शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारताची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार; ‘नोटाबंदी’तून होत आहे आगेकूच - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 04:01 IST

काही नोटा चलनातून बाद करणे, एवढाच नोटाबंदीचा उद्देश नव्हता. नोटाबंदी हे जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल आहे.

ठाणे : काही नोटा चलनातून बाद करणे, एवढाच नोटाबंदीचा उद्देश नव्हता. नोटाबंदी हे जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल आहे. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेची गती वाढत असून लवकरच भारताची अर्थव्यवस्था जगभरात सर्वाधिक सक्षम राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाण्यात केले.ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आॅलिम्पस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन हे प्रामुख्याने उपस्थित होते.डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या टीसीएसच्या आॅलिम्पस सेंटरचे उद्घाटन आणि नोटाबंदीची वर्षपूर्ती योगायोगाने एकाच दिवशी असून याकडे मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचा कांगावा विरोधक करत आहेत. त्यांचा समाचार मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.तरुणांसाठी कटिबद्ध -राज्यातील बुद्धिमान तरुणांची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती व्हावी, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी सांगितले. टीसीएसचा प्रवास मुंबईतूनच सुरू झाला. टीसीएसची ठाण्यातील इमारत अवघ्या दीड वर्षात उभारल्याचे गोपीनाथन यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाला महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गणपत गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परमबिरसिंग, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

नोटाबंदीसह जीएसटीविरोधात शिवसेनेचा हल्लाबोल! -नोटबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी)मुळे देशाची अर्थ व्यवस्था खिळखिळी झाली आहे. संघटित व असंघटित कामगारांसह व्यापारी वर्गावरही आत्महत्येची वेळ आल्याची टीका करत राज्यात सत्तेत सलेल्या शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेने बुधवारी आझाद मैदानात निदर्शने केली. यावेळी समाजवादी पार्टीनेही काळ््या फिती लावत निदर्शने केली.

शिव व्यापारी सेनेचे अध्यक्ष चिंटू शेख यांनी आझाद मैदानात निषेध सभा घेत भाजपाविरोधात जोरदार टीका केली. शेख म्हणाले की, नोटबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. तर जीएसटीने उरले-सुरलेले लघुउद्योगही बंद केले आहेत. अद्याप व्यापाºयांना जीएसटी कळालेला नसून सीए वर्गाकडून सर्रासपणे लूट सुरू आहे. त्यामुळे नोटबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरले आहे.समाजवादी पार्टीने काळ््या फिती लावून नोटबंदीच्या वर्षपूूर्तीचा निषेध व्यक्त केला. मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे आर्थिक क्षेत्राची जणू नसबंदी झाल्याची टीका सपाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शब्बीर अहमद मजाहीरी यांनी केली. ते म्हणाले की, नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला. रोजंदारीने काम करणाºया अनेकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला असून व्यापाºयांचे धंदे उध्वस्त झाले आहेत. याउलट धनाड्या लोकांनी पैशांचा वापर करून यामधून सफशेल सुटका करून घेतली. म्हणूनच नोटबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून सरकारने केलेल्या घोषणांपैकी एकही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सरकारने जनतेची माफी मागावी, अशी मागणी सपाने केली.

टॅग्स :Note BanनोटाबंदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस