शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

भारतीय सैनिक जातपात, धर्म, प्रदेश कधीही मानत नाहीत :  मेजर सुभाष गावंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:51 IST

७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एकात्मतेचा संदेश देण्यासाठी व्यास क्रिएशन्स् आयोजित आणि संदिप वैद्य संचलित स्वरज्ञान निर्मित वंद्य वंदे मातरम् नऊ भाषा गौरवी भारतवर्षा हा देशभक्तीपर निवडक राज्यातील भाषांवर आधारित समर गीतांचा कार्यक्रम पार पडला. 

ठळक मुद्देभारतीय सैनिक जातपात, धर्म, प्रदेश कधीही मानत नाहीत :  मेजर सुभाष गावंडनिवडक राज्यातील भाषांवर आधारित समर गीतांचा कार्यक्रमवंदे मातरम् हा प्रत्येक भारतीयांचा प्रेरणादायी मंत्र आहे : आमदार संजय केळकर

ठाणे : भारतीय सैनिक जातपात, धर्म, प्रदेश कधीही मानत नाहीत. त्यांचा एकच धर्म राष्ट्रधर्म असतो. एकतेची ताकद हेच भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. हाच संदेश देणारा नऊ भाषेतील देशभक्तीपर गीतांचा सादर केलेला कार्यक्रम हा व्यास क्रिएशन्स्च्या स्तुत्य उपक्रम आदर्शवत आहे, असे मत निवृत्त मेजर सुभाष गावंड यांनी व्यक्त केले. ७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त  व्यास क्रिएशन्स् आयोजित, स्वरज्ञान निर्मित आणि संदिप वैद्य संचलित वंद्य वंदे मातरम् नऊ भाषा गौरवी भारतवर्षा ह्या देशभक्तीपर निवडक समर गीतांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार संजय केळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वंदे मातरम् हा प्रत्येक भारतीयांचा प्रेरणादायी मंत्र आहे. तो प्रत्येकाने जपला पाहिजे. एकाच वेळी नऊ विविध भाषेतील देशभक्तीपर गीते सादर करणारा हा अभिनव उपक्रम असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. यावेळी आमदार केळकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. संदिप वैद्य संचलित स्वरज्ञानच्या गायिकांनी  हिंदी, काश्मिरी, मगधी, गुजराथी, मल्याळम्, कन्नड, कोंकणी, मराठी आणि बंगाली या नऊ भाषांतील देशभक्तीपर गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. पितांबरी उद्योग समुह हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. निशिकांत महांकाळ यांनी वाजपेयींच्या गाजलेल्या कवितांच्या सादरीकरणातून काव्यांजली अर्पण केली. यावेळी ठाण्यातील निवडक प्रार्थनास्थळांच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक श्री. वा. नेर्लेकर यांनी आपल्या मनोगतात अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करून व्यास क्रिएशन्सच्या आगामी दिवाळी अंकांच्या योजनेची माहिती दिली. व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सर्वधर्मीय आणि सर्व भाषिकांनी एकत्र येऊन कार्य केले तरच एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील महासत्ता भारत उदयास येण्यास वेळ लागणार नाही, असा आशावाद नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केला. राजेंद्र पाटणकर यांनी निवेदन केले. कार्यक्रमाला ठाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई