शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

भारत - इस्रायलचे संबंध दृढ व्हावेत - डॉ. डी.बी. शेकटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 07:10 IST

भारत-इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते आणखी दृढ व्हावे. दोन्ही देशांतील शांतता, समृद्धी आणि विश्वास आहे तो अधिक वाढावा. या दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध पुढच्या पिढीपर्यंत समजले पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. डी.बी. शेकटकर यांनी

ठाणे : भारत-इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते आणखी दृढ व्हावे. दोन्ही देशांतील शांतता, समृद्धी आणि विश्वास आहे तो अधिक वाढावा. या दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध पुढच्या पिढीपर्यंत समजले पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. डी.बी. शेकटकर यांनी केले. भारत आणि इस्रायल एकत्र येऊन काँक्रिट वर्ल्ड तसेच शांततेचे, विश्वासाचे जग निर्माण करू शकतात, असेही ते म्हणाले.व्यास क्रिएशन्सतर्फे ‘इस्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा’ या मराठी अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गडकरी रंगायतन येथे बुधवारी पार पडला. या सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शेकटकर उपस्थित होते. ते म्हणाले की, भारत-इस्रायलमध्ये चांगले संबंध आहेत. कोणतेही राष्ट्र, राज्य, राष्ट्रनेता आपल्या राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रहित तयार करत असतात. जिथे राष्ट्रनीतीच्या संरक्षणासाठी राजनीती-कूटनीती ही वेगळी झाली, तिथे युद्धनीती करावी लागते. ज्यांचा संबंध युद्धशास्त्र, रणशास्त्राबरोबर आहे, त्यांना वास्तविकता माहीत असावी. ही वास्तविकता आपण पहिल्या महायुद्धात पाहिली आहे. भारताकडे जग हे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. कोणतेही राष्ट्र हे छोटे किंवा मोठे नसते. इस्रायलच्या आजूबाजूला अनेक राष्ट्रे आहेत. परंतु, कोणाला मित्र म्हणायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर असताना तेथील नागरिक हे ठामपणे उभे आहेत. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी जिथे विजय मिळवला, तिथे भारतीय सैनिक होते, ही वास्तविकता आहे. कोणत्याही राष्ट्रावर येणारे संकट हे जगण्याची कला शिकवून जाते. एकोणिसाव्या शतकात आपण मसल्स पॉवर, विसाव्या शतकात मनी पॉवर पाहिली, तर एकविसाव्या शतकात सैनिक आणि समाजाची शक्ती हवी. जे राष्ट्र, समाज आपल्या शूरवीरांचे पराक्रम विसरतात, ते अधोगतीच्या दिशेने जातात, असे परखड मत व्यक्त केले. ज्या देशात महिला असुरक्षित आहेत, तिथे सुरक्षित समाज कसा निर्माण होईल, असा सवालही उपस्थित केला.अ‍ॅड. लेवी ए. रुबेन्स यांनी भारत-इस्रायल या दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रगती करावी, हे दोन्ही देश शांतताप्रिय असल्याने त्यांनी एकत्र यावे. आपल्या देशातील सैनिकाला दुसºया देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण येते, तेव्हा तो आपल्या देशाची प्रतिष्ठा सांभाळतो. भारतीय सैनिकांचे योगदान पोहोचवण्यासाठी हे पुस्तक वाचावे, असे आवाहन त्यांनी केले. रवी कुमार म्हणाले की, भारत आणि इस्रायल ही एक मोठी शक्ती बनू शकते. हे दोन्ही देश मित्र आहे, आणखी चांगले मित्र होऊ शकतात. कार्यक्रमाला पुस्तकाचा मराठी अनुवाद करणारे वर्षा कोल्हटकर, अनिल कोल्हटकर, ज्येष्ठ पत्रकार श्री.वा. नेर्लेकर, व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड व इतर उपस्थित होते. याप्रसंगी याच पुस्तकाच्या ई-बुकचेदेखील प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे