शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यासह जिल्ह्यातील मनपांच्या पाणी पुरवठ्यासाठी काळू धरणाच्या पाठोपाठ शाई ‌‌‌‌काम- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 14:43 IST

गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांनी ‌‌‌‌आज सकाळपासून जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला.

ठाणे : न्याय प्रविष्ट असलेल्या काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पाठोपाठ शाई धरणाचे काम लवकरच होती घेऊ. नवीन भूसंपादन कायद्यास अनुसरून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. त्यानुसरून शेतकऱ्यांशी संवाद साधून रखडलेले शाई व काळू धरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे जलसंपादा मंत्री जयंत पाटील, यांनी स्पष्ट केले. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील महापालिकांच्या पाण्याची समस्या कारमची दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.              

गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांनी ‌‌‌‌आज सकाळपासून जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून पाणी समस्या सोडवण्याच्या विविध उपाययोजना स्पष्ट केल्या. त्यात काही वर्षांपासून रखडलेल्या शाई व काळू धरणांचे कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र ‌आव्हाड, यांच्या ग्वाहीसह स्पष्ट केले. जिल्ह्यातील अनेक शहरांना दोन ते तीन. दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे या पाणी पुरवठ्यामुळे काही प्रश्न तयार झाले आहेत. काही ठिकाणी कमी पाणी ‌कमी मिळत आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करून सध्याच्या प्रकल्पातून किती पाणी पुरवठा होणार आणि अतिरिक्त पाण्यासाठी काय करावे ‌लागणार आदी विषयांवर आढावा बैटकीत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले. या पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे सचिवांनी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.           

जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो. यासह जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या तुटफूट होणार्रा पाईप लाईनचे कामं करण्यासाठी काही ठिकाणी विरोध होतो. त्यास आळा घालण्यासाठी व पाईट लाईन वेळीच जोडण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि या विविध कामांना मार्गी लावण्यासाठी त्यांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात येत आहे. त्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनीही सहमती दिल्याचे पाटील यांनी सांगितले.                         

येऊर येथील जुना बंधार्याची दुरुस्ती करून त्यातील वाहून जाणार्या पाण्याचा वापर ‌ठाणे शहराच्या काही भागाला होईल. येथील जून्या बंधार्याचे पाणी खालील गळतीने वाहून जाते. त्यामुळे या धरणाच्या दुरुस्ती च्या सूचना दिलेले आहेत, असे पाटील म्हणाले. मुंब्रा परिसरातील डोगरातील वाहून जाणारे पाणी कोल्हापूरी बंधारे बांधावून आडवता येईल. या पाण्याचा वापर कळवा आणि मुंब्रा या प्रभागांमध्ये करून पाणी समस्या कमी करता येईल.व,असेही त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मागणीस अनुसरुन सांगितले.  

MIDC ला आता एसटीपी प्लंनचे पाणी          जिल्ह्यातील महानगरपालिकांना पाण्याच्या रियासकलींच्या प्रकल्पांची क्षमता वाढण्यास सांगितले. याशिवाय रिसायकल पाणी एमआयडीसीला वापर करण्यास भाग पाडले जाणार आहे. यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करावी लागणार आहे. एम आयडीसीला त्यांचे वाहून जाणारे पाणी एसटीपी प्लँनचा‌ वापर करून रिसायकलींग पाणी ‌व वापरणे बंधनकारक केले जाईल. यामुळे त्यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर ठिकठिकाणी असलेली पाणी समस्या दूर करण्यासाठी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी सुचवलेल्या उपाययोजनेला दुजोरा ‌देत पाटील यांनी स्पष्ट केले.जुने व नवे  प्रकल्प लवकर पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. आता मधल्या काळामध्ये कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मंत्रिमंडळात मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूतोवाच केले आणि सगळ्यात मोठे प्रकल्प तातडीने, वेगाने पूर्ण करावे, असे नमूद केल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :WaterपाणीJayant Patilजयंत पाटील