शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई; बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख केल्यानं 'शहबाज' सरकार बिथरलं
3
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
4
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
5
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
6
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
7
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
8
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
9
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
10
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
11
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
12
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
13
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
15
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
16
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
17
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
18
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
19
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
20
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

ठाण्यासह जिल्ह्यातील मनपांच्या पाणी पुरवठ्यासाठी काळू धरणाच्या पाठोपाठ शाई ‌‌‌‌काम- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 14:43 IST

गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांनी ‌‌‌‌आज सकाळपासून जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला.

ठाणे : न्याय प्रविष्ट असलेल्या काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पाठोपाठ शाई धरणाचे काम लवकरच होती घेऊ. नवीन भूसंपादन कायद्यास अनुसरून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. त्यानुसरून शेतकऱ्यांशी संवाद साधून रखडलेले शाई व काळू धरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे जलसंपादा मंत्री जयंत पाटील, यांनी स्पष्ट केले. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील महापालिकांच्या पाण्याची समस्या कारमची दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.              

गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांनी ‌‌‌‌आज सकाळपासून जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून पाणी समस्या सोडवण्याच्या विविध उपाययोजना स्पष्ट केल्या. त्यात काही वर्षांपासून रखडलेल्या शाई व काळू धरणांचे कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र ‌आव्हाड, यांच्या ग्वाहीसह स्पष्ट केले. जिल्ह्यातील अनेक शहरांना दोन ते तीन. दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे या पाणी पुरवठ्यामुळे काही प्रश्न तयार झाले आहेत. काही ठिकाणी कमी पाणी ‌कमी मिळत आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करून सध्याच्या प्रकल्पातून किती पाणी पुरवठा होणार आणि अतिरिक्त पाण्यासाठी काय करावे ‌लागणार आदी विषयांवर आढावा बैटकीत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले. या पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे सचिवांनी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.           

जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो. यासह जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या तुटफूट होणार्रा पाईप लाईनचे कामं करण्यासाठी काही ठिकाणी विरोध होतो. त्यास आळा घालण्यासाठी व पाईट लाईन वेळीच जोडण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि या विविध कामांना मार्गी लावण्यासाठी त्यांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात येत आहे. त्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनीही सहमती दिल्याचे पाटील यांनी सांगितले.                         

येऊर येथील जुना बंधार्याची दुरुस्ती करून त्यातील वाहून जाणार्या पाण्याचा वापर ‌ठाणे शहराच्या काही भागाला होईल. येथील जून्या बंधार्याचे पाणी खालील गळतीने वाहून जाते. त्यामुळे या धरणाच्या दुरुस्ती च्या सूचना दिलेले आहेत, असे पाटील म्हणाले. मुंब्रा परिसरातील डोगरातील वाहून जाणारे पाणी कोल्हापूरी बंधारे बांधावून आडवता येईल. या पाण्याचा वापर कळवा आणि मुंब्रा या प्रभागांमध्ये करून पाणी समस्या कमी करता येईल.व,असेही त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मागणीस अनुसरुन सांगितले.  

MIDC ला आता एसटीपी प्लंनचे पाणी          जिल्ह्यातील महानगरपालिकांना पाण्याच्या रियासकलींच्या प्रकल्पांची क्षमता वाढण्यास सांगितले. याशिवाय रिसायकल पाणी एमआयडीसीला वापर करण्यास भाग पाडले जाणार आहे. यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करावी लागणार आहे. एम आयडीसीला त्यांचे वाहून जाणारे पाणी एसटीपी प्लँनचा‌ वापर करून रिसायकलींग पाणी ‌व वापरणे बंधनकारक केले जाईल. यामुळे त्यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर ठिकठिकाणी असलेली पाणी समस्या दूर करण्यासाठी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी सुचवलेल्या उपाययोजनेला दुजोरा ‌देत पाटील यांनी स्पष्ट केले.जुने व नवे  प्रकल्प लवकर पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. आता मधल्या काळामध्ये कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मंत्रिमंडळात मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूतोवाच केले आणि सगळ्यात मोठे प्रकल्प तातडीने, वेगाने पूर्ण करावे, असे नमूद केल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :WaterपाणीJayant Patilजयंत पाटील