शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

पेसामुळे बिगर आदिवासींवर होतोय अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 23:13 IST

पांढरीचापाडा येथे कार्यक्रम; कुणबी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

- विश्वनाथ पाटीलकिन्हवली : महाराष्ट्रात विविध समाजांच्या आरक्षणाची चर्चा तसेच उग्र आंदोलने सुरू आहेत. राजकीय पक्ष अनेक समाजांच्या प्रश्नांवर चर्चा करताना दिसतात. मात्र, सरकार कुणबी समाजाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे वक्त व्य पांढरीचापाडा या मठावर झालेल्या कार्यक्र मात कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केले आहे.डोळखांब-पांढरीपाडा गोरक्षनाथ मठ येथे आयोजित ‘कुणबी आरक्षण आणि बिगर आदिवासी आरक्षण’ या जाहीर कार्यक्र मात ते बोलत होते. सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतील चुकीच्या धोरणामुळे शेतकरी तसेच त्यांची शिक्षित पिढी आत्महत्येच्या दिशेने जात आहे. अशा परिस्थितीत उपजीविकेचे साधन म्हणून कुणबी समाज नोकरीकडे पाहत आहे.पेसा क्षेत्रात कुणबी समाजाला शून्य टक्के, तर ओबीसी आरक्षणात ०.१ टक्क्यांपेक्षाही कमी आरक्षण या समाजाच्या वाट्याला आल्याने कुणबी शेतीतून हद्दपार होत आहेतच. पण, आता शिक्षण तसेच नोकरीतूनही हद्दपार होणार असल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.आदिवासी किंवा मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. खोटी कागदपत्रे सादर करून आदिवासींना शासकीय हलगर्जी तसेच भ्रष्टाचाराने देण्यात आलेल्या एक लाख नोकºया खºया आदिवासींना दिल्या, तर आदिवासींचा नोकºयांचा अनुशेष भरला जाईल. वास्तविक, कुणबी समाजाला घटनात्मक तरतुदींप्रमाणे ओबीसीत आरक्षण मिळणे गरजेचे होते. मात्र, ते मिळाले नाही. कोरडवाहू शेती तसेच शेती करणाºया या समाजाला दºयाखोºयांत राहत असल्याने वर्षानुवर्षे आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. म्हणूनच, हा समाज हलाखीच्या परिस्थितीत जगत असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शेतकरी नेते केशव भेरे, बिगर आदिवासी संघाचे नेतृत्व करणारे काशिनाथ तिवरे, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पष्टे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक कैलास पडवळ, ज्येष्ठ नेते हरिभाऊ खाडे, वसंत रसाळ, नंदू डोहळे, हरिभाऊ शिंदे, सुनील वेखंडे, रूपेश कोंगरे यासह सर्वपक्षीय कुणबी नेत्यांसह शेकडो युवक उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे