शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बाप्पांच्या मूर्तींवर जीएसटीमुळे आले महागाईचे विघ्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:47 IST

कारागिरांचा वाढलेला पगार, यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : सर्वच कच्च्या मालावर लागू झालेला जीएसटी तसेच कारागिरांचा वाढलेला पगार, यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. सध्या कारखान्यांत मूर्तींना रंग देण्याचे काम सुरू असून गणेशभक्तदेखील मूर्तींच्या बुकिंगला मूर्तिकारांकडे येत असल्याचे पाहायला मिळत आहे.सप्टेंबर महिन्यात श्री गणरायाचे आगमन होणार आहे. कारखान्यांत मूर्तिकाम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन महिने राहिल्यामुळे मूर्तींना रंग देण्याचे काम सुरू आहे. मूर्तिकार आणि त्यांच्याकडे कामाला असणारे कारागीर हे रंगकामात गुंतले आहेत. परंतु, यंदा सर्वच कच्च्या मालावर लागू झालेल्या जीएसटीची झळ गणेशमूर्तींना बसली आहे. याआधी डायमंड आणि ठरावीक रंगांवर जीएसटी लागू होता.परंतु, यंदा माती, पीओपी, सर्वच रंग यांवर तो लागू झाल्याने मूर्तींचे दर वाढले आहेत, अशी माहिती मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.>यामुळे वाढली किंमतगेल्या वर्षी १४०० ते २५००० रुपयांना विकल्या गेलेल्या मूर्तींचे दर यंदा १५०० ते २८,००० रुपये आहेत. १५० रुपये दराने मिळणारी मातीची गोणी जीएसटीमुळे १७५ रुपये दराने, तर २०० रुपयांचा रंग हा जीएसटीमुळे २३० रुपयांना मिळत असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. ज्यांना मूर्तिकाम येते, अशाच कारागिरांना कामावर ठेवू शकतो. परंतु, आता तेदेखील कमी होत असल्याने जे आहेत, त्यांना हाताशी घेऊन काम करावे लागते. मात्र, त्यांनीही आपला पगार वाढवल्यामुळे मूर्तींच्या दरात वाढ करावी लागली असल्याचे मूर्तिकार प्रवीण पातकर यांनी सांगितले.कारागिरांचा पगार वाढत असल्यामुळे मूर्ती कमी केल्या असून आमचे संपूर्ण कुटुंब या कामात गुंतले असल्याचे पातकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले. गणेशोत्सवाला दोन महिने असल्याने मूर्तींच्या बुकिंगला हळूहळू सुरुवात झाली आहे. श्रावण महिना सुरू झाला की, बुकिंगलादेखील जोर येईल तसेच मूर्तींच्या कामालादेखील वेग येईल.