शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
5
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
6
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
7
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
9
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
10
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
11
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
12
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
13
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
14
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
15
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
16
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
17
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
18
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
19
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
20
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भारत - इस्रायलचे संबंध दृढ व्हावेत - डॉ. डी.बी. शेकटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 07:10 IST

भारत-इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते आणखी दृढ व्हावे. दोन्ही देशांतील शांतता, समृद्धी आणि विश्वास आहे तो अधिक वाढावा. या दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध पुढच्या पिढीपर्यंत समजले पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. डी.बी. शेकटकर यांनी

ठाणे : भारत-इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते आणखी दृढ व्हावे. दोन्ही देशांतील शांतता, समृद्धी आणि विश्वास आहे तो अधिक वाढावा. या दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध पुढच्या पिढीपर्यंत समजले पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. डी.बी. शेकटकर यांनी केले. भारत आणि इस्रायल एकत्र येऊन काँक्रिट वर्ल्ड तसेच शांततेचे, विश्वासाचे जग निर्माण करू शकतात, असेही ते म्हणाले.व्यास क्रिएशन्सतर्फे ‘इस्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा’ या मराठी अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गडकरी रंगायतन येथे बुधवारी पार पडला. या सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शेकटकर उपस्थित होते. ते म्हणाले की, भारत-इस्रायलमध्ये चांगले संबंध आहेत. कोणतेही राष्ट्र, राज्य, राष्ट्रनेता आपल्या राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रहित तयार करत असतात. जिथे राष्ट्रनीतीच्या संरक्षणासाठी राजनीती-कूटनीती ही वेगळी झाली, तिथे युद्धनीती करावी लागते. ज्यांचा संबंध युद्धशास्त्र, रणशास्त्राबरोबर आहे, त्यांना वास्तविकता माहीत असावी. ही वास्तविकता आपण पहिल्या महायुद्धात पाहिली आहे. भारताकडे जग हे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. कोणतेही राष्ट्र हे छोटे किंवा मोठे नसते. इस्रायलच्या आजूबाजूला अनेक राष्ट्रे आहेत. परंतु, कोणाला मित्र म्हणायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर असताना तेथील नागरिक हे ठामपणे उभे आहेत. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी जिथे विजय मिळवला, तिथे भारतीय सैनिक होते, ही वास्तविकता आहे. कोणत्याही राष्ट्रावर येणारे संकट हे जगण्याची कला शिकवून जाते. एकोणिसाव्या शतकात आपण मसल्स पॉवर, विसाव्या शतकात मनी पॉवर पाहिली, तर एकविसाव्या शतकात सैनिक आणि समाजाची शक्ती हवी. जे राष्ट्र, समाज आपल्या शूरवीरांचे पराक्रम विसरतात, ते अधोगतीच्या दिशेने जातात, असे परखड मत व्यक्त केले. ज्या देशात महिला असुरक्षित आहेत, तिथे सुरक्षित समाज कसा निर्माण होईल, असा सवालही उपस्थित केला.अ‍ॅड. लेवी ए. रुबेन्स यांनी भारत-इस्रायल या दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रगती करावी, हे दोन्ही देश शांतताप्रिय असल्याने त्यांनी एकत्र यावे. आपल्या देशातील सैनिकाला दुसºया देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण येते, तेव्हा तो आपल्या देशाची प्रतिष्ठा सांभाळतो. भारतीय सैनिकांचे योगदान पोहोचवण्यासाठी हे पुस्तक वाचावे, असे आवाहन त्यांनी केले. रवी कुमार म्हणाले की, भारत आणि इस्रायल ही एक मोठी शक्ती बनू शकते. हे दोन्ही देश मित्र आहे, आणखी चांगले मित्र होऊ शकतात. कार्यक्रमाला पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे वर्षा कोल्हटकर, अनिल कोल्हटकर, ज्येष्ठ पत्रकार श्री.वा. नेर्लेकर, व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड व इतर उपस्थित होते. याप्रसंगी याच पुस्तकाच्या ई-बुकचेदेखील प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे