शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

अंबरनाथच्या राज्य महामार्गावर अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:39 IST

अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणारा राज्य महामार्ग सध्या अपघाताचे केंद्र ठरत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक ...

अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणारा राज्य महामार्ग सध्या अपघाताचे केंद्र ठरत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी काम सुरू असल्याचे फलक न लावल्याने तेथे अनेक वाहनचालकांचे अपघात हाेत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी लावलेले दुभाजकही वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहेत. रस्त्याचे नव्याने काम होत असतानाही हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत असल्याने त्याकडे एमएमआरडीएने लक्ष देण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.

कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने एमएमआरडीएकडे वर्ग केला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करीत असताना पहिल्या टप्प्यात अतिक्रमण हटविता न आल्याने अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले. एमएमआरडीएच्या चुकीचा भुर्दंड आता अंबरनाथकरांना सोसावा लागत आहे. दरम्यान, रस्त्याच्या रुंदीकरणात आड येणारे अतिक्रमण हटविल्याने हे काम जलद गतीने होईल, अशी अपेक्षा होती. अतिक्रमण हटविल्यानंतर एमएमआरडीएकडे निधीच नसल्याने पुन्हा रस्त्याचे काम करण्यासाठी तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. उल्हासनगर आणि अंबरनाथमधील रस्त्याच्या आड येणारे अतिक्रमण काढल्यानंतर तीन वर्षांनी या रस्त्यासाठी पुन्हा निविदा निघाली. त्यामुळे जुना काॅंक्रीट रस्ता आणि नव्याने तयार होणारा काॅंक्रीट रस्ता त्यांच्या कामाच्या दर्जामध्ये बदल झाला. अनेक ठिकाणी चढ-उतारही निर्माण झाला. नव्याने काम सुरू झाल्यानंतर पुन्हा या रस्त्याच्या खाली असलेल्या जलवाहिन्या अडचणीचा विषय ठरल्या होत्या. या जलवाहिन्या रस्त्याच्या वर असल्याने त्यांच्यावर कॉंक्रिटीकरण करणे शक्य होत नव्हते. या जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च अपेक्षित होता, मात्र पुन्हा निधी मिळणार नाही याची कल्पना असल्याने एमएमआरडीएने ठेकेदाराला सांगून, आहे त्या स्थितीत काम पूर्ण करण्याची घाई केली.

रस्त्याच्या मध्यभागी उभारलेल्या भिंतीसोबतच अनेक ठिकाणी अपघातांना आमंत्रण देईल, असे काम एमएमआरडीएने केले आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेले दुभाजकही अपघाताचे केंद्र ठरत आहे. अनेक ठिकाणी दुभाजकाचे काम करताना सुरक्षाफलकच नाहीत. त्यामुळे रात्री वाहनांची धडक होत आहे. जुन्या काॅंक्रिटीकरणावरील पेव्हर ब्लॉकही जीर्ण झाल्याने आणि अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या ठिकाणी खड्डे पडल्याने त्या खड्ड्यांत वाहने आदळून अपघात घडत आहेत. अद्याप विजेचे खांब न बसविल्याने रात्री खड्डे न दिसल्याने अपघात घडत आहेत. यासंदर्भात नागरिकांनी आणि रिक्षाचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

काेट

नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जास्त त्रास होत नाही; परंतु इतर शहरांतून येणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत.

- सुनील पाटील, नागरिक

रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी सुरक्षाफलक लावणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. त्यासंदर्भात वाहतूक विभागामार्फत ताकीद देण्यात आली आहे.

- सुनील जाधव, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

--------

फोटो आहे.