शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ठाण्यासह जिल्ह्यातील मनपांच्या पाणी पुरवठ्यासाठी काळू धरणाच्या पाठोपाठ शाई ‌‌‌‌काम- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 14:43 IST

गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांनी ‌‌‌‌आज सकाळपासून जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला.

ठाणे : न्याय प्रविष्ट असलेल्या काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पाठोपाठ शाई धरणाचे काम लवकरच होती घेऊ. नवीन भूसंपादन कायद्यास अनुसरून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. त्यानुसरून शेतकऱ्यांशी संवाद साधून रखडलेले शाई व काळू धरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे जलसंपादा मंत्री जयंत पाटील, यांनी स्पष्ट केले. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील महापालिकांच्या पाण्याची समस्या कारमची दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.              

गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांनी ‌‌‌‌आज सकाळपासून जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून पाणी समस्या सोडवण्याच्या विविध उपाययोजना स्पष्ट केल्या. त्यात काही वर्षांपासून रखडलेल्या शाई व काळू धरणांचे कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र ‌आव्हाड, यांच्या ग्वाहीसह स्पष्ट केले. जिल्ह्यातील अनेक शहरांना दोन ते तीन. दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे या पाणी पुरवठ्यामुळे काही प्रश्न तयार झाले आहेत. काही ठिकाणी कमी पाणी ‌कमी मिळत आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करून सध्याच्या प्रकल्पातून किती पाणी पुरवठा होणार आणि अतिरिक्त पाण्यासाठी काय करावे ‌लागणार आदी विषयांवर आढावा बैटकीत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले. या पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे सचिवांनी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.           

जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो. यासह जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या तुटफूट होणार्रा पाईप लाईनचे कामं करण्यासाठी काही ठिकाणी विरोध होतो. त्यास आळा घालण्यासाठी व पाईट लाईन वेळीच जोडण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि या विविध कामांना मार्गी लावण्यासाठी त्यांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात येत आहे. त्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनीही सहमती दिल्याचे पाटील यांनी सांगितले.                         

येऊर येथील जुना बंधार्याची दुरुस्ती करून त्यातील वाहून जाणार्या पाण्याचा वापर ‌ठाणे शहराच्या काही भागाला होईल. येथील जून्या बंधार्याचे पाणी खालील गळतीने वाहून जाते. त्यामुळे या धरणाच्या दुरुस्ती च्या सूचना दिलेले आहेत, असे पाटील म्हणाले. मुंब्रा परिसरातील डोगरातील वाहून जाणारे पाणी कोल्हापूरी बंधारे बांधावून आडवता येईल. या पाण्याचा वापर कळवा आणि मुंब्रा या प्रभागांमध्ये करून पाणी समस्या कमी करता येईल.व,असेही त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मागणीस अनुसरुन सांगितले.  

MIDC ला आता एसटीपी प्लंनचे पाणी          जिल्ह्यातील महानगरपालिकांना पाण्याच्या रियासकलींच्या प्रकल्पांची क्षमता वाढण्यास सांगितले. याशिवाय रिसायकल पाणी एमआयडीसीला वापर करण्यास भाग पाडले जाणार आहे. यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करावी लागणार आहे. एम आयडीसीला त्यांचे वाहून जाणारे पाणी एसटीपी प्लँनचा‌ वापर करून रिसायकलींग पाणी ‌व वापरणे बंधनकारक केले जाईल. यामुळे त्यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर ठिकठिकाणी असलेली पाणी समस्या दूर करण्यासाठी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी सुचवलेल्या उपाययोजनेला दुजोरा ‌देत पाटील यांनी स्पष्ट केले.जुने व नवे  प्रकल्प लवकर पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. आता मधल्या काळामध्ये कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मंत्रिमंडळात मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूतोवाच केले आणि सगळ्यात मोठे प्रकल्प तातडीने, वेगाने पूर्ण करावे, असे नमूद केल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :WaterपाणीJayant Patilजयंत पाटील