शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
8
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
9
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
10
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
11
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
12
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
13
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
14
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
15
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
16
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
17
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
18
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
19
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
20
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी

भारतीय सैनिक जातपात, धर्म, प्रदेश कधीही मानत नाहीत :  मेजर सुभाष गावंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:51 IST

७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एकात्मतेचा संदेश देण्यासाठी व्यास क्रिएशन्स् आयोजित आणि संदिप वैद्य संचलित स्वरज्ञान निर्मित वंद्य वंदे मातरम् नऊ भाषा गौरवी भारतवर्षा हा देशभक्तीपर निवडक राज्यातील भाषांवर आधारित समर गीतांचा कार्यक्रम पार पडला. 

ठळक मुद्देभारतीय सैनिक जातपात, धर्म, प्रदेश कधीही मानत नाहीत :  मेजर सुभाष गावंडनिवडक राज्यातील भाषांवर आधारित समर गीतांचा कार्यक्रमवंदे मातरम् हा प्रत्येक भारतीयांचा प्रेरणादायी मंत्र आहे : आमदार संजय केळकर

ठाणे : भारतीय सैनिक जातपात, धर्म, प्रदेश कधीही मानत नाहीत. त्यांचा एकच धर्म राष्ट्रधर्म असतो. एकतेची ताकद हेच भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. हाच संदेश देणारा नऊ भाषेतील देशभक्तीपर गीतांचा सादर केलेला कार्यक्रम हा व्यास क्रिएशन्स्च्या स्तुत्य उपक्रम आदर्शवत आहे, असे मत निवृत्त मेजर सुभाष गावंड यांनी व्यक्त केले. ७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त  व्यास क्रिएशन्स् आयोजित, स्वरज्ञान निर्मित आणि संदिप वैद्य संचलित वंद्य वंदे मातरम् नऊ भाषा गौरवी भारतवर्षा ह्या देशभक्तीपर निवडक समर गीतांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार संजय केळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वंदे मातरम् हा प्रत्येक भारतीयांचा प्रेरणादायी मंत्र आहे. तो प्रत्येकाने जपला पाहिजे. एकाच वेळी नऊ विविध भाषेतील देशभक्तीपर गीते सादर करणारा हा अभिनव उपक्रम असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. यावेळी आमदार केळकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. संदिप वैद्य संचलित स्वरज्ञानच्या गायिकांनी  हिंदी, काश्मिरी, मगधी, गुजराथी, मल्याळम्, कन्नड, कोंकणी, मराठी आणि बंगाली या नऊ भाषांतील देशभक्तीपर गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. पितांबरी उद्योग समुह हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. निशिकांत महांकाळ यांनी वाजपेयींच्या गाजलेल्या कवितांच्या सादरीकरणातून काव्यांजली अर्पण केली. यावेळी ठाण्यातील निवडक प्रार्थनास्थळांच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक श्री. वा. नेर्लेकर यांनी आपल्या मनोगतात अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करून व्यास क्रिएशन्सच्या आगामी दिवाळी अंकांच्या योजनेची माहिती दिली. व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सर्वधर्मीय आणि सर्व भाषिकांनी एकत्र येऊन कार्य केले तरच एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील महासत्ता भारत उदयास येण्यास वेळ लागणार नाही, असा आशावाद नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केला. राजेंद्र पाटणकर यांनी निवेदन केले. कार्यक्रमाला ठाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई