शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भारताची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार; ‘नोटाबंदी’तून होत आहे आगेकूच - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 04:01 IST

काही नोटा चलनातून बाद करणे, एवढाच नोटाबंदीचा उद्देश नव्हता. नोटाबंदी हे जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल आहे.

ठाणे : काही नोटा चलनातून बाद करणे, एवढाच नोटाबंदीचा उद्देश नव्हता. नोटाबंदी हे जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल आहे. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेची गती वाढत असून लवकरच भारताची अर्थव्यवस्था जगभरात सर्वाधिक सक्षम राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाण्यात केले.ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आॅलिम्पस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन हे प्रामुख्याने उपस्थित होते.डिजिटलायझेशनच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या टीसीएसच्या आॅलिम्पस सेंटरचे उद्घाटन आणि नोटाबंदीची वर्षपूर्ती योगायोगाने एकाच दिवशी असून याकडे मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचा कांगावा विरोधक करत आहेत. त्यांचा समाचार मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.तरुणांसाठी कटिबद्ध -राज्यातील बुद्धिमान तरुणांची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती व्हावी, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी सांगितले. टीसीएसचा प्रवास मुंबईतूनच सुरू झाला. टीसीएसची ठाण्यातील इमारत अवघ्या दीड वर्षात उभारल्याचे गोपीनाथन यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाला महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गणपत गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परमबिरसिंग, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

नोटाबंदीसह जीएसटीविरोधात शिवसेनेचा हल्लाबोल! -नोटबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी)मुळे देशाची अर्थ व्यवस्था खिळखिळी झाली आहे. संघटित व असंघटित कामगारांसह व्यापारी वर्गावरही आत्महत्येची वेळ आल्याची टीका करत राज्यात सत्तेत सलेल्या शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेने बुधवारी आझाद मैदानात निदर्शने केली. यावेळी समाजवादी पार्टीनेही काळ््या फिती लावत निदर्शने केली.

शिव व्यापारी सेनेचे अध्यक्ष चिंटू शेख यांनी आझाद मैदानात निषेध सभा घेत भाजपाविरोधात जोरदार टीका केली. शेख म्हणाले की, नोटबंदीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. तर जीएसटीने उरले-सुरलेले लघुउद्योगही बंद केले आहेत. अद्याप व्यापाºयांना जीएसटी कळालेला नसून सीए वर्गाकडून सर्रासपणे लूट सुरू आहे. त्यामुळे नोटबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरले आहे.समाजवादी पार्टीने काळ््या फिती लावून नोटबंदीच्या वर्षपूूर्तीचा निषेध व्यक्त केला. मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे आर्थिक क्षेत्राची जणू नसबंदी झाल्याची टीका सपाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शब्बीर अहमद मजाहीरी यांनी केली. ते म्हणाले की, नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला. रोजंदारीने काम करणाºया अनेकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला असून व्यापाºयांचे धंदे उध्वस्त झाले आहेत. याउलट धनाड्या लोकांनी पैशांचा वापर करून यामधून सफशेल सुटका करून घेतली. म्हणूनच नोटबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून सरकारने केलेल्या घोषणांपैकी एकही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सरकारने जनतेची माफी मागावी, अशी मागणी सपाने केली.

टॅग्स :Note BanनोटाबंदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस