शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

ऑक्सिजनअभावी बाळंतीणीचा मृत्यू?; सिझेरियननंतर सिल्वासाला नेताना घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 08:59 IST

सातपाटीत भाड्याच्या घरात ही दुर्दैवी महिला तिचा पती किशोर आंग्रेसह राहत होती. कल्याणी दुसऱ्या खेपेला गर्भवती राहिल्यानंतर तिने आपले नाव सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते.

पालघर : सातपाटी येथे राहणाऱ्या कल्याणी आंग्रे या २९ वर्षीय महिलेची पालघर ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर ती अत्यवस्थ झाली. यामुळे तिला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे घेऊन गेल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने अवघ्या दोन दिवसांचे बाळ मातेला मुकले आहे. प्रसूतीनंतर व्यवस्थित असणाऱ्या आपल्या पत्नीला योग्य ते उपचार करण्यात आले नाहीत आणि तिला ऑक्सिजनचा योग्य तो पुरवठा देण्यात न आल्याने कल्याणी अत्यवस्थ झाली, असा आरोप तिच्या पतीसह नातेवाइकांनी केला आहे.

सातपाटीत भाड्याच्या घरात ही दुर्दैवी महिला तिचा पती किशोर आंग्रेसह राहत होती. कल्याणी दुसऱ्या खेपेला गर्भवती राहिल्यानंतर तिने आपले नाव सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. डॉक्टरांकडून ती आपली नियमित तपासणी करून घेत होती. मंगळवारी तिच्या पोटात दुखू लागल्याने ती सातपाटीवरून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. तिची सिझरिंग प्रसूती झाल्यानंतर बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितल्याने पतीसह सर्व आनंदात होते. मात्र, बुधवारी पहाटे अचानक तिला अत्यवस्थ वाटू लागले. यानंतर तिला उपचारासाठी इतरत्र हलविण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या. 

रक्तवाहिन्यांत गुठळ्याकल्याणी हिला शासकीय ॲम्ब्युलन्सद्वारे केंद्रशासित सिल्वासा येथे नेत असताना ऑक्सिजन पुरविण्यात आला नसल्याचा आरोपही नातेवाइकांनी केला आहे. डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर संशयप्रसूतीनंतर प्रकृती चांगली असणाऱ्या महिलेची काही तासांतच तब्येत बिघडून तिचा मृत्यू झाल्याने तिच्यावर उपचार करणाऱ्या पालघर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर नातेवाइकांनी संशय व्यक्त केला आहे. संबंधित दोषींविरोधात कडक कारवाईची मागणी जिल्हा परिषद सदस्य करिश्मा उमतोल यांनी केली आहे.

हलगर्जीपणामुळे मृत्यू?पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नुकतेच एका सर्पदंश झालेल्या तरुणीचा उपस्थित नवशिक्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला होता. त्यामुळे त्या डॉक्टरला हटविण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय बोदाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या महिलेसोबतच अन्य तीन महिलांच्या प्रसूती झाल्या असल्याचे सांगून या दुर्दैवी महिलेच्या शरीरातील रक्त वाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याने ती अत्यवस्थ झाल्याचे डॉ. बोदाडे यांनी सांगितले.  

तिच्या शरीरातील प्लेटलेटची संख्या झपाट्याने खाली आली होती. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर तिच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. - डॉ. दीप्ती गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय