शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

भारत - इस्रायलचे संबंध दृढ व्हावेत - डॉ. डी.बी. शेकटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 07:10 IST

भारत-इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते आणखी दृढ व्हावे. दोन्ही देशांतील शांतता, समृद्धी आणि विश्वास आहे तो अधिक वाढावा. या दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध पुढच्या पिढीपर्यंत समजले पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. डी.बी. शेकटकर यांनी

ठाणे : भारत-इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते आणखी दृढ व्हावे. दोन्ही देशांतील शांतता, समृद्धी आणि विश्वास आहे तो अधिक वाढावा. या दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध पुढच्या पिढीपर्यंत समजले पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. डी.बी. शेकटकर यांनी केले. भारत आणि इस्रायल एकत्र येऊन काँक्रिट वर्ल्ड तसेच शांततेचे, विश्वासाचे जग निर्माण करू शकतात, असेही ते म्हणाले.व्यास क्रिएशन्सतर्फे ‘इस्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा’ या मराठी अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गडकरी रंगायतन येथे बुधवारी पार पडला. या सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शेकटकर उपस्थित होते. ते म्हणाले की, भारत-इस्रायलमध्ये चांगले संबंध आहेत. कोणतेही राष्ट्र, राज्य, राष्ट्रनेता आपल्या राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रहित तयार करत असतात. जिथे राष्ट्रनीतीच्या संरक्षणासाठी राजनीती-कूटनीती ही वेगळी झाली, तिथे युद्धनीती करावी लागते. ज्यांचा संबंध युद्धशास्त्र, रणशास्त्राबरोबर आहे, त्यांना वास्तविकता माहीत असावी. ही वास्तविकता आपण पहिल्या महायुद्धात पाहिली आहे. भारताकडे जग हे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. कोणतेही राष्ट्र हे छोटे किंवा मोठे नसते. इस्रायलच्या आजूबाजूला अनेक राष्ट्रे आहेत. परंतु, कोणाला मित्र म्हणायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर असताना तेथील नागरिक हे ठामपणे उभे आहेत. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी जिथे विजय मिळवला, तिथे भारतीय सैनिक होते, ही वास्तविकता आहे. कोणत्याही राष्ट्रावर येणारे संकट हे जगण्याची कला शिकवून जाते. एकोणिसाव्या शतकात आपण मसल्स पॉवर, विसाव्या शतकात मनी पॉवर पाहिली, तर एकविसाव्या शतकात सैनिक आणि समाजाची शक्ती हवी. जे राष्ट्र, समाज आपल्या शूरवीरांचे पराक्रम विसरतात, ते अधोगतीच्या दिशेने जातात, असे परखड मत व्यक्त केले. ज्या देशात महिला असुरक्षित आहेत, तिथे सुरक्षित समाज कसा निर्माण होईल, असा सवालही उपस्थित केला.अ‍ॅड. लेवी ए. रुबेन्स यांनी भारत-इस्रायल या दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रगती करावी, हे दोन्ही देश शांतताप्रिय असल्याने त्यांनी एकत्र यावे. आपल्या देशातील सैनिकाला दुसºया देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण येते, तेव्हा तो आपल्या देशाची प्रतिष्ठा सांभाळतो. भारतीय सैनिकांचे योगदान पोहोचवण्यासाठी हे पुस्तक वाचावे, असे आवाहन त्यांनी केले. रवी कुमार म्हणाले की, भारत आणि इस्रायल ही एक मोठी शक्ती बनू शकते. हे दोन्ही देश मित्र आहे, आणखी चांगले मित्र होऊ शकतात. कार्यक्रमाला पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे वर्षा कोल्हटकर, अनिल कोल्हटकर, ज्येष्ठ पत्रकार श्री.वा. नेर्लेकर, व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड व इतर उपस्थित होते. याप्रसंगी याच पुस्तकाच्या ई-बुकचेदेखील प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे