शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भारतीय सैनिक जातपात, धर्म, प्रदेश कधीही मानत नाहीत :  मेजर सुभाष गावंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:51 IST

७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एकात्मतेचा संदेश देण्यासाठी व्यास क्रिएशन्स् आयोजित आणि संदिप वैद्य संचलित स्वरज्ञान निर्मित वंद्य वंदे मातरम् नऊ भाषा गौरवी भारतवर्षा हा देशभक्तीपर निवडक राज्यातील भाषांवर आधारित समर गीतांचा कार्यक्रम पार पडला. 

ठळक मुद्देभारतीय सैनिक जातपात, धर्म, प्रदेश कधीही मानत नाहीत :  मेजर सुभाष गावंडनिवडक राज्यातील भाषांवर आधारित समर गीतांचा कार्यक्रमवंदे मातरम् हा प्रत्येक भारतीयांचा प्रेरणादायी मंत्र आहे : आमदार संजय केळकर

ठाणे : भारतीय सैनिक जातपात, धर्म, प्रदेश कधीही मानत नाहीत. त्यांचा एकच धर्म राष्ट्रधर्म असतो. एकतेची ताकद हेच भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. हाच संदेश देणारा नऊ भाषेतील देशभक्तीपर गीतांचा सादर केलेला कार्यक्रम हा व्यास क्रिएशन्स्च्या स्तुत्य उपक्रम आदर्शवत आहे, असे मत निवृत्त मेजर सुभाष गावंड यांनी व्यक्त केले. ७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त  व्यास क्रिएशन्स् आयोजित, स्वरज्ञान निर्मित आणि संदिप वैद्य संचलित वंद्य वंदे मातरम् नऊ भाषा गौरवी भारतवर्षा ह्या देशभक्तीपर निवडक समर गीतांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार संजय केळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वंदे मातरम् हा प्रत्येक भारतीयांचा प्रेरणादायी मंत्र आहे. तो प्रत्येकाने जपला पाहिजे. एकाच वेळी नऊ विविध भाषेतील देशभक्तीपर गीते सादर करणारा हा अभिनव उपक्रम असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. यावेळी आमदार केळकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. संदिप वैद्य संचलित स्वरज्ञानच्या गायिकांनी  हिंदी, काश्मिरी, मगधी, गुजराथी, मल्याळम्, कन्नड, कोंकणी, मराठी आणि बंगाली या नऊ भाषांतील देशभक्तीपर गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. पितांबरी उद्योग समुह हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. निशिकांत महांकाळ यांनी वाजपेयींच्या गाजलेल्या कवितांच्या सादरीकरणातून काव्यांजली अर्पण केली. यावेळी ठाण्यातील निवडक प्रार्थनास्थळांच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. व्यास क्रिएशन्सचे मार्गदर्शक श्री. वा. नेर्लेकर यांनी आपल्या मनोगतात अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करून व्यास क्रिएशन्सच्या आगामी दिवाळी अंकांच्या योजनेची माहिती दिली. व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सर्वधर्मीय आणि सर्व भाषिकांनी एकत्र येऊन कार्य केले तरच एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील महासत्ता भारत उदयास येण्यास वेळ लागणार नाही, असा आशावाद नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केला. राजेंद्र पाटणकर यांनी निवेदन केले. कार्यक्रमाला ठाणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई