शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Jitendra Awhad: सत्ताधाऱ्यांनो, काहीतरी बोला, अन्यथा पुढचा काळ कठीण; आव्हाडांचा मोदी सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:41 IST

काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं असं विचारणाऱ्यांचाही आव्हाड यांनी समाचार घेतला. जागतिक बाजारात महागाई वाढली तेव्हा आम्ही ती महागाई देशात रोखून धरली होती याची आठवण त्यांनी सध्याच्या केंद्रीय सत्ताधाऱ्यांना करून दिली.

महागाईने देशातील जनतेचे जगणे कठीण केले आहे. उन्हाच्या चटक्यापेक्षा महागाईचा चटका जास्त बसतोय, अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मागील मार्च महिन्यात देशात महागाईचा दर हा ७.०२ टक्क्याच्या आसपास होता. यंदा महागाईचा दर १४ टक्क्यांच्याही वर गेला आहे. मागील सत्तर वर्षात कधी नव्हती एवढी महागाई आता शिगेला पोहचली आहे, असे ते म्हणाले. 

काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं असं विचारणाऱ्यांचाही आव्हाड यांनी समाचार घेतला. जागतिक बाजारात महागाई वाढली तेव्हा आम्ही ती महागाई देशात रोखून धरली होती याची आठवण त्यांनी सध्याच्या केंद्रीय सत्ताधाऱ्यांना करून दिली. तसेच जागतिक बाजारात महागाई नसतानाही आपल्या देशात महागाई आहे ही खंत त्यांनी व्यक्त केली. 

इंधन दर, गॅस दर कुठे पोहचले आहेत याची माहिती मध्यमवर्गीय महिलांकडून, वाहन चालवणाऱ्या व्यक्तींकडून जाणून घ्यावी. महागाई भाजून काढत आहे, उन्हाच्या चटक्यापेक्षा महागाईचा चटका जास्त बसतोय. अशा परिस्थितीत देशात नॉन इश्यूचा इश्यू केला जात आहे. याद्वारे महागाईकडे लक्ष जाऊ नये असे प्रकार घडवले जात आहेत, असे आव्हाड म्हणाले. त्यामुळे देशातील सत्ताधाऱ्यांनी महागाई आवरती घ्या, महागाईवर काही बोला, अन्यथा पुढचा काळ कठीण आहे, असा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडInflationमहागाई