणा करून ती पूर्ण न करण्याने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 

लॉकडाऊनकाळात शहरातील असंख्य परप्रांतीय कामगार कुटुंबासह गावाला  गेले असतानाही वाढीव वीजबिल देऊन त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तर, टोरंट पॉवर कंपनीकडून थकीत बिलाच्या वसुलीसाठी पुरवठा खंडित केला जात आहे. शहरातील यंत्रमागधारकांसह ग्राहकांवर वीजबिलवसुलीसाठी जबरदस्ती न करता बिल भरण्यासाठी मुदत द्यावी, जेणेकरून त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होईल. राज्यपालांनी सरकारला  निर्देश देऊन भिवंडीतील ग्राहकांना भेडसावणाऱ्या या प्रश्नावर मार्ग काढावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. राज्यपालांनी यावर सकारात्मक चर्चा करून लवकरच बैठक घेण्याबाबत निर्देश दिले जातील, असे आश्वासन दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी